शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालाने विद्यार्थ्यांची उडविली झोप; शिक्षक म्हणतात ‘डोन्टवरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

नागपूर : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. म्हणजेच दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के व बारावीचे ४० ...

नागपूर : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. म्हणजेच दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के व बारावीचे ४० टक्के असे गुणदान विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. अकरावीकडे बहुतांश विद्यार्थी रेस्ट इयर म्हणून बघत असतात. त्यामुळे गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली असून, शिक्षक मात्र विद्यार्थ्यांनो काळजी करू नका असे सांगताहेत.

बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाचा दिलेल्या फार्म्युल्यानुसार दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा आमच्या गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. या फाॅर्म्युल्यानुसार अकरावी विद्यार्थ्यांचा घात करेल असे त्यांना वाटते आहे. तज्ञांच्या मतेही विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला ‘रेस्ट इयर’ म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात. पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक ज्युनि. कॉलेजच्या अकरावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात अथवा स्लममधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचण येईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. पण अकरावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळजी करू नका, असा सल्ला दिला आहे. दहावीसारखाच बारावीचाही निकाल लागले, विद्यार्थ्यांना चांगलेच गुण मिळतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

- विभागातील बारावीचे विद्यार्थी

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडे एप्रिल २०२१ च्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी - १४६९९१

नागपूर विभागातील सीबीएससी बोर्डात एप्रिल २०२१ च्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी - १८६५३

- विद्यार्थी काय म्हणतात

विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो बारावीची तयारी करतो. त्यासाठी अकरावीकडे दुर्लक्षच करतो. त्यामुळे गुणांवर परिणामही होतो; पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो. अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे; पण बोर्डाने दिलेल्या फाॅर्म्युलामुळे आमचे नुकसान होणार अशी खात्री आहे.

सम्यका गजघाटे, विद्यार्थिनी ()

- आम्ही अकरावीत असताना कोरोना आला. त्यामुळे अकरावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. बारावीत चांगले गुण मिळतील या अपेक्षेने मेहनतही घेतली; पण कोरोनामुळे परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे; पण आता पर्याय नाही.

तनु पाटील, विद्यार्थिनी ()

- शिक्षक काय म्हणतात

- फाॅर्म्युल्यानुसार दहावीतील बेस्ट ऑफ ३ ची सरासरी घ्यायला सांगितले. त्यानुसार दहावीत ज्या मुलाला ६० टक्के असेल आणि ३ विषयात चांगले गुण असेल तर त्याच्या गुणाची सरासरी ७० टक्केवर जाईल. दहावीच्या गुणांच्या सरासरी आधारावर बारावीचे मूल्यांकन करायचे आहे. त्यामुळे बारावीत विद्यार्थ्यांचे गुण कमी न होता वाढणारच आहे.

मनोज हेडाऊ, प्राध्यापक ()

- बहुतांश विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर म्हणून बघतात. पण कोरोनाने विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष महत्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. मंडळाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार अकरावीच्या गुणालाही महत्व आले आहे. विद्यार्थी नापास होणार नाही, पण अकरावीच्या गुणांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर काहीसा परिणाम होईल.

राहुल गौर, प्राध्यापक ()

- सीबीएसई बोर्डाच्या निकालाचेही मूल्यांकन स्टेट बोर्डासारखे करायचे आहे. पण सीबीएससीचा विद्यार्थी अकरावीत नियमित शाळेत आला. बारावीचे ऑनलाईन वर्गही त्याने नियमित केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलेच गुण मिळणार आहे. उलट जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत होते, त्यांना यावर्षी फायदा होणार आहे. सीबीएसईच्या हुशार विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळतील.

शन्मुख ठाकरे, प्राध्यापक ()