गेल्या तीस वर्षापासून ईश्वर नगर हे जवळच्याच दुर्गा नगर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गट ग्रामपंचायत म्हणून समाविष्ट करण्यात आले. आजतागायत या गावचा कसलाच विकास झाला नाही. गावात घरकुल योजना आली नाही. पाणी योजना थातूरमातूर करण्यात आली. मात्र अद्याप नागरिकांना पाणी मिळत नाही. येथील नागरिकांना आपल्या हक्काच्या नागरी सुविधा सुद्धा मिळत नाहीत. यापूर्वी येथे लोकसभेचे मतदान केंद्र होते ते आता काढून घेण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांना मतदानासाठी दुर्गानगरला जावे लागते . अनेक बाबतीत वंचित असणाऱ्या येथील नागरिकांना स्वतंत्र ग्रामपंचायत बहाल करून विकास कामे करण्यात यावीत. अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील माजी उपसरपंच निरंजन राठोड यांच्यासह गावातील नागरिकांनी दिला आहे.
ईश्वरनगरच्या नागरिकांचा ग्रा.पं. निवडणुकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST