शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

वाजायला लागले सनई-चौघडे, २०० लोकांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST

- मंगल कार्यालय संचालकांमध्ये आनंद, बॅण्डवाले मात्र निराश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या सत्रात विवाहादी कौटुंबिक सोहळ्यांमधील ...

- मंगल कार्यालय संचालकांमध्ये आनंद, बॅण्डवाले मात्र निराश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या सत्रात विवाहादी कौटुंबिक सोहळ्यांमधील आनंदावर विरजण पडले होते. नाईलाजास्तव नागरिकांनी काळाची गरज म्हणून हे आनंदी सोहळे घरच्या घरी म्हणा वा कठोर निर्बंधात पार पडले. यामुळे मात्र विवाहसोहळे, मौंज, वाढदिवस आदींवर निर्भर असलेला व्यवसाय पार मोडकळीस आला. दीर्घकाळानंतर शासनाने या क्षेत्रावरील निर्बंध उठविल्याने नागरिकही आनंदाने सोहळे साजरे करीत आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयांचे बुकिंग वाढले आहे.

लग्नसमारंभातील अटी

* लॉनमध्ये २०० लोकांची मर्यादा.

* सभागृहात १०० लोकांची मर्यादा.

* साधारणत: तीन तासात कार्यक्रम आटोपावे.

* रात्री १० वाजताच्या आधी कार्यक्रम आटोपावे.

विवाहमुहूर्ताच्या तारखा

ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी चातुर्मासातील अडीअडचणींच्या मुहूर्तांसोबतच नियमित व शास्त्रानुसार उत्तम मुहूर्त सांगितले आहेत. सोबतच गुरु व शुक्र अस्तकाळातील मुहूर्तही सांगितले आहेत.

चातुर्मासातील तारखा (अस्त काळातील गरज म्हणून) -

ऑगस्ट - १८, २०, २१, २६, २७

सप्टेंबर - १६ (या तारखेनंतर पितृपक्ष, पितृपक्षात विवाहसोहळे होत नाहीत.)

ऑक्टोबर - ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४

नियमित मुहूर्त (तुळशीविवाहानंतर)

नोव्हेंबर - २०, २१, २९, ३०

डिसेंबर - १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९, ३१

शास्त्रानुसारचे उत्तम मुहूर्त

जानेवारी - २२, २३, २४, २६, २७, २९

फेब्रुवारी - ५, ६, ७, १०, १६, १७

मार्च - २३, २५, २६, २८, २९

गुरु-शुक्राच्या अस्तकाळातील मुहूर्त (अस्त दोषाचे)

फेब्रुवारी - २०, २१, २२, २३, २४, २५

मार्च - ४, ५, ९, १०, २०

रोजीरोटी सुरू झाली याचा आनंद

लॉकडाऊनमधील निर्बंधामुळे आमचीच नव्हे तर मंगल कार्यालयांवर विसंबून असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांचा धंदा चौपट झाला होता. आता शासनाने निर्बंध उठविले आणि सर्वत्र आनंद पसरला आहे. रोजीरोटी सुरू झाल्याने जगण्याचा प्रश्न मिटला आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागू नये, याची काळजी आपणा सर्वांचीच आहे.

- विनोद कनकदंदे, नागपूर लाॅन ॲण्ड हॉल असोसिएशन

बॅण्डवाल्यांना रोजगार नाहीच

बॅण्डवाल्यांचा सीझन उन्हाळ्यात असतो. पावसाळ्यात विवाहादी सोहळे होतीलही तरी बॅण्डवाल्यांची बुकिंग नसते. हेच निर्बंध दीड महिन्याआधी उघडले असते तर थोडीथोडकी कमाई हाती पडली असती. पावसाळ्यानंतर होणाऱ्या विवाहांवर आता आम्ही विसंबून आहोत.

- अभिषेक इंगळे, मंगलदीप बॅण्ड

......................