शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना विमा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील मागील वर्षी खरीप हंगामात विमा योजनेत ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांसाठी एकूण ९ लाख ५५ ...

जिल्ह्यातील मागील वर्षी खरीप हंगामात विमा योजनेत ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांसाठी एकूण ९ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी ४४ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा हप्ता इफको टोकियो विमा कंपनीकडे भरला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले होते. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेतकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. काढणी पश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९ शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती. उत्पन्न आधारित विमा नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी किनवट व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आली. त्यामुळे किनवट व लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसान भरपाई मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

चौकट-

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२० मधील उत्पन्न आधारित नुकसान झालेल्या ३० हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९७ लाख ५१ हजार रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यापूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणी पश्चात नुकसान झालेल्या ८२ हजार ३३३ शेतकऱ्यांना ७५ कोटी ८४ लाखांचा विमा मिळाला होता.

चौकट-

खरीप हंगाम २०२० मध्ये पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सहा पिकांसाठी ४४ हजार ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा हप्त भरला होता. राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१३ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१७ असा एकूण ६१३ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमिअम जमा झाला होता. यातून जिल्ह्याला एकूण ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार रुपये विमा भरपाई मिळाली.