शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

मुलभूत सुविधांच्या कामावर समिती नाराज

By admin | Updated: January 30, 2015 14:35 IST

केंद्रीय समितीच्या पथकाने सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली.

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात बांधलेले घरकुले व मुलभूत सुविधांच्या कामाची पाहणी गुरूवारी केंद्रीय समितीच्या पथकाने केली. यावेळी सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली. झोपडपट्टी मुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे. मागील सहा वर्षापासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविली जात आहे. ही योजना अंतिम टप्यात आहे.या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने या कामांची पाहणी करण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण प्रकाश व डॉ. रायना यांचे पथक शहरात आले होते. गुरूवारी या पथकाने गौतमनगर, सांगवी व श्रावस्तीनगर या भागातील घरकुलांची पाहणी केली. त्यानंतर शहरातील इतर ठिकाणी मुलभूत सुविधांच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर लाभार्थी, नगरसेवक, अधिकारी व पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. प्रकाश यांनी सांगितले. की, महापालिकेने ही योजना राबविण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले. त्यामुळेच सर्वाधिक घरकुले ते बांधू शकले. मात्र दुसरीकडे मुलभूत सुविधांची कामे समाधानकारकरित्या झाली नाहीत. या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या जनजागृतीची गरज आहे. ड्रेनेजलाईनची कामे चुकीचे झाली आहेत. योग्य जोडण्या न झाल्यामुळे समस्या वाढणार आहेत. त्याशिवाय सिमेंट रस्ते दबले आहेत. पाणीपुरवठय़ाची कामेही योग्यरित्या झालेले नाहीत. परिणामी रहिवाशांना पाणी मिळत नाही. ही योजना जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत असल्यामुळे झालेल्या विकासकामांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. लोकसहभागही महत्वाचा आहे. लोकांना या योजनेबद्दल योग्य माहिती देऊन यापुढे आपला परिसर व आपले घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या योजनेतंर्गत ९0 टक्के काम पूर्ण झाले असून १0 टक्के मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारीत नवीन घरकुल योजना येत असल्याचे गृहनिर्माण प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण प्रकाश यांनी सांगितले. /(प्रतिनिधी)

लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले. घरकुलांच्या परिसरात अस्वच्छता आढळून आली. गौतमनगर भागातील काही इमारतीतील सुविधांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी देखभालीची गरज आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या परिसरातील सुविधांचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत समितीने व्यक्त केले.

जनजागृतीची गरज

■ राजीव गांधी आवास योजनेचे नाव बदलून नवीन घरकुल योजना फेब्रुवारीपासून राबविण्याचा मानस केंद्र शासनाचा आहे. त्यामुळे बीएसयुपी योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बीएसयुपी योजनेतील अर्धवट कामेही या नवीन घरकुल योजनेत समाविष्ट होणार असल्याचे पथकाने सांगितले.