शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

‘व्हीएनआयटी’च्या प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’ने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:48 IST

देशातील नामांकित तंत्रज्ञान शिक्षण संस्थेमध्ये गणना होत असलेल्या ‘व्हीएनआयटी’मधील प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’मुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे‘कॅम्पस’मधील विद्यार्थी दहशतीत : मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डंख’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील नामांकित तंत्रज्ञान शिक्षण संस्थेमध्ये गणना होत असलेल्या ‘व्हीएनआयटी’मधील प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’मुळे मृत्यू झाला आहे. सहायक प्राध्यापक डॉ.वीरेंद्र विक्रम अवस्थी असे त्यांचे नाव असून ते गणित विभागात सहायक प्राध्यापक होते. संस्थेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात डास झाले असून या सत्रात आतापर्यंत शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डेंग्यू’ची लागण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मनपाने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही समस्या मोठी झाली असल्याचा आरोप ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने केला आहे.वीरेंद्र अवस्थी हे ‘व्हीएनआयटी’च्या परिसरात राहत नसले तरी रात्री उशिरापर्यंत ते विभागात काम करत रहायचे. शिवाय त्यांचे निवासस्थान ‘व्हीएनआयटी’च्या जवळच होते. मागील आठवड्यापर्यंत ते चांगले कार्यरत होते. मात्र अचानक त्यांना ताप भरला व तपासणीअंती तो ‘डेंग्यू’ असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना रामदासपेठेतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र ‘प्लेटलेट्स’ची संख्या अतिशय कमी झाल्यामुळे उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यातच त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला. अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवस्थी यांच्या पश्चात पत्नी अलका, दोन मुले व अवघी तीन महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्यावर जबलपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.गणिताच्या क्षेत्रात अवस्थी यांचा सखोल अभ्यास होता व ‘अलझेब्रिक टोपोलॉजी’मध्ये त्यांचे संशोधन होते. कोलकाता येथील ‘आयआयएसईआर’ तसेच हैदराबाद येथे ‘बिट्स पिलानी’च्या ‘कॅम्पस’मध्येदेखील ते अगोदर कार्यरत होते.जुलै २०१६ पासून ते ‘व्हीएनआयटी’त शिकवत होते. त्यांच्या मृत्युमुळे ‘व्हीएनआयटी’त शोककळा पसरली होती. वसतिगृहांमधील अनेक विद्यार्थी तर दहशतीमध्ये आहेत.मनपा हलगर्जीपणा ?यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ.नरेंद्र चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी झालेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. ‘व्हीएनआयटी’ परिसरात मोठ्या प्रमाणात जुनी झाडे आहेत. परिसरात सुबाभूळ झाडांचे लक्षणीय प्रमाण असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा होते. मात्र सुबाभूळ झाडांमुळे या पाण्याच्या साठ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. सोबतच ‘फॉगिंग मशीन’देखील तेथे नेणे शक्य होत नाही. याबाबत आम्ही मनपाला कळविलेदेखील होते. मात्र दोन आठवडे उलटून गेल्यानंतरदेखील प्रशासनाने ‘डेंग्यू’ची बाब गंभीरतेने घेतली नाही. अखेर आम्ही सुमारे आमच्या पातळीवर औषधांची फवारणी केली व ६० झाडे कापली. मात्र त्यानंतर लगेच आम्हाला नोटीस देण्यात आली. मात्र ‘डेंग्यू’च्या नियंत्रणासाठी कुठलेही सहकार्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.२१५.२६ एकर क्षेत्रफळात ‘व्हीएनआयटी’चा विस्तार आहे. ‘व्हीएनआयटी’च्या परिसरातच विद्यार्थ्यांचे वसतिगृहदेखील आहे. पावसाळ्यानंतर परिसरातील काही भागांमध्ये पाणी साचले व त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. या साचलेल्या पाण्यात ‘डेंग्यू’च्या डासांची पैदास झाली व अनेक विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाली.मागील पंधरवड्यापर्यंत ‘व्हीएनआयटी’च्या इस्पितळात ५७ विद्यार्थ्यांवर उपचार झाले. मात्र अनेक विद्यार्थी उपचारांसाठी थेट खासगी दवाखान्यात गेले होते. आतापर्यंत येथील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डेंग्यू’ची लागण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विद्यार्थ्यांसोबत अधिकारी-कर्मचारीदेखील दहशतीत‘कॅम्पस’मध्ये अनेक प्राध्यापक, अधिकारी तसेच कर्मचाºयांचीदेखील निवासस्थाने आहेत. शिवाय अनेक प्राध्यापक, संशोधक रात्री उशिरापर्यंत विभागांमध्ये काम करत असतात. ‘व्हीएनआयटी’तील वसतिगृहांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सर्वाधिक ‘डेंग्यू’ची लागण झाली आहे. मात्र वीरेंद्र अवस्थी यांच्या मृत्यूनंतर सर्वांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.