शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

श्रीसूर्या समूहावरकाय कारवाई केली?

By admin | Updated: July 17, 2014 01:09 IST

शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहावर आतापर्यंत काय कारवाई केली यासंदर्भात येत्या दोन आठवड्यात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्टाची विचारणा : शासनाला मागितले प्रतिज्ञापत्रनागपूर : शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहावर आतापर्यंत काय कारवाई केली यासंदर्भात येत्या दोन आठवड्यात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी आज बुधवारी दिलेत.फेब्रुवारी-२०१३ मध्ये घोटाळा उघडकीस आल्यानंतर शासनाने श्रीसूर्या समूहाची मालमत्ता त्वरित ताब्यात घेणे आवश्यक होते. परंतु, वेगवान कारवाई झाली नसल्याने समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीला मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी भरपूर वेळ मिळाला, असे याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरील निर्देश दिलेत. श्रीसूर्या समूह घोटाळ्यासंदर्भातील विविध याचिकांवर न्यायालयात एकत्र सुनावणी करण्यात येत आहे. श्रीसूर्या पीडित ठेवीदार कृती समितीने याप्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत तपास करण्याची विनंती केली आहे. शेकडो गुंतवणुकदारांच्या ठेवी स्वीकारणारी श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनी ही भागीदारी कायदा व कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत नाही. तसेच, या कंपनीने गुंतवणूक योजना राबविताना रिझर्व्ह बँकेची परवानगीही घेतली नव्हती. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णू भोये यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हा खुलासा केला होता. जोशी दाम्पत्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हित व संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीरला १५ आॅक्टोबर, तर पल्लवीला २९ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. १२ डिसेंबर रोजी जेएमएफसी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी २१ साक्षीदार व १८२ गुंतवणुकदारांचे बयान नोंदविले आहे. ५ लाख ५० हजार रुपये जमा असलेली ६० बँक खाती व १४ कोटी ६५ लाख ६ हजार २८१ रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केल्याची माहिती भोये यांनी दिली होती. शासनातर्फे एपीपी संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)