शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

वैदर्भीय सांस्कृतिक परंपरांचा सन्मान व्हावा

By admin | Updated: November 21, 2015 03:26 IST

कालिदास विदर्भाचे पाहुणे म्हणून आले आणि रामटेकमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या अजरामर कलाकृतीने रामटेकचे नाव साहित्याच्या इतिहासात कोरले गेले.

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार : कालिदास महोत्सवाचे थाटात उद्घाटनरामटेक : (कालिदास स्मारक) : कालिदास विदर्भाचे पाहुणे म्हणून आले आणि रामटेकमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या अजरामर कलाकृतीने रामटेकचे नाव साहित्याच्या इतिहासात कोरले गेले. मोठा आणि महान कवी हा कुठल्याच प्रदेशाचा नसतो. तो साऱ्या जगाचा असतो. महान कवी, नाटककार कालिदासाचे स्मरण आपण करतो आहोत, ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. विदर्भाचा माणूस जरा मुजोर असतो पण मुजोरी करण्यासाठी ज्ञानही असावे लागते. आपल्या वैदर्भीय सांस्कृतिक समृद्ध इतिहासाच्या परंपरेचे आपल्यालाच कायम ज्ञान नाही. कालिदासाचे स्मरण करताना संस्कृतचा महान वैदर्भीय कवी भवभूतीला विसरुन चालणार नाही. आपल्या वैदर्भीय सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करायला आपण शिकले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी शुक्रवारी केले. कालिदास महोत्सव आयोजन समिती, जिल्हा प्रशासन, राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कालिदास महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कालिदास विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उमा वैद्य, विभागीय आयुक्त अनुपकुमार, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, माजी आ. आशिष जयस्वाल, माजी राज्यमंत्री मधुकरराव किंमतकर, चंद्रपाल चौकसे, पांडुरंग हजारे, आनंदराव देशमुख, रामटेकचे सभापती किरण धुर्वे, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, नगराध्यक्ष नलिनी चौधरी, साहित्यिक विष्णू खरे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पियुषकुमार उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन कालिदास स्मारकाच्या शेजारील प्रांगणात करण्यात आले. महेश एलकुंचवार म्हणाले, कालिदास हा संस्कृतचा महान कवी होता पण तो संस्कृतमधला पहिला कवी नाही. कालिदासाच्या आत्मविश्वासाचे कौतुकच करयला हवे कारण त्यो मांडलेल्या भावना सार्वत्रिक आहेत आणि आजही ताज्या आहेत. त्यामुळेच कालिदास आपल्याला आजही जवळचा वाटतो. त्याचे जीवनावरचे प्रेम आणि निसर्गाचे प्रेम विलक्षण आहे. कुमारसंभवम मध्ये लज्जेचा अप्रतिम आविष्कार त्याने मांडला आहे. कालिदासाचे हे साहित्य जनतेपर्यंत पोहोचवून आपले जीवन कालिदासाने किती समृद्ध केले ते लोकांनाही कळायला हवे. त्यासोबतच कालिदासाचे स्मरण करताना भवभूतीसाठी आपण काहीच का करीत नाही. तो आपल्याला माहितीही नाही. त्याचे स्मारक बांधा, असे मी म्हणणार नाही पण भवभूतीच्या नावाने काही तरी विदर्भात व्हायला हवे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कालिदासाच्या काव्याने जी सांस्कृतिक दृष्टी आपल्याला दिली त्याचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. कालिदासाचे वास्तव्य जेथे राहिले त्या रामटेकमध्येच कालिदासाच्या नावाने सुरु झालेले कार्यक्रम झाले पाहिजेत, हे शासनाला मान्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी रामटेकमध्ये कार्यक्रमाचे आयोजन वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. रामटेककरांच्या जे मनात असेल तेच शासन करेल. येणाऱ्या पिढीच्या मनात कालिदास कसा रुजविता येईल, याचा प्रयत्न शासन करीत आहे. शासनाला रामटेकमध्ये बरीच कामे करायची आहेत. त्यात सूचना आल्याप्रमाणे कालिदास स्मारकात ग्रंथालय, कालिदासाचा भव्य पुतळा आदींचे काम सुरु आहे. या ग्रंथालयात कालिदासाच्या संपूर्ण कलाकृती आणि त्यावरचे संशोधन ठेवण्यात येईल, अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. डॉ. उमा वैद्य यांनी प्रास्ताविकातून या महोत्सवाला यंदापासून नवी झळाळी आली आहे. त्यानिमित्ताने कालिदास संस्कृत विद्यापीठाचा परिसरही सुशोभित करण्यात आला आहे. रामटेकमध्ये पडलेले रामाचे पाऊल, कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि नगरधनचा किल्ला तसेच निसर्गसौंदर्य हे रामटेकचे वैभव आहे. है वैभव या महोत्सवाच्या निमित्ताने अधिक समृद्ध करण्याता प्रयत्न होतो आहे. संचालन श्वेता शेलगावकर अणि आभार रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी यांनी मानले. (प्रतिनिधी)