शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

उपराजधानीत माहितीचा अधिकार दिरंगाईच्या घेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 10:24 IST

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना वास्तवापासून दूर ठेवण्याचा अधिकार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप अनेक स्तरावरून केला जात आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र आयुक्ताअभावी प्रकरणे धूळखात सप्टेंबरमध्ये सुनावणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी विभागांतील कार्यप्रणालीची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, या हेतूने भारतात २००५ पासून माहितीचा अधिकार लागू करण्यात आला. मात्र, भ्रष्टाचाराला बगल देणारी यंत्रणा, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अपुरी नियुक्ती अन् असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना वास्तवापासून दूर ठेवण्याचा अधिकार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप अनेक स्तरावरून केला जात आहे.सामाजिक कार्यकर्ते राजेश पौनीकर यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली आहे. नागपूर विभागाच्या राज्य माहिती अधिकार आयोगावर गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतंत्र आयुक्तच नसल्याने, याचा अतिरिक्त पदभार औरंगाबादचे माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्यावर सोपविण्यात आला आहे. नागपूर विभागात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश होतो. विभागाकडे दररोज प्रत्येक जिल्ह्यांतून शेकडो अर्ज येत असतात. मात्र, पूर्णवेळ आयुक्ताअभावी सर्व प्रकरणे प्रलंबित आहेत. मार्च महिन्यापासून १४०० हून अधिक प्रकरणांवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशीच स्थिती पुणे व अमरावती विभागाची असून, या दोन्ही विभागांकडे पाच हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, नागपूर विभागाकडे सप्टेंबर महिन्यात एकाही प्रकरणावर सुनावणी झालेली नसल्याचे उघडकीस येत आहे. अशा तºहेने वर्तमान सरकारकडून मुद्दामहून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप पौनिकर यांनी लावला आहे. कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच आयुक्तांची नियुक्ती केली जात नाही. ज्यांची नियुक्ती केली जाते, ते दोषी कर्मचाऱ्यांना क्लीन चिट देऊन मोकळे होतात. या सगळ्यांची मंत्र्यांशी व नेत्यांशी तडजोड असून, राष्ट्रहितासाठी सरकारी विभागांवर कर्मठ आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार