शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा आवश्यक

By admin | Updated: November 5, 2014 13:27 IST

जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे.

नांदेड : जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे. अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा करावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली.

जिल्ह्यात ३५२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अर्धापूर तालुक्यातील ५१ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. दुसर्‍या टप्प्यात ५२ अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ५२ अंगणवाड्यांची आज मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. उद््घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी यु. टी. तोटावाड, नाईक, श्रीमती गिरगावकर, पांडलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटकीय भाषणात काळे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या आयएसओ होणार नाहीत, ही वास्तविकता आहे. पण त्या बोलक्या झाल्या पाहिजे याची खबरदारी घ्यावी असे ते म्हणाले. यातून विद्यार्थ्यांना अंकगणित, मुळाक्षरे असे प्राथमिक ज्ञानतरी मिळणे आवश्यक आहे. प्रास्ताविकात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी महिला व बालकल्याण विभागाकडून २0१३-१४ मध्ये राबविलेल्या कुपोषणमुक्त गाव मोहिमेच्या यशस्वीतेबाबत सांगताना आयएसओ मानांकनातही जिल्हा चांगली कामगिरी बजावेल असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्ह्याने डोळ्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होईल असेही ते म्हणाले. 
अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, मदतनीस, सेविका यांना आयएसओसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात कंधार तालुक्यातील २0, नांदेड- १२, बिलोली, हदगाव व माहूर तालुक्यातील प्रत्येकी ५, मुदखेड- ४ आणि अर्धापूर तालुक्यातील 0२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी सोनवणे, खंदारे, उपलंचवार आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)