शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा आवश्यक

By admin | Updated: November 5, 2014 13:27 IST

जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे.

नांदेड : जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे. अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा करावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली.

जिल्ह्यात ३५२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अर्धापूर तालुक्यातील ५१ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. दुसर्‍या टप्प्यात ५२ अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ५२ अंगणवाड्यांची आज मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. उद््घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी यु. टी. तोटावाड, नाईक, श्रीमती गिरगावकर, पांडलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटकीय भाषणात काळे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या आयएसओ होणार नाहीत, ही वास्तविकता आहे. पण त्या बोलक्या झाल्या पाहिजे याची खबरदारी घ्यावी असे ते म्हणाले. यातून विद्यार्थ्यांना अंकगणित, मुळाक्षरे असे प्राथमिक ज्ञानतरी मिळणे आवश्यक आहे. प्रास्ताविकात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी महिला व बालकल्याण विभागाकडून २0१३-१४ मध्ये राबविलेल्या कुपोषणमुक्त गाव मोहिमेच्या यशस्वीतेबाबत सांगताना आयएसओ मानांकनातही जिल्हा चांगली कामगिरी बजावेल असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्ह्याने डोळ्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होईल असेही ते म्हणाले. 
अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, मदतनीस, सेविका यांना आयएसओसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात कंधार तालुक्यातील २0, नांदेड- १२, बिलोली, हदगाव व माहूर तालुक्यातील प्रत्येकी ५, मुदखेड- ४ आणि अर्धापूर तालुक्यातील 0२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी सोनवणे, खंदारे, उपलंचवार आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)