शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

खरीपाची पिके 'कोमात'

By admin | Updated: August 20, 2014 23:53 IST

नांदेड : जिल्ह्यात जवळपास दीड लाख एकर क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले असून पाण्याअभावी पिकांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे़

नांदेड : जिल्ह्यात जवळपास दीड लाख एकर क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले असून पाण्याअभावी पिकांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे़ त्यामुळे खरीपातील पिकांची अवस्था 'कोमात' गेल्यासारखी झाली आहे़ त्याचा फटका आता उत्पादनावर होणार आहे़ पावसाने दडी मारल्याने सर्वाधिक फटका कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाची अवकृपा होत असून यावर्षी त्यात मोठी भर पडली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस लांबला त्यामुळे त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. शेतकऱ्यांचे हातचे सोयाबीन, मूग, उडिद पीकही गेले़ कोरडवाहू शेतकरी चिंतेत- जिल्ह्यात पावसाअभावी जून-जुलै, आॅगस्ट महिनाही कोरडा जात असल्याने आजपर्यंत पडलेल्या तुरळक सरी वगळता वरुणराजाने हजेरी न लावल्याने कोरडवाहू शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र मोठे असल्यामुळे सिंचनाच्या सोईसुविधाही अल्प प्रमाणात आहेत. अशात बागायत शेतीलाही पाणी देण्यासाठी भारनियमनाचा फटका बसत आहे. पावसाची दडी व पेरण्यांना झालेला उशिर यामुळे पिकांची वाढही खूंटली आहे. परिणामी पीके कोमेजली़ खरीप हंगामही हातचा जाण्याची आता चिंता आहे़ (प्रतिनिधी)कोरड्या दुष्काळाचे सावटजिल्ह्यात जुन ते आॅक्टोबर दरम्यान एकूण १५२८८.७६ मि.मी. तर सरासरी ९५५.५५ मि.मी.पाऊस पडतो. परंतु यंदा १९ आॅगस्टपर्यंत एकूण २६४२.९४ मि.मी. तर सरासरी १६५.१८ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. तर गतवर्षी १९ आॅगस्टपर्यंत एकूण १३४११.४७ मि.मी. तर सरासरी ८३८.९२ मि.मी.एवढा पाऊस पडला होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट ओढावले आहे.