शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

तीनच्या प्रभागामुळे नगरसेवक व इच्छुकांचे वाढले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षांपासून विकास कामे बंद आहेत. त्यामुळे कंत्राटदारांकडून मिळणारे पाकीट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षांपासून विकास कामे बंद आहेत. त्यामुळे कंत्राटदारांकडून मिळणारे पाकीट बंद आहे.

त्यात तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत झाल्यामुळे निवडणुकीचा खर्च वाढणार आहे. हा एवढा खर्च कुठून करायचा या विचाराने बहुसंख्य नगरसेवक टेंशनमध्ये आले आहेत. विशेष म्हणजे बाशिंग बांधून असलेल्या इच्छुक उमेदवारांनीही तीन सदस्यीय प्रभागाचा धसका घेतला आहे.

एक सदस्यीय वॉर्डाच्या निवडणुकीसाठी पाच ते सहा लाखांचा खर्च येणार होता. मात्र, तीन सदस्यीय प्रभागामुळे खर्च २५ लाखांवर जाणार आहे. त्यात दोन वर्षांपासून प्रभागातील विकासकामांच्या फाईल प्रलंबित आहे. झोन स्तरावरील तीन लाखांपर्यंतच्या कामांनाही ब्रेक लावले आहे. कामे बंद असल्याने खिशात काहीच आलेले नाही. आवक थांबल्याने कमी खर्चाची वॉर्ड पद्धतीनुसार निवडणूक व्हावी, अशी इच्छा बहुसंख्य नगरसेवकांची होती. मात्र, तीन सदस्यीय प्रभागाने आर्थिक नियोजन बिघडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ऑगस्टमध्ये एक सदस्यीय पद्धतीनुसार वॉर्ड रचना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मनपाने प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच राज्य मंत्रिमंडळाने तीन सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे.

नागरिकांच्या इकडून तिकडे मारती चकरा....

- चार सदस्यीय प्रभागात नागरिकांना लहानसहान कामासाठी प्रभागातील चार नगरसेवकांकडे चकरा माराव्या लागतात. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीमुळे हा त्रास बंद होईल अशी आशा होती. परंतु, तीनचा प्रभाग झाल्याने आता नागरिकांना तीन नगरसेवकांकडे चकरा माराव्या लागणार आहे. त्यातही काम होईलच याची शाश्वती राहणार नाही.

...

४५ ते ५० हजार मतदारांना प्रभाग

- तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मनपा प्रशासनाला संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेत सरासरी ६० ते ७० हजार मतदार होते. तीन सदस्यीय प्रभागामुळे प्रभागांची संख्या ३८ वरून ५० होईल. तसेच प्रत्येक प्रभाग हा ४५ ते ५० हजार मतदारांचा राहील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

....

प्रत्येक प्रभागाची रचना नव्याने

प्रभाग रचना करताना साधारणत: झिगझॅग पद्धतीने होते. जुन्या रचनेतील पहिल्या तीन प्रभागांचा एक प्रभाग (वॉर्ड) होऊ शकेल. मात्र, त्यानंतर प्रत्येक प्रभागाची रचना नव्याने करावी लागणार आहे. नदी, नाले, आदींची भौगोलिक संलग्नता ठेवावी लागणार आहे. झेड या इंग्रजी अल्फाबेटनुसार उत्तरेकडून सुरुवात होऊन प्रभाग रचनेचा शेवट दक्षिणेला होईल. २००७, २०१२ आणि २०१७ प्रभागात काय आरक्षण होते, जनगणनेचे प्रगणक गट काढून त्यावर काय आरक्षण होते, त्यानुसार आरक्षण ठरणार आहे. त्यानंतर आरक्षण अंतिम केले जाईल.

.....

पाच वर्षांत चौथ्यांदा बदल

तत्कालीन भाजप -शिवसेना युती सरकारने १९ मे २०१६ रोजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा आदेश काढला होता. राज्यातील सर्व महापालिकांत ही पद्धती लागू करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश काढून नियमात दुरुस्ती केली होती. परंतु २०१९ ला राज्यात सत्ताबदल झाला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा आदेश २०२० मध्ये रद्द केला होता. आता पुन्हा महाविकास आघाडीने त्रिसदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला आहे.