शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकान बचावसाठी रिंगरोडचा आधार

By admin | Updated: April 6, 2017 02:19 IST

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील सर्व दारूची दुकाने व बीअर बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपाला नको खांद्यावर भार : राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील सर्व दारूची दुकाने व बीअर बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका नागपूर शहर व जिल्ह्यातील ८७२ दारू दुकान, बीअर बारला बसला आहे. आता ही दारूची दुकाने वाचविण्यासाठी राज्य व राष्ट्रीय महामार्गाला आऊटर रिंगरोडची (राज्य महामार्ग ३४०) कनेक्टिव्हिटी दाखविण्याच्या हालचाली सुरू आहेत. असे झाले तर राष्ट्रीय व राज्य महामार्गात खंड पडणार नाही व अंतर्गत रस्ते महापालिकेला हस्तांतरित करणे सोपे होईल. मात्र, तसे झाले तर महापालिकेवर संबंधित रस्त्यांच्या देखभालीचा व त्यावर सुरू असलेल्या कामांचा तीन हजार कोटींवर भुर्दंड बसेल. त्यामुळे महापालिका या रस्त्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. नागपूर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचा विचार केला असता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ हा कामठी ते वर्धा रोडपर्यंत जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ हा भंडारा रोड ते अमरावती रोडपर्यंत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ हा कस्तूरचंद पार्कपासून ते छिंदवाडा रोडपर्यंत जातो. राष्ट्रीय महामार्ग ३५३-जे हा काटोल रोडवरील छिंदवाडा जंक्शन ते शहर सीमेतील काटोल रोडपर्यंत, राष्ट्रीय महामार्ग ३५३-डी हा अग्रसेन चौक ते उमरोड रोड, राष्ट्रीय महामार्ग ३२५ झाशी राणी चौक ते हिंगणा रोड यांचा समावेश आहेत. तसेच राज्य महामार्गामध्ये शहरातील अंतर्गत रिंगरोड एसएच ३४०, कळमना ते जुना कामठी रोड एसएच ३४१ चा समावेश आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यातून राज्य महामार्ग क्रमांक ६९, २४६, ३३५, ३३८, ३३९, ३४५, ३४६, ३४७, ३५२ यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या राष्ट्रीय महामार्गाचे काही विशिष्ट भागातील आरक्षण रद्द करून त्याचे हस्तांतरण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे केले तर संबंधित महामार्ग खंडित होतो. त्यामुळे यातून तांत्रिकदृष्ट्या मार्ग काढण्यासाठी महामार्ग खंडित करताना त्याला दुसऱ्या राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गाची कनेक्टिव्हिटी दर्शविणे आवश्यक आहे. तसे झाले तर राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गाचे मर्यादित भागातील आरक्षण वगळण्यास हरकत नाही. या तांत्रिक मुद्याचा आधार घेऊन शहरातून जाणाऱ्या आऊटर रिंगरोडला (राज्य महामार्ग ३४०) कनेक्टिव्हिटी रोड दर्शवून शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे आरक्षण वगळण्याची तयारी सुरू झाली आहे. आऊटर रिंगरोडचा (राज्य महामार्ग ३४०) आधार घेतला तर शहरातील सर्व बीअर बार, दारू विक्रीची दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून सुटू शकतात. (प्रतिनिधी) गेल्या वर्षी ३९.६६ कोटींचा महसूल गेल्या वर्षी १० कारखाने, ३१ ठोक देशी-विदेशी मद्य विक्रेते, ६८० परमिट रूम व बार, ११५ विदेशी मद्य विक्रेते, २८९ देशी मद्य विक्रेते आणि १०२ बीअर शॉपीच्या नूतनीकरणातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर जिल्हा कार्यालयाला ३९ कोटी ६६ लाख आणि २० हजार रुपयांचा महसूल मिळाला होता. यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यातील जवळपास ७४ टक्के बार आणि दारूची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षांत जवळपास २९ कोटींच्या महसुलाला मुकावे लागणार असून केवळ १० कोटींचा महसूल गोळा होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर विभागीय अधीक्षक स्वाती काकडे यांनी दिली. पगाराला नाही खार; कसा पेलणार रस्त्यांचा भार? नागपूर महापालिकेकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक पाठबळावर कामे सुरू आहेत. अशात शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे आरक्षण रद्द करून ते महापालिकेकडे हस्तांतरित केले तर या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा भार महापालिकेवर येणार आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांची जबाबदारी स्वीकारण्यास महापालिका तयार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय महामार्गांवर सिमेंट रस्ते, नाले बांधणी, पूल, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यावर सुमारे ७० टक्के खर्च होणे बाकी आहे. संबंधित रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित झाले तर महापालिका सुमारे तीन हजार कोटींचा भार कसा उचलणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे महापालिकेकडून रस्त्यांचे आरक्षण वगळण्याच्या प्रस्तावास विरोध होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने तेवढा निधी देण्याची तयारी दर्शविली तर मात्र यातूनही मार्ग निघू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.