शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

‘व्हीएनआयटी’च्या प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’ने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:48 IST

देशातील नामांकित तंत्रज्ञान शिक्षण संस्थेमध्ये गणना होत असलेल्या ‘व्हीएनआयटी’मधील प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’मुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे‘कॅम्पस’मधील विद्यार्थी दहशतीत : मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डंख’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील नामांकित तंत्रज्ञान शिक्षण संस्थेमध्ये गणना होत असलेल्या ‘व्हीएनआयटी’मधील प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’मुळे मृत्यू झाला आहे. सहायक प्राध्यापक डॉ.वीरेंद्र विक्रम अवस्थी असे त्यांचे नाव असून ते गणित विभागात सहायक प्राध्यापक होते. संस्थेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात डास झाले असून या सत्रात आतापर्यंत शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डेंग्यू’ची लागण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मनपाने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही समस्या मोठी झाली असल्याचा आरोप ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने केला आहे.वीरेंद्र अवस्थी हे ‘व्हीएनआयटी’च्या परिसरात राहत नसले तरी रात्री उशिरापर्यंत ते विभागात काम करत रहायचे. शिवाय त्यांचे निवासस्थान ‘व्हीएनआयटी’च्या जवळच होते. मागील आठवड्यापर्यंत ते चांगले कार्यरत होते. मात्र अचानक त्यांना ताप भरला व तपासणीअंती तो ‘डेंग्यू’ असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना रामदासपेठेतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र ‘प्लेटलेट्स’ची संख्या अतिशय कमी झाल्यामुळे उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यातच त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला. अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवस्थी यांच्या पश्चात पत्नी अलका, दोन मुले व अवघी तीन महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्यावर जबलपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.गणिताच्या क्षेत्रात अवस्थी यांचा सखोल अभ्यास होता व ‘अलझेब्रिक टोपोलॉजी’मध्ये त्यांचे संशोधन होते. कोलकाता येथील ‘आयआयएसईआर’ तसेच हैदराबाद येथे ‘बिट्स पिलानी’च्या ‘कॅम्पस’मध्येदेखील ते अगोदर कार्यरत होते.जुलै २०१६ पासून ते ‘व्हीएनआयटी’त शिकवत होते. त्यांच्या मृत्युमुळे ‘व्हीएनआयटी’त शोककळा पसरली होती. वसतिगृहांमधील अनेक विद्यार्थी तर दहशतीमध्ये आहेत.मनपा हलगर्जीपणा ?यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ.नरेंद्र चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी झालेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. ‘व्हीएनआयटी’ परिसरात मोठ्या प्रमाणात जुनी झाडे आहेत. परिसरात सुबाभूळ झाडांचे लक्षणीय प्रमाण असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा होते. मात्र सुबाभूळ झाडांमुळे या पाण्याच्या साठ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. सोबतच ‘फॉगिंग मशीन’देखील तेथे नेणे शक्य होत नाही. याबाबत आम्ही मनपाला कळविलेदेखील होते. मात्र दोन आठवडे उलटून गेल्यानंतरदेखील प्रशासनाने ‘डेंग्यू’ची बाब गंभीरतेने घेतली नाही. अखेर आम्ही सुमारे आमच्या पातळीवर औषधांची फवारणी केली व ६० झाडे कापली. मात्र त्यानंतर लगेच आम्हाला नोटीस देण्यात आली. मात्र ‘डेंग्यू’च्या नियंत्रणासाठी कुठलेही सहकार्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.२१५.२६ एकर क्षेत्रफळात ‘व्हीएनआयटी’चा विस्तार आहे. ‘व्हीएनआयटी’च्या परिसरातच विद्यार्थ्यांचे वसतिगृहदेखील आहे. पावसाळ्यानंतर परिसरातील काही भागांमध्ये पाणी साचले व त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. या साचलेल्या पाण्यात ‘डेंग्यू’च्या डासांची पैदास झाली व अनेक विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाली.मागील पंधरवड्यापर्यंत ‘व्हीएनआयटी’च्या इस्पितळात ५७ विद्यार्थ्यांवर उपचार झाले. मात्र अनेक विद्यार्थी उपचारांसाठी थेट खासगी दवाखान्यात गेले होते. आतापर्यंत येथील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डेंग्यू’ची लागण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विद्यार्थ्यांसोबत अधिकारी-कर्मचारीदेखील दहशतीत‘कॅम्पस’मध्ये अनेक प्राध्यापक, अधिकारी तसेच कर्मचाºयांचीदेखील निवासस्थाने आहेत. शिवाय अनेक प्राध्यापक, संशोधक रात्री उशिरापर्यंत विभागांमध्ये काम करत असतात. ‘व्हीएनआयटी’तील वसतिगृहांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सर्वाधिक ‘डेंग्यू’ची लागण झाली आहे. मात्र वीरेंद्र अवस्थी यांच्या मृत्यूनंतर सर्वांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.