जिल्ह्यातील मागील वर्षी खरीप हंगामात विमा योजनेत ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांसाठी एकूण ९ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी ४४ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा हप्ता इफको टोकियो विमा कंपनीकडे भरला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले होते. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेतकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. काढणी पश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९ शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती. उत्पन्न आधारित विमा नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी किनवट व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आली. त्यामुळे किनवट व लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसान भरपाई मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
चौकट-
पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२० मधील उत्पन्न आधारित नुकसान झालेल्या ३० हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९७ लाख ५१ हजार रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यापूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणी पश्चात नुकसान झालेल्या ८२ हजार ३३३ शेतकऱ्यांना ७५ कोटी ८४ लाखांचा विमा मिळाला होता.
चौकट-
खरीप हंगाम २०२० मध्ये पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सहा पिकांसाठी ४४ हजार ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा हप्त भरला होता. राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१३ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१७ असा एकूण ६१३ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमिअम जमा झाला होता. यातून जिल्ह्याला एकूण ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार रुपये विमा भरपाई मिळाली.