शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सरकारी तपासणी केंद्रांवर तीन दिवस ‘आरटीपीसीआर’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. नागपुरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. नागपुरात रविवारी रेकॉर्ड २६ हजारांहून अधिक चाचण्या झाल्या. परंतु पुढील तीन दिवस चाचण्या रामभरोसेच राहणार आहेत. १२ आणि १४ एप्रिल रोजी सरकारी केंद्रांवर ‘आरटीपीसीआर’ चाचणी होणार नाही. तर १३ एप्रिल लोजी गुढीपाडव्यामुळे चाचणी केंद्र बंद राहतील. मनपाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. अचानकपणे चाचण्यांना ‘ब्रेक’ लावण्याचे नेमके कारण काय आणि संसर्ग बेलगाम झाल्यानंतर बाधितांमध्ये आणखी वाढ झाली तर याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचे अहवाल मिळायला विलंब होत आहे. या ‘बॅकलॉग’ला पूर्ण करणे व इतर काही तांत्रिक कारणांमुळे सरकारी चाचणी केंद्रांवर सोमवार व बुधवारी केवळ ‘रॅपिड ॲन्टिजेन’ चाचणीच होईल. प्रशासकीय पातळीवर अधिकारी व मंत्रीदेखील चाचण्यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ॲन्टिजेनच्या अहवालाला अंतिम मानले जाऊ शकत नाही.

लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करणार : आयुक्त

‘कोरोना’ चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे मेडिकल, मेयो, एम्स, नागपूर विद्यापीठातील प्रयोगशाळांवर ओझे वाढले आहे. यामुळेच चाचणीचा अहवाल मिळण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. या प्रयोगशाळांचा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी सोमवारी व बुधवारी सर्व ४२ शासकीय चाचणी केंद्रांवर केवळ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या होतील. केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची विशेष व्यवस्था करण्यात येईल, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले.