शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शाळा शुल्क कमी करण्यासाठी पालकांची गर्जना ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST

नागपूर : काेराेना काळात शाळा बंद असताना पालकांवर लादण्यात आलेले शाळा शुल्क निम्मे करण्याची मागणी पालकांद्वारे केली जात आहे. ...

नागपूर : काेराेना काळात शाळा बंद असताना पालकांवर लादण्यात आलेले शाळा शुल्क निम्मे करण्याची मागणी पालकांद्वारे केली जात आहे. यासाठी जागरूक पालक संघटनेच्या वतीने रविवारी संविधान चाैक येथे धरणे आंदाेलन करण्यात आले.

संपूर्ण जगात काेराेना महामारीमुळे नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. यापासून भारत देश आणि त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा सुटलेला नाही. जनतेचा या महामारीमुळे रोजगार, व्यापार, नोकरी बंद होत्या, अशा परिस्थितीमध्ये राज्यातील शिक्षण व्यवस्थाही बंदच हाेत्या. त्यानंतर काही काळापासून शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले, तेही एक तास किंवा ४० मिनिटांसाठी. यावेळी ना शाळांना साेयी-सुविधांसाठी खर्च करावा लागला, ना शिक्षणासाठी. केवळ पालकांनाच इंटरनेटपासून सर्व सुविधा कराव्या लागल्या. असे असताना शाळांकडून १०० टक्के शुल्क वसूल केले जात आहे. यासाठी शाळांकडून कर्मचाऱ्यांमार्फत पालकांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे पालक मानसिक तणावात असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नितीन नायडू यांनी सांगितले. या काळात शाळांना शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना एकतर पगार दिले नाहीत किंवा ५० ते ७० टक्के पगार कापण्यात आला. मात्र, पालकांकडून १०० टक्के शुल्काची अपेक्षा केली जात असल्याचा आराेप नायडू यांनी केला.

अशा वेळी राज्य शासनाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे; पण ताेही मिळत नसल्याची टीका विदर्भ पॅरेंट असाेसिएशनचे संदीप अग्रवाल यांनी केली. सरकारकडून मे महिन्यात एक तकलादू अध्यादेश काढून सरकार चूप झाले आहे. अशात खाजगी शाळा प्रशासनाने सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयात आवाहन दिल्यामुळे निर्णय थांबला. महाराष्ट्र सरकारने ५० टक्के शुल्क आकारणीचा आदेश काढला तर पालकांना दिलासा मिळेल, असे आवाहन आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी केले.

आंदाेलनाला विदर्भ पेरेंट्स एसोसिएशन, जय जवान जय किसान संघटना, आम आदमी पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, लोकभारती, जागरूक पालक परिषद व लोकजागृती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आदी संघटनांनी समर्थन देत सहभाग घेतला. दिल्ली सरकारप्रमाणे फी कमी करण्याचे अध्यादेश काढावेत आणि विदर्भात तातडीने डीएफआरसीचे गठन करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. यावेळी भवानीप्रसाद चाैबे, वंचितचे रवी शेंडे, पालक संघटनेचे अजय ताजने, गुल्हाने, याेगेश मानके, प्रशांत नाइक, मंगला गजभिये, मयुरी टेंभरे, फुलचंद नागले, अनुज जैन, अरुण वनकर, ॲड. नीरज खांदेवाले, कविता हिंगल, रमन सेनाड, नरेंद्र तभाने, अशोक मिश्रा, कृतल वेळेकर, पीयूष आखरे, गिरीश तितरमारे, प्रतीक बावनकर, विकास घरडे, नवनीत बेलसरे, विश्वजित मसराम, सुरेश चतुर्वेदी, भूषण ढाकूलकर, विशाल पटले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.