शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

वीज दर दोन रुपयांनी कमी करणे शक्य

By admin | Updated: February 15, 2015 02:26 IST

राज्यात वीज दर प्रति युनिट १.५० ते २ रुपये कमी करणे शक्य असून हे लक्ष्य गाठण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे राज्य इलेक्ट्रीसिटी...

नागपूर : राज्यात वीज दर प्रति युनिट १.५० ते २ रुपये कमी करणे शक्य असून हे लक्ष्य गाठण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे राज्य इलेक्ट्रीसिटी होल्ंिडग कंपनीचे नवनियुक्त संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अ‍ॅल्युमनी असोसिएशनतर्फे शनिवारी विद्यापीठ वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पाठक बोलत होते. यावेळी विश्वास पाठक आणि आर.बी. गोयनका यांचा त्यांची इलेक्ट्रीसिटी होल्ंिडग कंपनीच्या संचालकपदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विदर्भवादी मधुकर किंमतकर होते. व्यासपीठावर असोसिएशनच्या उपाध्यक्ष व अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. कमल सिंह, सचिव सुधीर पालीवाल उपस्थित होते.पाठक म्हणाले की, राज्यात कोळशाची किंमत प्रति टन १९०० रुपयांपर्यत गेली आहे. मात्र शेजारच्या छत्तीसगडमध्ये ही किंमत १०८६ रुपये आहे. याचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी एक कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार महागड्या कोळशाचा वापर कमी करणे,फक्त बंदराजवळील (पोर्ट) वीज प्रकल्पाला प्राथमिकता देणे, कोळसा वाहतुकीवरील खर्च कमी करणे, ‘डिलेव्हरी पॉर्इंट’वर कोळशाची गुणवत्ता तपासणे आणि व्याज १४ टक्केहून कमी करण्याचे प्रयत्न करणे आदींचा समावेश आहे. यामुळे वीज दरात घट करणे शक्य आहे. सध्या राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांवर ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.शासनाने राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाला अंतिम रूप दिले आहे. त्या अंतर्गत सौर, जल, खनिज, कृषी, घन कचऱ्यापासून वीज निर्मिती आदी स्रोतांचा समावेश आहे. अपारंपरिक स्रोतांपासून वीज निर्मिती करणाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाईल,असे पाठक म्हणाले. राज्यात फक्त विद्युत पारेषण कंपनीच नफ्यात आहे. महाजेन्को व वितरण कंपनी तोट्यात आहेत. यासाठी सरकारने १० हजार कोटी रुपयांचा निधी देऊन वितरण व्यवस्था आणि इतर योजनांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचीही माहिती त्यांनी दिली. या योजनेसाठी शेतकऱ्यांना फक्त दहा टक्केच खर्चाचा भार उचलावा लागणार असून उर्वरित भार हा केंद्र आणि राज्य सरकार व एमएसईडीसीएल उचलणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी गोयनका म्हणाले की, आतापर्यंत आपण ग्राहकांच्या अधिकाराबाबत संघर्ष करीत आलो.आता सरकारने नीती निर्धारण (पॉलिसी मेकर) करण्याची जबाबदारी सोपविली. विदर्भात मुबलक कोळसा असल्याने या क्षेत्रात वीज निर्मिती प्रकल्प आले. पण यापूर्वीच्या सरकारने याच प्रमुख मुद्याकडे दुर्लक्ष करीत विदर्भावर अन्याय केला. नवीन सरकारचे धोरण ऊर्जा क्षेत्राच्या संदर्भात सकारात्मक आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी वीज वापर १०० युनिट प्रती दिवस करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.सरकारच्या प्रयत्नांमुळे या ग्राहकांना ओपन अ‍ॅक्सेस मधून कमी दरात वीज मिळू शकेल. विदर्भात प्रती दिन ७ हजार ते ८ हजार मे.वॅ. वीज निर्मिती होते. पण त्यापैकी केवळ १३०० मे.वॅ.चा वापर होतो. त्यामुळे अनुदानाच्या बाबतीत विभागनिहाय निकष लावून या भागातील ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज मिळू शकेल.सुरुवातीला मधुकर किंमतकर यांचे भाषण झाले. त्यांनी वीज जोडण्या देताना विदर्भावर अन्याय झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुधीर पालीवाल यांनी केले. कार्यक्रमाला असोसिएशनचे पदाधिकारी,सदस्य आणि ऊर्जा क्षेत्रातील जाणकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)