शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सिकलसेलग्रस्तांना एस.टी.चा फटका

By admin | Updated: January 23, 2015 02:51 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत प्रवासाचा लाभ सिकलसेलग्रस्तांना मिळावा म्हणून शासनाने १५.११ कोटींची तरतूद केली खरी, मात्र प्रशासकीय

नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत प्रवासाचा लाभ सिकलसेलग्रस्तांना मिळावा म्हणून शासनाने १५.११ कोटींची तरतूद केली खरी, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सिकलसेलचे रुग्ण या लाभापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या समस्येसोबतच सिकलसेलग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सिकलसेल केंद्र नागपूरला हलवावे, अशी मागणी सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी केली आहे.रामटेके यांना माहितीच्या अधिकाऱ्यात मिळालेल्या माहितीनुसार शासनाने २०१४-१५ साठी १५.११ कोटी रु पये सिकलसेलग्रस्तांना दिले आहेत. यात आदिवासी विभागाने १२.५६ कोटी, सामाजिक न्याय विभागाने १.८८ कोटी रु पये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने ०.६६ कोटी रु पये दिलेले आहेत. परंतु ही रक्कम एसटी महामंडळाकडे वळतीच करण्यात आलेली नाही.सिकलसेल आजाराची जागतिक स्तरावर गंभीर आजारांमध्ये नोंद आहे. सिकलसेल रु ग्णांवर नेहमी मृत्यूची तलवार टांगलेलीच असते, अशा रु ग्णांचा जीव वाचवणारे औषधोपचार फक्त शासकीय जिल्हा रु ग्णालये किंवा शासकीय वैद्यक महाविद्यालयांमध्येच उपलब्ध आहेत. विशेषत: या आजाराचे रुग्ण मुख्यत्वे खेड्यापाड्यात, आदिवासी व मागासवर्गीयात आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून गेल्या १४ वर्षांपासून एस.टी. बस प्रवास भाड्यात सवलत मिळावी म्हणून रामटेके प्रयत्नशील होते. त्यांनी आंदोलनेही केली. अखेर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या रु ग्णांना एका मदतनिसासह मोफत एस.टी. प्रवासाची सवलतीची घोषणा केली. २०१४-१५ साठी १५.११ कोटी रु पयांची तरतूदही करण्यात आली. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही रक्कम एसटी महामंडळाकडे वळतीच केली नाही. परिणामी नागपूरसह विदर्भातील अडीच लाख सिकलसेलग्रस्त या लाभापासून वंचित राहिले आहेत. (प्रतिनिधी)