शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

- तर राजधानीचा फॉर्म्युला उपराजधानीत

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

वाढत्या प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी राजधानी दिल्लीत १ जानेवारीपासून ‘आॅड इव्हन फॉर्म्युला’ ( सम-विषम

दयानंद पाईकराव/मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरवाढत्या प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी राजधानी दिल्लीत १ जानेवारीपासून ‘आॅड इव्हन फॉर्म्युला’ ( सम-विषम क्रमांकाच्या कार) चा महत्त्वाकांशी योजनेला प्रारंभ झाला आहे. वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी हा नियम उपयुक्त ठरेल असा दावा दिल्ली सरकारने केला आहे. उपराजधानीतही सध्याचे प्रदूषण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा फॉर्म्युला लागू करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.दिल्लीतील झालेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने ‘आॅड इव्हन फॉर्म्युला’ सुरू केला. या पार्श्वभूमीवर नागपुरातील प्रदूषणाबाबतची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.नागपुरात प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. परंतु या मंडळाच्यावतीने फक्त उद्योगातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात येते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाशी आमचा काही संबंध नसल्याची माहिती या कार्यालयातून मिळाली. उपराजधानीत दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. आरटीओ कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये दुचाकी वाहन ३४ हजार ४०५ होते. २०१४ मध्ये त्यात ४७ हजार २०४ वाहनांची भर पडली तर २०१५ मध्ये ५५ हजार ७०४ वाहनांची संख्या वाढली. सध्या शहरात एकूण १ लाख ३७ हजार ३१३ दुचाकी आहेत. शहरात २०१३ मध्ये ६ हजार २६२ चार चाकी वाहने होती. २०१४ मध्ये त्यात १ हजार ५९८ वाहनांची भर पडली तर २०१५ मध्ये १९ हजार ७६ चार चाकी वाहनांची संख्या वाढली. सध्या शहरात २६ हजार ९३६ चार चाकी वाहने आहेत. या वाहनातून कार्बन डाय आॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड, कार्बन मोनो आॅक्साईड हे प्रदुषण करणारे धूर निघतात. यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. या प्रदूषणाला रोखण्यासाठी कुठलीच यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे आगामी ५ वर्षात दिल्लीसारखाच ‘आॅड इव्हन फॉर्म्युला’ नागपुरातही बंधनकारक करावा लागणार आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.धोक्याची घंटा ओळखा‘दिल्ली शहरात प्रदूषणाची स्थिती निर्माण होण्यामागे दिल्लीच्या सभोवताली वाढलेले उद्योगाचे क्षेत्र आहे. या उद्योगातून निर्माण होणारे प्रदूषण दिल्लीत पसरते. या प्रदूषणाचे विघटन शक्य नसल्याने दिल्लीच्या वातावरणात धूर आणि धुळीमुळे स्मोग तयार झाला आहे. त्यातच दिल्लीत वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. दिल्लीच्या प्रशासनाला आॅड-इव्हन फॉर्म्युला राबविता आला आहे. नागपुरात सध्यातरी ही स्थिती नसली तरी आगामी पाच वर्षात हीच अवस्था होणार आहे. नागपुरात उद्योग क्षेत्रात वाढ झाली आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गाड्यांच्या धुरामुळे निघणारे रासायनिक घटक वातावरणात पसरत आहे. ही धोक्याची घंटा नागपूरकर व प्रशासनाने ओळखण्याची गरज आहे.’-कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन विजिलतक्रारी करा‘प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहनांचे प्रदूषण तपासण्याची यंत्रणा नाही. शासनाने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शहरात ५ मोबाईल पीयुसी सेंटर आणि ५ एकाच जागी असलेले पीयुसी सेंटरची एजन्सी दिली आहे. परंतु या एजन्सीमार्फत शहानिशा न करताच प्रमाणपत्र देण्यात येते, अशा तक्रारी असल्यास नागरिकांनी त्याबाबत ‘आरटीओ कार्यालयात तक्रारी कराव्या.’-विजय चव्हाण,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी