शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:11 IST

२०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले, तर थोडा दिलासा आयपीसीसीचा इशारा : भाग-३ श्रीमंत माने/निशांत वानखेडे नागपूर : जगभरातील ...

२०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले, तर थोडा दिलासा

आयपीसीसीचा इशारा : भाग-३

श्रीमंत माने/निशांत वानखेडे

नागपूर : जगभरातील प्रत्येकाला धडकी भरविणाऱ्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) अहवालाने जग जागे झाले व कार्बन डाय ऑक्साइडसह अन्य हरितवायूंचे उत्सर्जन थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली तरी पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी होईल का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, परतीचे दोर कापले गेले आहेत. पुढची तीस वर्षे तापमान वाढतच जाईल. सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल.

अतिउष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, समुद्रांच्या पातळीत धोकादायक वाढ, दीर्घकाळाचे दुष्काळ किंवा हिमशिखरांचे वितळणे हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आता वारंवार दिसू लागले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिका व कॅनडा हे देश अतिउष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाले. भारत, चीन, जर्मनीत महापुरांनी थैमान घातले. सायबेरिया, तुर्की, ग्रीसमध्ये जंगलाला भयंकर वणवा लागला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हिमालयामध्ये भूस्खलन, ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या साेमवारी जारी करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी अहवालात हवामानबदल किंवा तापमानवाढीचे जे परिणाम नोंदविले गेले आहेत, ते हेच आहेत आणि नजीकच्या भविष्यकाळात या घटना कमी होण्याची शक्यता नाही.

(समाप्त)

----------------------

शंभर टक्के प्रयत्न केले, तर दोन दशांशांचा दिलासा

* चार हजार पानांच्या आयपीसीसी अहवालाचा सार हाच आहे, की औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या कालखंडाचा विचार करता आताच पृथ्वीचे तापमान १.१ अंश सेल्शिअसने वाढले आहे.

* २०१५ चा पॅरिस करार गंभीरपणे घेण्यात आला नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे निघून गेली. आता या सहाव्या अहवालानंतर कडक पावले उचलली, तर २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात १.६ अंश सेल्शिअसइतकी वाढ होईल.

* एकविसाव्या शतकाच्या मध्यावर हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आणले तर ही वाढ रोखता येईल; परंतु कार्बन जाळायला, भूगर्भातील इंधन काढायला सुरुवात झाली त्या औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या टप्प्यावर कधीच पोहोचता येणार नाही. फारतर एकविसाव्या शतकाच्या अखेरीस तापमानातील वाढ १.४ अंश सेल्शिअसपर्यंत कमी होईल.

----------------------

असे मानले जाते की, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत येथील जीवसृष्टी पाच वेळा नष्ट झाली आहे. यापैकी डायनाेसार नामशेष हाेण्याचे उदाहरण सर्वांना परिचित आहे. आता सहाव्यांदा जीवसृष्टी नष्ट हाेण्यासाठी माणूसच जबाबदार असेल. हे सुंदर जग वाचविण्यासाठी आपल्या शेवटच्याच पिढीला प्रयत्न करावे लागतील; अन्यथा विनाश कुणीच राेखू शकणार नाही.

- भगवान केसभट, वातावरण फाउंडेशन, मुंबई