शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समितीला शाळांचा ठेंगा

By admin | Updated: January 12, 2016 02:47 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली आहे.

१० हजार शाळांमधून फक्त १३८ शाळेत परिवहन समिती : कशी होणार विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक?सुमेध वाघमारे  नागपूरविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा या उद्देशातून सर्वच शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे शासनाचा आदेश आहे. परंतु नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास १० हजार शाळांमधून केवळ १३८ शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन झाली आहे. एकीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलीस विभाग मोठा गाजावाजा करून रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करीत असताना दुसरीकडे या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविण्यात येतात. आयुर्मान संपलेल्या वाहनामार्फतही वाहतूक सुरू असते. यामुळे अशा वाहनांचे अपघात होऊन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येतो. यापूर्वी अनेक घटनांमधून ही बाब पुढे आली आहे. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा बस धोरण तयार केले. यामध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली तयार करण्यात आली. तसेच जिल्हा तसेच शाळास्तरांवर शालेय परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. परंतु गेल्या पाच वर्षांत याची कोणीच गंभीरतेने दखल घेतली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी परिवहन समितीला शाळांचा ठेंगानागपूर : जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून सुमारे १० हजारांवर शाळा असताना केवळ १३८ शाळांमध्येच परिवहन समिती असल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) आहे. समितीची जबाबदारी परिवहन शुल्क निश्चित करणे, बसथांबे निश्चित करणे, वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, वाहनातील अग्निशामक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी आदीची पडताळणी करणे, वाहनांचे वेळापत्रक व मार्ग निश्चित करणे, ट्रॅफिक वॉर्डनच्या मदतीने वाहतूक नियंत्रण करणे व विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे चढ-उतार करणे, शाळेने बस वाहतूकदारांशी करार केला आहे किंवा नाही हे पाहणे व प्रत्येक शालेय बसमध्ये मदतनीस असल्याची खात्री करणे.शासकीय शाळाही उदासीननागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ३९२०, माध्यमिक शाळा १०३६ तर महानगरपालिकेच्या शाळा १११ असे एकूण ५०६७ शाळा आहेत. यातील २५३० प्राथमिक, ४३८ माध्यमिक आणि मनपाच्या १०१ शाळा असे मिळून ३०६९ शाळांमध्येच शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची नोंद आरटीओकडे आहे. मात्र, यातील बहुसंख्य शाळांनी समिती स्थापन झाल्याचे मिनिटस् आरटीओकडे पाठविलेच नाही. केवळ १३८ खासगी आणि शासकीय शाळांचे मिनिटस् आरटीओला प्राप्त झाले आहे. असे आहेत नियमविद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी, ते कोणत्या वाहनातून शाळा-महाविद्यालयात जातात-येतात याची नोंद शासन पातळीवर राहावी, या उद्देशाने २०११ मध्ये राज्य सरकारच्या परिवहन विभागाने प्रत्येक शाळा अथवा महाविद्यालयात शालेय परिवहन समिती तयार करणे अनिवार्य केले. यात ज्या शाळांमधील विद्यार्थी स्कूलबस किंवा रिक्षाने येत नाहीत त्या शाळांनाही समिती तयार करण्याचे आदेश आहेत.