प्रभाकर दर्शनवाड यांनी म्हटले आहे की, मोहपूर शिवारामध्ये माझे मालकीचे शेत असून, १४ फेब्रुवारी २०१६ रोजी वीज वितरण कंपनीकडे कोटेशन भरले आहे. पाच वर्षे लोटूनही वीज पंपाला वीज जोडणी झाली नसल्याने विलंब होत असल्याने जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांना याविषयी मागणी केली असता मे ते जून २०२० मध्ये पोल उभे करण्याचे काम पूर्ण झाले. वीज जोडणी अद्यापही बाकी आहे. ती वीज जोडणी तात्काळ करून द्यावी व मला रबी व उन्हाळी हंगाम घेता यावा, अशी अपेक्षा आहे. वीज जोडणी झाल्यानंतर रबी व उन्हाळी हंगाम घेता येईल, या आशेने पाईपलाईनसाठी एक लाख रुपये व पीक कर्जासाठी पन्नास हजार रुपये कर्ज घेतले. वेळेवर वीज जोडणी झाली नसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे, असे प्रभाकर दर्शनवाड यांनी म्हटले आहे. वेळीच वीज जोडणी झाली नाही तर कुटुंबासह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दर्शनवाड यांनी दिला आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आर. आर. परचाके यांना विचारले असता दहाच्या वर पोल लागत असल्याने ते काम होणे शक्य नाही, त्यांनी सोलार घ्यावा, असे परचाके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोटेशन भरून पाच वर्षे लोटूनही वीज जोडणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:13 IST