शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:11 IST

२०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले, तर थोडा दिलासा आयपीसीसीचा इशारा : भाग-३ श्रीमंत माने/निशांत वानखेडे नागपूर : जगभरातील ...

२०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले, तर थोडा दिलासा

आयपीसीसीचा इशारा : भाग-३

श्रीमंत माने/निशांत वानखेडे

नागपूर : जगभरातील प्रत्येकाला धडकी भरविणाऱ्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) अहवालाने जग जागे झाले व कार्बन डाय ऑक्साइडसह अन्य हरितवायूंचे उत्सर्जन थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली तरी पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी होईल का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, परतीचे दोर कापले गेले आहेत. पुढची तीस वर्षे तापमान वाढतच जाईल. सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल.

अतिउष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, समुद्रांच्या पातळीत धोकादायक वाढ, दीर्घकाळाचे दुष्काळ किंवा हिमशिखरांचे वितळणे हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आता वारंवार दिसू लागले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिका व कॅनडा हे देश अतिउष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाले. भारत, चीन, जर्मनीत महापुरांनी थैमान घातले. सायबेरिया, तुर्की, ग्रीसमध्ये जंगलाला भयंकर वणवा लागला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हिमालयामध्ये भूस्खलन, ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या साेमवारी जारी करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी अहवालात हवामानबदल किंवा तापमानवाढीचे जे परिणाम नोंदविले गेले आहेत, ते हेच आहेत आणि नजीकच्या भविष्यकाळात या घटना कमी होण्याची शक्यता नाही.

(समाप्त)

----------------------

शंभर टक्के प्रयत्न केले, तर दोन दशांशांचा दिलासा

* चार हजार पानांच्या आयपीसीसी अहवालाचा सार हाच आहे, की औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या कालखंडाचा विचार करता आताच पृथ्वीचे तापमान १.१ अंश सेल्शिअसने वाढले आहे.

* २०१५ चा पॅरिस करार गंभीरपणे घेण्यात आला नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे निघून गेली. आता या सहाव्या अहवालानंतर कडक पावले उचलली, तर २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात १.६ अंश सेल्शिअसइतकी वाढ होईल.

* एकविसाव्या शतकाच्या मध्यावर हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आणले तर ही वाढ रोखता येईल; परंतु कार्बन जाळायला, भूगर्भातील इंधन काढायला सुरुवात झाली त्या औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या टप्प्यावर कधीच पोहोचता येणार नाही. फारतर एकविसाव्या शतकाच्या अखेरीस तापमानातील वाढ १.४ अंश सेल्शिअसपर्यंत कमी होईल.

----------------------

असे मानले जाते की, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत येथील जीवसृष्टी पाच वेळा नष्ट झाली आहे. यापैकी डायनाेसार नामशेष हाेण्याचे उदाहरण सर्वांना परिचित आहे. आता सहाव्यांदा जीवसृष्टी नष्ट हाेण्यासाठी माणूसच जबाबदार असेल. हे सुंदर जग वाचविण्यासाठी आपल्या शेवटच्याच पिढीला प्रयत्न करावे लागतील; अन्यथा विनाश कुणीच राेखू शकणार नाही.

- भगवान केसभट, वातावरण फाउंडेशन, मुंबई