शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

- तर राजधानीचा फॉर्म्युला उपराजधानीत

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

वाढत्या प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी राजधानी दिल्लीत १ जानेवारीपासून ‘आॅड इव्हन फॉर्म्युला’ ( सम-विषम

दयानंद पाईकराव/मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरवाढत्या प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी राजधानी दिल्लीत १ जानेवारीपासून ‘आॅड इव्हन फॉर्म्युला’ ( सम-विषम क्रमांकाच्या कार) चा महत्त्वाकांशी योजनेला प्रारंभ झाला आहे. वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी हा नियम उपयुक्त ठरेल असा दावा दिल्ली सरकारने केला आहे. उपराजधानीतही सध्याचे प्रदूषण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा फॉर्म्युला लागू करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.दिल्लीतील झालेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने ‘आॅड इव्हन फॉर्म्युला’ सुरू केला. या पार्श्वभूमीवर नागपुरातील प्रदूषणाबाबतची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.नागपुरात प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. परंतु या मंडळाच्यावतीने फक्त उद्योगातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात येते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाशी आमचा काही संबंध नसल्याची माहिती या कार्यालयातून मिळाली. उपराजधानीत दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. आरटीओ कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये दुचाकी वाहन ३४ हजार ४०५ होते. २०१४ मध्ये त्यात ४७ हजार २०४ वाहनांची भर पडली तर २०१५ मध्ये ५५ हजार ७०४ वाहनांची संख्या वाढली. सध्या शहरात एकूण १ लाख ३७ हजार ३१३ दुचाकी आहेत. शहरात २०१३ मध्ये ६ हजार २६२ चार चाकी वाहने होती. २०१४ मध्ये त्यात १ हजार ५९८ वाहनांची भर पडली तर २०१५ मध्ये १९ हजार ७६ चार चाकी वाहनांची संख्या वाढली. सध्या शहरात २६ हजार ९३६ चार चाकी वाहने आहेत. या वाहनातून कार्बन डाय आॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड, कार्बन मोनो आॅक्साईड हे प्रदुषण करणारे धूर निघतात. यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. या प्रदूषणाला रोखण्यासाठी कुठलीच यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे आगामी ५ वर्षात दिल्लीसारखाच ‘आॅड इव्हन फॉर्म्युला’ नागपुरातही बंधनकारक करावा लागणार आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.धोक्याची घंटा ओळखा‘दिल्ली शहरात प्रदूषणाची स्थिती निर्माण होण्यामागे दिल्लीच्या सभोवताली वाढलेले उद्योगाचे क्षेत्र आहे. या उद्योगातून निर्माण होणारे प्रदूषण दिल्लीत पसरते. या प्रदूषणाचे विघटन शक्य नसल्याने दिल्लीच्या वातावरणात धूर आणि धुळीमुळे स्मोग तयार झाला आहे. त्यातच दिल्लीत वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. दिल्लीच्या प्रशासनाला आॅड-इव्हन फॉर्म्युला राबविता आला आहे. नागपुरात सध्यातरी ही स्थिती नसली तरी आगामी पाच वर्षात हीच अवस्था होणार आहे. नागपुरात उद्योग क्षेत्रात वाढ झाली आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गाड्यांच्या धुरामुळे निघणारे रासायनिक घटक वातावरणात पसरत आहे. ही धोक्याची घंटा नागपूरकर व प्रशासनाने ओळखण्याची गरज आहे.’-कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन विजिलतक्रारी करा‘प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहनांचे प्रदूषण तपासण्याची यंत्रणा नाही. शासनाने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शहरात ५ मोबाईल पीयुसी सेंटर आणि ५ एकाच जागी असलेले पीयुसी सेंटरची एजन्सी दिली आहे. परंतु या एजन्सीमार्फत शहानिशा न करताच प्रमाणपत्र देण्यात येते, अशा तक्रारी असल्यास नागरिकांनी त्याबाबत ‘आरटीओ कार्यालयात तक्रारी कराव्या.’-विजय चव्हाण,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी