शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

योजनेने बदलणार गावांचे ‘लूक’

By admin | Updated: July 6, 2014 00:52 IST

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत २०१० ते १४ या कालावधीत तिसऱ्या वर्षात जिल्ह्यातील २६९ ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या आहेत. या योजनेत मिळणाऱ्या निधीतून गावात उच्च प्रतिच्या भौतिक

पर्यावरण समृद्ध ग्राम योजना : २६९ गावात उच्च प्रतिच्या भौतिक सुविधांची निर्मितीनागपूर : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत २०१० ते १४ या कालावधीत तिसऱ्या वर्षात जिल्ह्यातील २६९ ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या आहेत. या योजनेत मिळणाऱ्या निधीतून गावात उच्च प्रतिच्या भौतिक सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया आहे. यात टप्प्या टप्प्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या वर्षात ७५३, दुसऱ्या वर्षात ६६१ ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. प्रत्येक वर्षासाठी निवडीचे व पात्रतेचे वेगवेगळे निकष ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी दिली.या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या १० हजाराहून अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला तीन वर्षात ३० लाखांचे अनुदान दिले जाते. तर तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या ग्राम पंचायतीला ३६ लाखांचे अनुदान दिले जाते. ७ ते १० हजारापर्यंत लोकसंख्येच्या गावाला २४ लाख, ५ ते ७ हजार लोकसंख्येला १५ लाख, २ ते ५ हजारापर्यंत १२ लाख, १ हजार ते २ हजारापर्यंत ९ तर १ हजारापर्यंत लोकसंख्येच्या गावाला ६ लाखांचे अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून गावातील विकासाला चालना मिळाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निकष पूर्ण केले जातात. परंतु तिसऱ्या टप्प्यातील निकष अनेक ग्रामपंचायती पूर्ण करीत नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)तिसऱ्या टप्प्यातील निकषग्रामपंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली असावी. निर्मलग्राम पुरस्कारासाठी राज्याने शिफारस केलेली असावी. थकबाकीसह ९० टक्के करवसुली, कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी, मूर्ती विसर्जन करताना प्रदूषणाच्या दृष्टीने उपाययोजना करणे, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व यशवंत पंचायत राज अभियानात प्रत्येकी किमान ६० टक्के गुण, अपारंपरिक उर्जेचे १०० टक्के स्ट्रीट लाईट, घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून १०० टक्के खत निर्मिती व सांडपाणी व्यवस्थापनाचे ७५ टक्के काम होणे गरजेचे आहे. उद्दिष्टेपर्यावरण समतोल राखण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा विकास व लोकसहभाग, इको व्हिलेजची संकल्पना राबविणे, राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे, मोठ्या ग्रा.पं.च्या पर्यावरण विकास आराखडा व ग्राम विकास आराखडा तयार करून शहराच्या तोडीच्या सुविधा निर्माण करणे.शहरी तोडीच्या सुविधायोजनेतून पर्यावरण संवर्धन जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावाची निर्मिती करणे, गावात उच्च प्रतिच्या भौतिक व मूलभूत सुविधांची निर्मिती करणे, मूल्यवर्धित स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणे, जल, जमीन, जंगल, हवा व वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन करून भौतिक सुविधांची निर्मिती पर्यावण संतुलन राखून करणे त्याद्वारे ग्रामस्थांच्या जीवनमान दर्जा सुधारणे, ग्राम पर्यावरणविषयक आराखडा तयार करून शहरी तोडीच्या सुविधा निर्माण करण्याचा हेतू या योजनेच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती वासुदेव भांडारकर यांनी दिली.