शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग

By admin | Updated: July 6, 2016 03:18 IST

आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. हीच बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपराजधानीतील विविध शाळांकडून अनेक प्रयोग राबविण्यात येत आहेत.

सर्वांगीण विकासावर शाळांचा भर : अभ्यासाला प्रत्यक्ष अनुभवाची जोडनागपूर : आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. हीच बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपराजधानीतील विविध शाळांकडून अनेक प्रयोग राबविण्यात येत आहेत. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आलेल्या नागपुरातील शाळांमधील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग उलगडले. भिंतीपलीकडचे शिक्षण व शाळांतर्फे राबविण्यात येणारे विविध कल्पक उपक्रम समोर यावेत, यासाठी ‘लोकमत’तर्फे सोमवारी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शाळांमधून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या सामाजिक संस्कारांचे अनुभव समोर आले. काही शाळा नाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकातील ज्ञान पोहोचवितात, तर काही शाळा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिकलीची जाणीव वाढविण्यावर भर देतात. विशेष म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांचा संवाद वाढीस लागावा, यासाठी बहुतांश ठिकाणी प्रयत्न केले जातात. शाळेतील संस्कारांतून आयुष्यात प्रगतीची शिखरे गाठणारे विद्यार्थी शाळेत आल्यावर अभिमान वाटतो, हे शिक्षकांचे बोल या प्रयोगांची शक्ती सांगून गेले.नाट्यांमधून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडेकेवळ अभ्यासावरच आमच्या शाळेत भर देण्यात येतो असे नाही तर विद्यार्थ्यांना क्रीडा, नाट्य इत्यादींबाबतदेखील मंच उपलब्ध करुन देण्यात येतो. महिन्यातील दोन शनिवार तर इतर अवांतर उपक्रमच चालतात. यात पोहणे, अश्वारोहण, तायक्वांडो इत्यादी बाबी घेण्यात येतात. याशिवाय विद्यार्थ्यांना इतिहासाचे विविध धडे नाट्यांच्या माध्यमातून समजाविण्यात येतात. विविध उत्सवांच्या वेळीदेखील लहानसे नाट्य बसवून त्या उत्सवाचे महत्त्व सांगितल्या जाते. याशिवाय शाळेत पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करण्यात येते. ई-लर्निंग, डिजिटल स्कूलची संकल्पना शाळेत रुजविली आहेच. सोबतच अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. - सुजाता पशीने, वरिष्ठ शिक्षिका, आदर्श संस्कार विद्यालयपारंपरिक संस्कारांची शिदोरीआजच्या काळात ‘टीनएजर्स’ विद्यार्थ्यांवर पाश्चात्त्यकरणाचा पगडा असल्याचे दिसून येते. आमच्या शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना पारंपरिक संस्कारांची शिदोरी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थी पायरीला नमस्कार करूनच येतात. लहान मुलांमध्ये मिळूनमिसळून राहण्याची भावना वाढीस लागावी यासाठी भातुकलीची संकल्पना राबवतो. याशिवाय विविध विषयांवर गटचर्चा, विज्ञान प्रदर्शन यातून विद्यार्थ्यांचे ज्ञान मजबूत करण्यावर भर असतो. ‘कुटुंब रंगलेय रंगात’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवतो. शिवाय हस्ताक्षर सुधारणा, योगासने हे उपक्रमदेखील सुरुच असतात.-वर्षा अडगावकर, मुख्याध्यापिका, हिंदू ज्ञानपीठ विद्यालयसामाजिक बांधिलकीचे विद्यार्थ्यांवर संस्कारआमच्या शाळेत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्लब घटकांतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या मुलांना घरी शैक्षणिक वातावरण मिळत नाही. परंतु आम्ही त्यांना शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीचे धडे देतो. केवळ वर्गातच नाही, विद्यार्थी घरी गेल्यानंतरदेखील शिक्षकांना त्यांची काळजी असते. दोन दिवस विद्यार्थी शाळेत आला नाही तर शिक्षक त्याची विचारपूस करायला घरी जातात. किशोरवयातील मुलामुलींच्या विविध समस्या असतात. या वयात विद्यार्थी भरकटणार नाहीत, यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. सोबतच नियमितपणे कथाकथन, गीतगायन स्पर्धा यांच्यातून त्यांची भाषा चांगली कशी होईल याकडे आमचे लक्ष असते. -मीनल रेवतकर, मुख्याध्यापिका, विवेकानंद विद्यालय