शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

ऊस, हळदीला ‘हुमणी’ चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:28 IST

अर्धापूर तालुक्यातील शेती शंभर टक्के सिंचनाखाली असून येथे भाऊराव चव्हाण साखर उद्योगाचे तीन युनिट कार्यरत आहेत. या कारखान्याच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस आणि काही प्रमाणात हळदीची लागवड केली आहे.

ठळक मुद्देअर्धापूर तालुका हिवाळ्यातच वाळला ऊस, अळीच्या प्रादुर्भावामुळे वजनात घट

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी : अर्धापूर तालुक्यातील शेती शंभर टक्के सिंचनाखाली असून येथे भाऊराव चव्हाण साखर उद्योगाचे तीन युनिट कार्यरत आहेत. या कारखान्याच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस आणि काही प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. या ऊस आणि हळद या दोन्हीही बागायती पिकाला 'हुमणी' रोगाचा विळखा पडला आहे.ऐन हिवाळ्यातसुद्धा शेतातील उभा ऊस वाळून गेला आहे. तर हळदीचे पीक करपायला लागले आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी चिंतेत सापडला आहे.शासनाच्या पाहणी अहवालात अर्धापूर तालुक्यात सुकाळ दाखविला असला तरी येथील शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यात आता केळी, ऊस व हाळदीला हुमणी रोगाचा विळखा पडला असून ऐन हिवाळ्यात उसाचे पाचट होत आहे. तर हळदीच्या वाढीवर परिणाम झाला आहे. या हुमणीचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. हुमणी आळीच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.परिसरात केळीचे रोपे रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांची मर वाढली आहे. तसेच हळद करपायला लागली आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.यंदा इसापूर धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळणार असल्यामुळे केळीची लागवड करण्यात आली आहे. ऊत्तीसंवर्धित (टिश्यू कल्चर) केळीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे; पण सध्या या केळीच्या रोपांना हुमणीचा विळखा पडला आहे. त्यामुळे रोपांची मर वाढली आहे.अर्धापूर तालुक्यात केळी, हळद व उसाचे लागवडीक्षेत्र जास्त आहे. एकेकाळी केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या केळीच्या पट्ट््यात सध्या हळदीचे क्षेत्र पाच पटीने वाढले आहे. तसेच उसाचेही लागवडक्षेत्र जास्त आहे. पण मागील महिनाभरापासून येथील ऊस, हळद व केळी पिकावर हुमणी रोग पडला असून शेतातील पिकाचे उत्पन्न घटले आहे. तर गुलाबी बोंडअळीने कापसाच्या पहिल्या वेचणीतच कापसाच्या पराट्या झाल्या आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत हळद व ऊसाला ‘हुमणी’ लागली असल्याने शेतकरी शेतातील उभा ऊस चारा म्हणून विक्री करीत आहेत.शेतकºयांना पुन्हा रोपांची लागवड करावी लागत आहे. तर शेतकरी या हुमणीचा प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय करीत आहेत. खरिपाच्या हंगामाने दगा दिल्यानंतर शेतक-यांची सारी भिस्त रबी हंगामावर होती ; पण परतीचा पाऊस न पडल्यामुळे रबीच्या हंगामाचीही आशा धूसर होत आहे. अशा सर्व बिकट परिस्थितीचा सामना करताना शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडagricultureशेती