शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:10 IST

श्याम नाडेकर नरखेड : पावसाळ्यात धबधबे, तलाव, धरणावर हौशी पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. ...

श्याम नाडेकर

नरखेड : पावसाळ्यात धबधबे, तलाव, धरणावर हौशी पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीतील झुंज धबधब्यावर नरखेड, काटोल तालुक्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. वर्धा नदीत मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांच्या होड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्या होड्यामध्ये वर्धा नदीच्या खोल पाण्यात फेरफटका मारणे हा पर्यटकांकरिता खूप मोठे आकर्षण आहे. या संधीचा उपयोग होडीधारक होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना जल सफारीचा आनंद देतात. जलसफारीसोबतच विविध अँगलने सेल्फी काढणे ही नवीन क्रेझ निर्माण झाली आहे. पर्यटकांकरिता जलसफारी करताना कोणतेही सुरक्षा कवच किंवा सुरक्षा साधनांचा वापर होत नाही.

झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रातील महादेवाच्या मंदिरातून परत येताना होडी उलटून ११जणांना जलसमाधी मिळाली. या घटनेने संपूर्ण वरुड, नरखेड व टोल तालुका हादरला आहे. पर्यटकांची सुरक्षेची जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. जल सफारीकरिता वापरात असलेल्या होड्या या पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्या होड्यांना मच्छीमारीकरीता किंवा पर्यटनाकरिता कोणताही परवाना नाही. होडीला कोणतीही गुणवत्ता प्रमाण नाही. तसेच पर्यटकांना जीवरक्षक कवच उपलब्ध राहत नाही. प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.

---

सूचना फलकांचा अभाव

नरखेड तालुक्याच्या बाजूने खडकाळ भाग असल्याने प्रेमी युगुल, कौटुंबिक सहल तसेच पार्टी करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते, परंतु तेथे प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यात आलेले नाही.

---

ही काळजी घेणे गरजेचे

- नरखेड तालुक्याकडून जाणाऱ्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलिसांनी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करावा.

-प्रशासनाने धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.

- तरुणांनी अनोळखी ठिकाणी पोहण्याचा किंवा आंघोळ करण्याचा मोह टाळावा.

- प्रेमी युगुलांनी एकांतवासाचा शोध घेण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नये.

- पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने जल सफारी करताना सुरक्षा कवचाचा वापर करावा.

-उपलब्ध होडी तांत्रिक गुणवत्ता योग्यतेची आहे का याची पडताळणी करावी.

-होडीच्या क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांनी जलसफारी करु नये.

----

झुंज धबधबा हा नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असून पर्यटन व जलसफारीचा भाग हा अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये येतो. नरखेड तालुक्याच्या हद्दीमध्ये वर्धा नदीचा खडकाळ भाग येतो. त्यामुळे नागपूर जिल्हा प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

हरिश्चंद्र गावडे, ठाणेदार, जलालखेडा पोलीस स्टेशन