शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
2
"धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं"; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट
3
LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?
4
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट पुन्हा विक्रीसाठी! १.१७ कोटींची बोली लावणाऱ्याचं पुढे काय झालं?
5
ठाण्यातील बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली नाहीत? बाळकुम, येऊरबाबत हायकोर्टाची विचारणा
6
Karad Bus Accident: कराड जवळ नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २० फूट खड्ड्यात सहलीची बस कोसळली, ४५ जण जखमी
7
आता आणखी एका सरकारी बँकेतील हिस्सा विकणार सरकार; कोणती आहे बँक, किती कमाई होणार?
8
RSS मुख्यालयाच्या पार्किंगसाठी प्राचीन मंदिरावर बुलडोझर?; स्थानिकांचा आक्रोश, लोक संतापले
9
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजार; ८७ अंकांनी घसरुन २६,०८८ वर उघडला निफ्टी
10
इंजिनीअर तरुणीही रील्स स्टारच्या जाळ्यात; लग्नाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक
11
अचानक बोगद्यात बंद पडली मेट्रो, लाईटही गेली; प्रवाशांनी मोबाईलचा टॉर्च लावून गाठलं पुढचं स्टेशन!
12
ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार!
13
धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीची हत्या केली, पोलिसांसमोर त्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
मजा! सोहम-पूजा आज सप्तपदी घेणार, हळद-संगीत फंक्शनमध्ये नवरीच्या डान्सवर खिळल्या नजरा
15
Raj Nidimoru Net Worth: 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा?
16
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
17
पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त
18
प्रभादेवी पूल पाडकामासाठी १५ तास ब्लॉक कसा घ्यावा? 'मध्य'ला प्रश्नः ४० एक्सप्रेस १२५० लोकलवर प्रभाव
19
Sanchar Saathi: 'संचार साथी'वर संशयाचे ढग! ॲपच्या अनिवार्यतेवरून विरोधकांनी उठवले रान!
20
Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत सुविधांच्या कामावर समिती नाराज

By admin | Updated: January 30, 2015 14:35 IST

केंद्रीय समितीच्या पथकाने सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली.

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात बांधलेले घरकुले व मुलभूत सुविधांच्या कामाची पाहणी गुरूवारी केंद्रीय समितीच्या पथकाने केली. यावेळी सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली. झोपडपट्टी मुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे. मागील सहा वर्षापासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविली जात आहे. ही योजना अंतिम टप्यात आहे.या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने या कामांची पाहणी करण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण प्रकाश व डॉ. रायना यांचे पथक शहरात आले होते. गुरूवारी या पथकाने गौतमनगर, सांगवी व श्रावस्तीनगर या भागातील घरकुलांची पाहणी केली. त्यानंतर शहरातील इतर ठिकाणी मुलभूत सुविधांच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर लाभार्थी, नगरसेवक, अधिकारी व पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. प्रकाश यांनी सांगितले. की, महापालिकेने ही योजना राबविण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले. त्यामुळेच सर्वाधिक घरकुले ते बांधू शकले. मात्र दुसरीकडे मुलभूत सुविधांची कामे समाधानकारकरित्या झाली नाहीत. या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या जनजागृतीची गरज आहे. ड्रेनेजलाईनची कामे चुकीचे झाली आहेत. योग्य जोडण्या न झाल्यामुळे समस्या वाढणार आहेत. त्याशिवाय सिमेंट रस्ते दबले आहेत. पाणीपुरवठय़ाची कामेही योग्यरित्या झालेले नाहीत. परिणामी रहिवाशांना पाणी मिळत नाही. ही योजना जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत असल्यामुळे झालेल्या विकासकामांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. लोकसहभागही महत्वाचा आहे. लोकांना या योजनेबद्दल योग्य माहिती देऊन यापुढे आपला परिसर व आपले घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या योजनेतंर्गत ९0 टक्के काम पूर्ण झाले असून १0 टक्के मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारीत नवीन घरकुल योजना येत असल्याचे गृहनिर्माण प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण प्रकाश यांनी सांगितले. /(प्रतिनिधी)

लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले. घरकुलांच्या परिसरात अस्वच्छता आढळून आली. गौतमनगर भागातील काही इमारतीतील सुविधांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी देखभालीची गरज आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या परिसरातील सुविधांचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत समितीने व्यक्त केले.

जनजागृतीची गरज

■ राजीव गांधी आवास योजनेचे नाव बदलून नवीन घरकुल योजना फेब्रुवारीपासून राबविण्याचा मानस केंद्र शासनाचा आहे. त्यामुळे बीएसयुपी योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बीएसयुपी योजनेतील अर्धवट कामेही या नवीन घरकुल योजनेत समाविष्ट होणार असल्याचे पथकाने सांगितले.