शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग

By admin | Updated: July 6, 2016 03:18 IST

आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. हीच बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपराजधानीतील विविध शाळांकडून अनेक प्रयोग राबविण्यात येत आहेत.

सर्वांगीण विकासावर शाळांचा भर : अभ्यासाला प्रत्यक्ष अनुभवाची जोडनागपूर : आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. हीच बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपराजधानीतील विविध शाळांकडून अनेक प्रयोग राबविण्यात येत आहेत. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आलेल्या नागपुरातील शाळांमधील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग उलगडले. भिंतीपलीकडचे शिक्षण व शाळांतर्फे राबविण्यात येणारे विविध कल्पक उपक्रम समोर यावेत, यासाठी ‘लोकमत’तर्फे सोमवारी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शाळांमधून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या सामाजिक संस्कारांचे अनुभव समोर आले. काही शाळा नाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकातील ज्ञान पोहोचवितात, तर काही शाळा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिकलीची जाणीव वाढविण्यावर भर देतात. विशेष म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांचा संवाद वाढीस लागावा, यासाठी बहुतांश ठिकाणी प्रयत्न केले जातात. शाळेतील संस्कारांतून आयुष्यात प्रगतीची शिखरे गाठणारे विद्यार्थी शाळेत आल्यावर अभिमान वाटतो, हे शिक्षकांचे बोल या प्रयोगांची शक्ती सांगून गेले.नाट्यांमधून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडेकेवळ अभ्यासावरच आमच्या शाळेत भर देण्यात येतो असे नाही तर विद्यार्थ्यांना क्रीडा, नाट्य इत्यादींबाबतदेखील मंच उपलब्ध करुन देण्यात येतो. महिन्यातील दोन शनिवार तर इतर अवांतर उपक्रमच चालतात. यात पोहणे, अश्वारोहण, तायक्वांडो इत्यादी बाबी घेण्यात येतात. याशिवाय विद्यार्थ्यांना इतिहासाचे विविध धडे नाट्यांच्या माध्यमातून समजाविण्यात येतात. विविध उत्सवांच्या वेळीदेखील लहानसे नाट्य बसवून त्या उत्सवाचे महत्त्व सांगितल्या जाते. याशिवाय शाळेत पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करण्यात येते. ई-लर्निंग, डिजिटल स्कूलची संकल्पना शाळेत रुजविली आहेच. सोबतच अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. - सुजाता पशीने, वरिष्ठ शिक्षिका, आदर्श संस्कार विद्यालयपारंपरिक संस्कारांची शिदोरीआजच्या काळात ‘टीनएजर्स’ विद्यार्थ्यांवर पाश्चात्त्यकरणाचा पगडा असल्याचे दिसून येते. आमच्या शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना पारंपरिक संस्कारांची शिदोरी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थी पायरीला नमस्कार करूनच येतात. लहान मुलांमध्ये मिळूनमिसळून राहण्याची भावना वाढीस लागावी यासाठी भातुकलीची संकल्पना राबवतो. याशिवाय विविध विषयांवर गटचर्चा, विज्ञान प्रदर्शन यातून विद्यार्थ्यांचे ज्ञान मजबूत करण्यावर भर असतो. ‘कुटुंब रंगलेय रंगात’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवतो. शिवाय हस्ताक्षर सुधारणा, योगासने हे उपक्रमदेखील सुरुच असतात.-वर्षा अडगावकर, मुख्याध्यापिका, हिंदू ज्ञानपीठ विद्यालयसामाजिक बांधिलकीचे विद्यार्थ्यांवर संस्कारआमच्या शाळेत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्लब घटकांतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या मुलांना घरी शैक्षणिक वातावरण मिळत नाही. परंतु आम्ही त्यांना शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीचे धडे देतो. केवळ वर्गातच नाही, विद्यार्थी घरी गेल्यानंतरदेखील शिक्षकांना त्यांची काळजी असते. दोन दिवस विद्यार्थी शाळेत आला नाही तर शिक्षक त्याची विचारपूस करायला घरी जातात. किशोरवयातील मुलामुलींच्या विविध समस्या असतात. या वयात विद्यार्थी भरकटणार नाहीत, यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. सोबतच नियमितपणे कथाकथन, गीतगायन स्पर्धा यांच्यातून त्यांची भाषा चांगली कशी होईल याकडे आमचे लक्ष असते. -मीनल रेवतकर, मुख्याध्यापिका, विवेकानंद विद्यालय