शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालाने विद्यार्थ्यांची उडविली झोप; शिक्षक म्हणतात ‘डोन्टवरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

नागपूर : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. म्हणजेच दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के व बारावीचे ४० ...

नागपूर : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. म्हणजेच दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के व बारावीचे ४० टक्के असे गुणदान विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. अकरावीकडे बहुतांश विद्यार्थी रेस्ट इयर म्हणून बघत असतात. त्यामुळे गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली असून, शिक्षक मात्र विद्यार्थ्यांनो काळजी करू नका असे सांगताहेत.

बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाचा दिलेल्या फार्म्युल्यानुसार दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा आमच्या गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. या फाॅर्म्युल्यानुसार अकरावी विद्यार्थ्यांचा घात करेल असे त्यांना वाटते आहे. तज्ञांच्या मतेही विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला ‘रेस्ट इयर’ म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात. पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक ज्युनि. कॉलेजच्या अकरावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात अथवा स्लममधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचण येईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. पण अकरावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळजी करू नका, असा सल्ला दिला आहे. दहावीसारखाच बारावीचाही निकाल लागले, विद्यार्थ्यांना चांगलेच गुण मिळतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

- विभागातील बारावीचे विद्यार्थी

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडे एप्रिल २०२१ च्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी - १४६९९१

नागपूर विभागातील सीबीएससी बोर्डात एप्रिल २०२१ च्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी - १८६५३

- विद्यार्थी काय म्हणतात

विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो बारावीची तयारी करतो. त्यासाठी अकरावीकडे दुर्लक्षच करतो. त्यामुळे गुणांवर परिणामही होतो; पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो. अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे; पण बोर्डाने दिलेल्या फाॅर्म्युलामुळे आमचे नुकसान होणार अशी खात्री आहे.

सम्यका गजघाटे, विद्यार्थिनी ()

- आम्ही अकरावीत असताना कोरोना आला. त्यामुळे अकरावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. बारावीत चांगले गुण मिळतील या अपेक्षेने मेहनतही घेतली; पण कोरोनामुळे परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे; पण आता पर्याय नाही.

तनु पाटील, विद्यार्थिनी ()

- शिक्षक काय म्हणतात

- फाॅर्म्युल्यानुसार दहावीतील बेस्ट ऑफ ३ ची सरासरी घ्यायला सांगितले. त्यानुसार दहावीत ज्या मुलाला ६० टक्के असेल आणि ३ विषयात चांगले गुण असेल तर त्याच्या गुणाची सरासरी ७० टक्केवर जाईल. दहावीच्या गुणांच्या सरासरी आधारावर बारावीचे मूल्यांकन करायचे आहे. त्यामुळे बारावीत विद्यार्थ्यांचे गुण कमी न होता वाढणारच आहे.

मनोज हेडाऊ, प्राध्यापक ()

- बहुतांश विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर म्हणून बघतात. पण कोरोनाने विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष महत्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. मंडळाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार अकरावीच्या गुणालाही महत्व आले आहे. विद्यार्थी नापास होणार नाही, पण अकरावीच्या गुणांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर काहीसा परिणाम होईल.

राहुल गौर, प्राध्यापक ()

- सीबीएसई बोर्डाच्या निकालाचेही मूल्यांकन स्टेट बोर्डासारखे करायचे आहे. पण सीबीएससीचा विद्यार्थी अकरावीत नियमित शाळेत आला. बारावीचे ऑनलाईन वर्गही त्याने नियमित केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलेच गुण मिळणार आहे. उलट जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत होते, त्यांना यावर्षी फायदा होणार आहे. सीबीएसईच्या हुशार विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळतील.

शन्मुख ठाकरे, प्राध्यापक ()