शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा आवश्यक

By admin | Updated: November 5, 2014 13:27 IST

जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे.

नांदेड : जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे. अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा करावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली.

जिल्ह्यात ३५२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अर्धापूर तालुक्यातील ५१ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. दुसर्‍या टप्प्यात ५२ अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ५२ अंगणवाड्यांची आज मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. उद््घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी यु. टी. तोटावाड, नाईक, श्रीमती गिरगावकर, पांडलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटकीय भाषणात काळे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या आयएसओ होणार नाहीत, ही वास्तविकता आहे. पण त्या बोलक्या झाल्या पाहिजे याची खबरदारी घ्यावी असे ते म्हणाले. यातून विद्यार्थ्यांना अंकगणित, मुळाक्षरे असे प्राथमिक ज्ञानतरी मिळणे आवश्यक आहे. प्रास्ताविकात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी महिला व बालकल्याण विभागाकडून २0१३-१४ मध्ये राबविलेल्या कुपोषणमुक्त गाव मोहिमेच्या यशस्वीतेबाबत सांगताना आयएसओ मानांकनातही जिल्हा चांगली कामगिरी बजावेल असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्ह्याने डोळ्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होईल असेही ते म्हणाले. 
अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, मदतनीस, सेविका यांना आयएसओसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात कंधार तालुक्यातील २0, नांदेड- १२, बिलोली, हदगाव व माहूर तालुक्यातील प्रत्येकी ५, मुदखेड- ४ आणि अर्धापूर तालुक्यातील 0२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी सोनवणे, खंदारे, उपलंचवार आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)