शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्या शाळेत प्रवेश करायचे?

By admin | Updated: March 13, 2017 02:04 IST

आर्थिक दुर्बल घटकासाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये राबविण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत

आरटीईत ‘एसएमएस’ चा बॅकलॉग पालक त्रस्त पहिल्या सोडतीत ६,८३८ बालकांची निवड नागपूर : आर्थिक दुर्बल घटकासाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये राबविण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत ८ मार्च रोजी संपन्न झाली. पहिल्या सोडतीत ६,८३८ बालकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या बालकांना व निवड न झालेल्या बालकांना तसे एसएमएस शिक्षण विभागाकडून पालकांना जाणार होते. परंतु आरटीईचे असे कुठलेही एसएमएस आम्हाला आले नसल्याची ओरड पालकांकडून होत आहे. मुलांची निवड झाली की नाही, या संभ्रमात पालक आहेत. ६२१ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत आरक्षित करण्यात आलेल्या ७,०९९ जागांसाठी २३,४६२ पालकांनी अर्ज दाखल केले होते. पहिली सोडत ८ मार्च रोजी पार पडली. यात ६,३३८ बालकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या बालकांना २० मार्चपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. निवड झाल्यासंदर्भात पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस शिक्षण विभागाकडून येणार होते. परंतु अद्यापही पालकांना असे कुठलेही एसएमएस मिळाले नसल्याने पालक संभ्रमात आहेत. दुसरीकडे ज्यांना एसएमएस मिळाले त्यांनी संबंधित शाळेत संपर्क साधला असता त्यांनाही अडचणी येत आहे. शाळांनी प्रवेश देतेवेळी शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे पैसे मागितले आहे. काही शाळांनी पालकांकडून १ किलोमीटरच्या आत रहिवासी असल्याच्या दाखल्याचे स्वतंत्र प्रतिज्ञापत्र मागितले असल्याची पालकांची तक्रार आहे. शाळेची मॅपिंग गुगलने केल्यानंतरही एक किलोमीटरची फेरतपासणीसुद्धा शाळांनी पालकांकडून करवून घेतल्याची माहिती आहे. हा प्रकार एकप्रकारे शिक्षण विभागाने राबविलेल्या आरटीईच्या प्रक्रियेवर आक्षेप घेणारा आहे. आरटीईचे प्रवेश देताना शाळा व्यवस्थापन कुठलाही दबाव आणू शकत नाही. जर शाळांकडून असे प्रकार होत असेल तर कारवाई होऊ शकते, असे आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे मो. शाहीद शरीफ यांचे मत आहे. (प्रतिनिधी) एसएमएस न मिळालेल्या पालकांना सूचना ज्या पालकांना निवड झाली अथवा झाली नाही यासंदर्भात एसएमएस मिळालेला नाही. अशा पालकांनी आरटीईच्या वेबसाईटवर जाऊन ‘अप्लिकेशन वाईज डिटीअल्स’ यावर क्लिक करून ‘अप्लिकेशन नंबर’ या कॉलममध्ये अर्जाचा क्रमांक टाकल्यास पाल्याच्या निवडीसंदर्भात माहिती पालकांना मिळेल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.