शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत सुविधांच्या कामावर समिती नाराज

By admin | Updated: January 30, 2015 14:35 IST

केंद्रीय समितीच्या पथकाने सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली.

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात बांधलेले घरकुले व मुलभूत सुविधांच्या कामाची पाहणी गुरूवारी केंद्रीय समितीच्या पथकाने केली. यावेळी सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली. झोपडपट्टी मुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे. मागील सहा वर्षापासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविली जात आहे. ही योजना अंतिम टप्यात आहे.या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने या कामांची पाहणी करण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण प्रकाश व डॉ. रायना यांचे पथक शहरात आले होते. गुरूवारी या पथकाने गौतमनगर, सांगवी व श्रावस्तीनगर या भागातील घरकुलांची पाहणी केली. त्यानंतर शहरातील इतर ठिकाणी मुलभूत सुविधांच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर लाभार्थी, नगरसेवक, अधिकारी व पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. प्रकाश यांनी सांगितले. की, महापालिकेने ही योजना राबविण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले. त्यामुळेच सर्वाधिक घरकुले ते बांधू शकले. मात्र दुसरीकडे मुलभूत सुविधांची कामे समाधानकारकरित्या झाली नाहीत. या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या जनजागृतीची गरज आहे. ड्रेनेजलाईनची कामे चुकीचे झाली आहेत. योग्य जोडण्या न झाल्यामुळे समस्या वाढणार आहेत. त्याशिवाय सिमेंट रस्ते दबले आहेत. पाणीपुरवठय़ाची कामेही योग्यरित्या झालेले नाहीत. परिणामी रहिवाशांना पाणी मिळत नाही. ही योजना जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत असल्यामुळे झालेल्या विकासकामांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. लोकसहभागही महत्वाचा आहे. लोकांना या योजनेबद्दल योग्य माहिती देऊन यापुढे आपला परिसर व आपले घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या योजनेतंर्गत ९0 टक्के काम पूर्ण झाले असून १0 टक्के मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारीत नवीन घरकुल योजना येत असल्याचे गृहनिर्माण प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण प्रकाश यांनी सांगितले. /(प्रतिनिधी)

लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले. घरकुलांच्या परिसरात अस्वच्छता आढळून आली. गौतमनगर भागातील काही इमारतीतील सुविधांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी देखभालीची गरज आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या परिसरातील सुविधांचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत समितीने व्यक्त केले.

जनजागृतीची गरज

■ राजीव गांधी आवास योजनेचे नाव बदलून नवीन घरकुल योजना फेब्रुवारीपासून राबविण्याचा मानस केंद्र शासनाचा आहे. त्यामुळे बीएसयुपी योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बीएसयुपी योजनेतील अर्धवट कामेही या नवीन घरकुल योजनेत समाविष्ट होणार असल्याचे पथकाने सांगितले.