शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची रिफंडसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकोपात आपली यात्रा रद्द करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकिाटच्या रिफंडसाठी भटकंती करावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकोपात आपली यात्रा रद्द करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकिाटच्या रिफंडसाठी भटकंती करावी लागत आहे. इतवारी रेल्वे स्टेशनवर तिकीट रद्द करण्यास येणाऱ्या प्रवाशांना रिफंड केले जात नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असल्याचा आरोप भारतीय यात्री केंद्राचे सचिव व मध्य रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य बसंत कुमार शुक्ला यांनी लावला आहे.

इतवारी स्टेशनवरून रिफंडसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पाठविले जात आहे. कोरोना संक्रमणामुळे गांधीबाग व इतवारी क्षेत्र सील करण्यात आले आहे. शिवाय, इतवारी ते नागपूर स्टेशनचे अंतर सहा किलोमीटर आहे. अशा स्थितीत इतवारी आरक्षण केंद्रावरच रिफंड सुविधा का उपलब्ध केली जात नाही. प्रवाशांना आपले तिकीट रद्द करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शुक्ला यांनी याबाबतची तक्रार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक विकास कश्यप यांच्याकडे केली आहे. सोबतच इतवारी स्टेशनवर अशा प्रकारे अनेकवेळा व्यवहार होत असतो. याचे पुरावेही त्यांच्याजवळ असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. इतवारी रेल्वे स्टेशनवरच तिकीट रिफंड करण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी कश्यप यांच्याकडे केली आहे.