शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

कळमन्यात आरामशीनला भीषण आग

By admin | Updated: May 8, 2014 02:38 IST

कापसी (कळमना) येथील एका आरामशीनला भीषण आग लागून सुमारे १३ कोटी रुपयांचे लाकूड जळून भस्म झाले. आज पहाटे २ वाजता ही भीषण आग लागली.

१३ कोटींचे नुकसान : सुदैवाने प्राणहानी टळलीनागपूर : कापसी (कळमना) येथील एका आरामशीनला भीषण आग लागून सुमारे १३ कोटी रुपयांचे लाकूड जळून भस्म झाले. आज पहाटे २ वाजता ही भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्या दोन डझन जवानांसह नऊ बंबांच्या साहाय्याने निरंतर प्रयत्नरत आहेत. मात्र, १२ तास होऊनही आग विझविण्यात त्यांना यश आले नाही. यावरून आगीची भीषणता लक्षात यावी.भंडारा मार्गावरील कापसी (खुर्द) येथे फ्रेण्डस टिंबर प्रा. लि. या कंपनीत ही आरामशीन आहे.समीर जयस्वाल, पुनित कोहली यांच्या मालकीच्या या आरामशीन मधून आयातीत लाकडासह (इम्पोर्टेड वूड) सर्वच प्रकारचे महागड्या लाकडाची खरेदी, विक्री अन् कटाईचे काम केले जाते. येथील इम्पोर्टेड टी वूड, सॉन, टिंबरसह कोट्यवधींचे कटसाईज ठिकठिकाणी पाठविले जातात. सुमारे २५ हजार चौरस फुटात आरामशीनचे वेअर हाऊस आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व कामकाज आटोपल्यानंतर जयस्वाल आणि कोहली कार्यालय बंद करून निघून गेले. पहाटे २ च्या सुमारास वेअर हाऊसमधील शेडमधून धूर निघताना दिसल्याने चौकीदाराने तिकडे धाव घेतली. यावेळी त्याला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी जयस्वाल आणि कोहली यांना फोन करून ही माहिती दिली. अग्निशमन दल आणि पोलिसांनाही कळविण्यात आले. सुमारे अर्धा तास विलंबाने अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, लकडगंजचे स्टेशन ऑफिसर भीमराव चंदनखेडे, कळमना अनिल बरडे, सदाशिव भेंडे, प्रेमराज बरडे यांच्यासह ४0 ते ५0 अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी एकापाठोपाठ तब्बल नऊ बंब घटनास्थळी बोलवून घेतले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. मात्र, सर्वत्र लाकडाचा पसारा असल्याने आग विझण्याऐवजी अधिकच भीषण होत गेली. आरामशीनमध्ये किमती लाकूड ठेवण्यासाठी एक मोठे टिनाचे शेड करण्यात आले होते. हे शेड खाली पडून पुरते खाक झाले.यंत्रणेची धावपळया भीषण आगीमुळे अग्निशमन दलाची मोठी धावपळ झाली. पाण्याचा सारखा मारा करूनही आग विझता विझेना. त्यामुळे पहिल्या दोन तासातच ४ ते ५ टँकर रिकामे झाले. त्यात पाणी भरण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूच्या विहिरी, तलावांवर धाव घेतली. मात्र, पहाटेची वेळ असल्यामुळे टँकरमध्ये पाणी भरणे जमले नाही. शेवटी चार ते पाच किलोमीटर दूर अंतरावरून (नेहमीच्या ठिकाणावरून) अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकर भरून आणले. ८0 ते ९0 फेर्‍या पाणी आणल्यानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश आले नव्हते. दुसरीकडे पाणी आणण्यास विलंब झाल्यामुळे आग अधिकच भडकली.अनेक मान्यवरांची भेटआगीची माहिती कळताच अनेक मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यात महापौर प्रा. अनिल सोले यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. वृत्त लिहिस्तोवर आगीचे कारण कळू शकले नाही. (प्रतिनिधी)