शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऊस, हळदीला ‘हुमणी’ चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:28 IST

अर्धापूर तालुक्यातील शेती शंभर टक्के सिंचनाखाली असून येथे भाऊराव चव्हाण साखर उद्योगाचे तीन युनिट कार्यरत आहेत. या कारखान्याच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस आणि काही प्रमाणात हळदीची लागवड केली आहे.

ठळक मुद्देअर्धापूर तालुका हिवाळ्यातच वाळला ऊस, अळीच्या प्रादुर्भावामुळे वजनात घट

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी : अर्धापूर तालुक्यातील शेती शंभर टक्के सिंचनाखाली असून येथे भाऊराव चव्हाण साखर उद्योगाचे तीन युनिट कार्यरत आहेत. या कारखान्याच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस आणि काही प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. या ऊस आणि हळद या दोन्हीही बागायती पिकाला 'हुमणी' रोगाचा विळखा पडला आहे.ऐन हिवाळ्यातसुद्धा शेतातील उभा ऊस वाळून गेला आहे. तर हळदीचे पीक करपायला लागले आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी चिंतेत सापडला आहे.शासनाच्या पाहणी अहवालात अर्धापूर तालुक्यात सुकाळ दाखविला असला तरी येथील शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यात आता केळी, ऊस व हाळदीला हुमणी रोगाचा विळखा पडला असून ऐन हिवाळ्यात उसाचे पाचट होत आहे. तर हळदीच्या वाढीवर परिणाम झाला आहे. या हुमणीचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. हुमणी आळीच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.परिसरात केळीचे रोपे रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांची मर वाढली आहे. तसेच हळद करपायला लागली आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.यंदा इसापूर धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळणार असल्यामुळे केळीची लागवड करण्यात आली आहे. ऊत्तीसंवर्धित (टिश्यू कल्चर) केळीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे; पण सध्या या केळीच्या रोपांना हुमणीचा विळखा पडला आहे. त्यामुळे रोपांची मर वाढली आहे.अर्धापूर तालुक्यात केळी, हळद व उसाचे लागवडीक्षेत्र जास्त आहे. एकेकाळी केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या केळीच्या पट्ट््यात सध्या हळदीचे क्षेत्र पाच पटीने वाढले आहे. तसेच उसाचेही लागवडक्षेत्र जास्त आहे. पण मागील महिनाभरापासून येथील ऊस, हळद व केळी पिकावर हुमणी रोग पडला असून शेतातील पिकाचे उत्पन्न घटले आहे. तर गुलाबी बोंडअळीने कापसाच्या पहिल्या वेचणीतच कापसाच्या पराट्या झाल्या आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत हळद व ऊसाला ‘हुमणी’ लागली असल्याने शेतकरी शेतातील उभा ऊस चारा म्हणून विक्री करीत आहेत.शेतकºयांना पुन्हा रोपांची लागवड करावी लागत आहे. तर शेतकरी या हुमणीचा प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय करीत आहेत. खरिपाच्या हंगामाने दगा दिल्यानंतर शेतक-यांची सारी भिस्त रबी हंगामावर होती ; पण परतीचा पाऊस न पडल्यामुळे रबीच्या हंगामाचीही आशा धूसर होत आहे. अशा सर्व बिकट परिस्थितीचा सामना करताना शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडagricultureशेती