शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

समता प्रतिष्ठानने गमावली ‘प्रतिष्ठा‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानद्वारे राबविण्यात आलेले कार्यक्रम आणि त्यावर झालेला वारेमाप खर्च याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानद्वारे राबविण्यात आलेले कार्यक्रम आणि त्यावर झालेला वारेमाप खर्च याबाबत सुरुवातीपासूनच आक्षेप राहिला आहे. त्यासंदर्भात विविध संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे तक्रारीही केल्या, परंतु त्याचे काही झाले नाही. दरम्यान, राज्यात सत्तांतरण झाले. तेव्हा याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची शक्यता बळावली. परंतु महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने प्रतिष्ठानमधील मुख्य जबाबदार लोकांना सोडून कार्यालयातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. त्यामुळे समता प्रतिष्ठान सध्या कार्यालयविहीन झाले असून प्रतिष्ठान बंद करण्याचा घाट तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समाजात समता प्रस्थापित व्हावी, धर्म, जात, पंथ याचा विचार न करता एकूणच सर्व समाजाचे कल्याण व्हावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. हे प्रतिष्ठान कंपनी कायदा २०१३ च्या ८ (१) (ए)अंतर्गत कुठलाही नफा न कमविण्याच्या तत्त्वावर स्थापन करण्यात आले आहे. नागपूरची दीक्षाभूमी ही जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच समता प्रतिष्ठानाचे मुख्यालय हे नागपूर येथे करण्यात आले आहे. सामाजिक न्यायभवनात त्याचे मुख्यालय आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हे कार्यालय सुरू होते. आता या सर्वांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. यात लेखा अधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यापासून तर शिपायापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कार्यालयात कार्यरत सर्वांनाच कार्यमुक्त करण्यात आल्याने हे प्रतिष्ठान एकप्रकारे बंदच झाले आहे. त्यामुळे ज्या उद्देशासाठी प्रतिष्ठान सुरू झाले त्या समतेच्या प्रयत्नांचे काय होणार, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

प्रतिष्ठान कायम राहणार की नाही?

सध्या समता प्रतिष्ठानमध्ये एकही कर्मचारी कार्यरत नाही. त्यामुळे भविष्यात प्रतिष्ठानचे काय होणार? प्रतिष्ठान कायम राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या विभागात गैरव्यवहार झाला असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, परंतु विभागच बंद करणे योग्य होणार नाही. ज्या उद्देशासाठी प्रतिष्ठान सुरू झाले, त्या उद्देशपूर्तीसाठी सध्याच्या सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी केली जात आहे.