शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

कळमन्यात आरामशीनला भीषण आग

By admin | Updated: May 8, 2014 02:38 IST

कापसी (कळमना) येथील एका आरामशीनला भीषण आग लागून सुमारे १३ कोटी रुपयांचे लाकूड जळून भस्म झाले. आज पहाटे २ वाजता ही भीषण आग लागली.

१३ कोटींचे नुकसान : सुदैवाने प्राणहानी टळलीनागपूर : कापसी (कळमना) येथील एका आरामशीनला भीषण आग लागून सुमारे १३ कोटी रुपयांचे लाकूड जळून भस्म झाले. आज पहाटे २ वाजता ही भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्या दोन डझन जवानांसह नऊ बंबांच्या साहाय्याने निरंतर प्रयत्नरत आहेत. मात्र, १२ तास होऊनही आग विझविण्यात त्यांना यश आले नाही. यावरून आगीची भीषणता लक्षात यावी.भंडारा मार्गावरील कापसी (खुर्द) येथे फ्रेण्डस टिंबर प्रा. लि. या कंपनीत ही आरामशीन आहे.समीर जयस्वाल, पुनित कोहली यांच्या मालकीच्या या आरामशीन मधून आयातीत लाकडासह (इम्पोर्टेड वूड) सर्वच प्रकारचे महागड्या लाकडाची खरेदी, विक्री अन् कटाईचे काम केले जाते. येथील इम्पोर्टेड टी वूड, सॉन, टिंबरसह कोट्यवधींचे कटसाईज ठिकठिकाणी पाठविले जातात. सुमारे २५ हजार चौरस फुटात आरामशीनचे वेअर हाऊस आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व कामकाज आटोपल्यानंतर जयस्वाल आणि कोहली कार्यालय बंद करून निघून गेले. पहाटे २ च्या सुमारास वेअर हाऊसमधील शेडमधून धूर निघताना दिसल्याने चौकीदाराने तिकडे धाव घेतली. यावेळी त्याला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी जयस्वाल आणि कोहली यांना फोन करून ही माहिती दिली. अग्निशमन दल आणि पोलिसांनाही कळविण्यात आले. सुमारे अर्धा तास विलंबाने अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, लकडगंजचे स्टेशन ऑफिसर भीमराव चंदनखेडे, कळमना अनिल बरडे, सदाशिव भेंडे, प्रेमराज बरडे यांच्यासह ४0 ते ५0 अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी एकापाठोपाठ तब्बल नऊ बंब घटनास्थळी बोलवून घेतले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. मात्र, सर्वत्र लाकडाचा पसारा असल्याने आग विझण्याऐवजी अधिकच भीषण होत गेली. आरामशीनमध्ये किमती लाकूड ठेवण्यासाठी एक मोठे टिनाचे शेड करण्यात आले होते. हे शेड खाली पडून पुरते खाक झाले.यंत्रणेची धावपळया भीषण आगीमुळे अग्निशमन दलाची मोठी धावपळ झाली. पाण्याचा सारखा मारा करूनही आग विझता विझेना. त्यामुळे पहिल्या दोन तासातच ४ ते ५ टँकर रिकामे झाले. त्यात पाणी भरण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूच्या विहिरी, तलावांवर धाव घेतली. मात्र, पहाटेची वेळ असल्यामुळे टँकरमध्ये पाणी भरणे जमले नाही. शेवटी चार ते पाच किलोमीटर दूर अंतरावरून (नेहमीच्या ठिकाणावरून) अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकर भरून आणले. ८0 ते ९0 फेर्‍या पाणी आणल्यानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश आले नव्हते. दुसरीकडे पाणी आणण्यास विलंब झाल्यामुळे आग अधिकच भडकली.अनेक मान्यवरांची भेटआगीची माहिती कळताच अनेक मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यात महापौर प्रा. अनिल सोले यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. वृत्त लिहिस्तोवर आगीचे कारण कळू शकले नाही. (प्रतिनिधी)