शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग

By admin | Updated: July 6, 2016 03:18 IST

आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. हीच बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपराजधानीतील विविध शाळांकडून अनेक प्रयोग राबविण्यात येत आहेत.

सर्वांगीण विकासावर शाळांचा भर : अभ्यासाला प्रत्यक्ष अनुभवाची जोडनागपूर : आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. हीच बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपराजधानीतील विविध शाळांकडून अनेक प्रयोग राबविण्यात येत आहेत. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आलेल्या नागपुरातील शाळांमधील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग उलगडले. भिंतीपलीकडचे शिक्षण व शाळांतर्फे राबविण्यात येणारे विविध कल्पक उपक्रम समोर यावेत, यासाठी ‘लोकमत’तर्फे सोमवारी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शाळांमधून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या सामाजिक संस्कारांचे अनुभव समोर आले. काही शाळा नाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकातील ज्ञान पोहोचवितात, तर काही शाळा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिकलीची जाणीव वाढविण्यावर भर देतात. विशेष म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांचा संवाद वाढीस लागावा, यासाठी बहुतांश ठिकाणी प्रयत्न केले जातात. शाळेतील संस्कारांतून आयुष्यात प्रगतीची शिखरे गाठणारे विद्यार्थी शाळेत आल्यावर अभिमान वाटतो, हे शिक्षकांचे बोल या प्रयोगांची शक्ती सांगून गेले.नाट्यांमधून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडेकेवळ अभ्यासावरच आमच्या शाळेत भर देण्यात येतो असे नाही तर विद्यार्थ्यांना क्रीडा, नाट्य इत्यादींबाबतदेखील मंच उपलब्ध करुन देण्यात येतो. महिन्यातील दोन शनिवार तर इतर अवांतर उपक्रमच चालतात. यात पोहणे, अश्वारोहण, तायक्वांडो इत्यादी बाबी घेण्यात येतात. याशिवाय विद्यार्थ्यांना इतिहासाचे विविध धडे नाट्यांच्या माध्यमातून समजाविण्यात येतात. विविध उत्सवांच्या वेळीदेखील लहानसे नाट्य बसवून त्या उत्सवाचे महत्त्व सांगितल्या जाते. याशिवाय शाळेत पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करण्यात येते. ई-लर्निंग, डिजिटल स्कूलची संकल्पना शाळेत रुजविली आहेच. सोबतच अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. - सुजाता पशीने, वरिष्ठ शिक्षिका, आदर्श संस्कार विद्यालयपारंपरिक संस्कारांची शिदोरीआजच्या काळात ‘टीनएजर्स’ विद्यार्थ्यांवर पाश्चात्त्यकरणाचा पगडा असल्याचे दिसून येते. आमच्या शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना पारंपरिक संस्कारांची शिदोरी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थी पायरीला नमस्कार करूनच येतात. लहान मुलांमध्ये मिळूनमिसळून राहण्याची भावना वाढीस लागावी यासाठी भातुकलीची संकल्पना राबवतो. याशिवाय विविध विषयांवर गटचर्चा, विज्ञान प्रदर्शन यातून विद्यार्थ्यांचे ज्ञान मजबूत करण्यावर भर असतो. ‘कुटुंब रंगलेय रंगात’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवतो. शिवाय हस्ताक्षर सुधारणा, योगासने हे उपक्रमदेखील सुरुच असतात.-वर्षा अडगावकर, मुख्याध्यापिका, हिंदू ज्ञानपीठ विद्यालयसामाजिक बांधिलकीचे विद्यार्थ्यांवर संस्कारआमच्या शाळेत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्लब घटकांतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या मुलांना घरी शैक्षणिक वातावरण मिळत नाही. परंतु आम्ही त्यांना शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीचे धडे देतो. केवळ वर्गातच नाही, विद्यार्थी घरी गेल्यानंतरदेखील शिक्षकांना त्यांची काळजी असते. दोन दिवस विद्यार्थी शाळेत आला नाही तर शिक्षक त्याची विचारपूस करायला घरी जातात. किशोरवयातील मुलामुलींच्या विविध समस्या असतात. या वयात विद्यार्थी भरकटणार नाहीत, यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. सोबतच नियमितपणे कथाकथन, गीतगायन स्पर्धा यांच्यातून त्यांची भाषा चांगली कशी होईल याकडे आमचे लक्ष असते. -मीनल रेवतकर, मुख्याध्यापिका, विवेकानंद विद्यालय