शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

९७ ग्रामपंचायतीतील इच्छुकांचे २ हजार ३६७ नामनिर्देशनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

कंधारः तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यापूर्वीच गावपुढाऱ्यांची ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरतानाच मोठी अग्निपरीक्षा ठरत होती. ऑनलाईन फॉर्म भरत ...

कंधारः तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यापूर्वीच गावपुढाऱ्यांची ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरतानाच मोठी अग्निपरीक्षा ठरत होती. ऑनलाईन फॉर्म भरत असताना नेट साथ देईना, वेळेत आपला क्रमांक येईना, थंडीची हुडहुडी कमी होईना आदीमुळे रात्र जागून काढण्याचा प्रसंग ओढावला.

चार दिवसात २ हजार ३६७ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचे समोर आले आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.

तालुक्यातील ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावपुढाऱ्यांत कमालीचा उत्साह संचारला. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय खलबते सुरू झाली. परंतु प्रत्यक्ष निवडणूक लढविण्यापूर्वीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यात पहिला दणका सरपंचाची झालेली आरक्षण सोडत रद्द झाली. त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला घट्ट बांधलेले सरपंचाचे बाशिंग गळाले. सरपंचपद नेमके कुणासाठी राहणार हे गुलदस्त्यात असल्यामुळे गावचे राजकारण थंडावले होते. परंतु नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख जवळ आल्यानंतर गावचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली. आणि ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरायला गेलेल्या इच्छुकांचा पुरता हिरमोड सुरू झाला. नेटची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तासन् तास ताटकळत बसण्याचा प्रसंग ओढवला. शेकडो जणांनी रात्र जागून काढली आणि उमेदवारी दाखल केली.

नामनिर्देशनपत्र भरलेली संख्या २३ डिसेंबर- निरंक, २४ डिसेंबर- १२, २८ डिसेंबर-२८६, २९ डिसेंबर- ७२२, ३० डिसेंबर १३४७. एकूण २,३६७. ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरताना उमेदवारांची होणारी दमछाक विचारात घेऊन ऑफलाईन उमेदवारी दाखल करण्यास २९ डिसेंबर रोजी मुभा देण्यात आली. वेळ वाढवून देण्यात आल्याने गावपुढाऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे ३० डिसेंबर रोजी गावपुढारी तणावमुक्त झाले. नामनिर्देशन पत्र दाखल करताना मोठी झुंबड उडाली. आणि एकाच दिवशी १ हजार ३४७ जणांनी उमेदवारी दाखल केली. उमेदवारी झालेल्या संख्येची माहिती संकलित करण्यास रात्री बराच उशीर झाला. तहसीलदार व्ही.बी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विजय चव्हाण ,नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड,नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, नायब तहसीलदार गिडे ,उत्तम जोशी ,मन्मथ थोटे , गंगाधर गोंटे आदींनी परिश्रम घेतले .छाननी उमेदवारी परत घेणे, चिन्ह वाटपानंतर निवडणूक प्रचाराचा ज्वर अधिक वाढेल असेच ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आहे.