शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा प्रचार-प्रसार ही काळाची गरज

By admin | Updated: July 7, 2014 01:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गरज पूर्वीच ओळखली होती. त्यांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच पत्नी रमाबार्इंना शिक्षित करून त्यांच्याकडून विद्यादानाचे महत्कार्य करून घेतले. विशेषत्वाने

न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन : अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे वकील परिषदेचे आयोजनश्यामकांत पाण्डेय - धारणीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गरज पूर्वीच ओळखली होती. त्यांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच पत्नी रमाबार्इंना शिक्षित करून त्यांच्याकडून विद्यादानाचे महत्कार्य करून घेतले. विशेषत्वाने मागासवर्गीय महिलांना घरीच शिक्षण मिळावे, यावर त्यांचा भर होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधान तयार करताना मूलभूत गरजांमध्ये शिक्षणाचा समावेश करण्यात आला. म्हणूनच शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षणाच्या या मूलभूूत अधिकाराचा प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.कुसुमकोट बुजुर्ग येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे वाहीद शेख मेमोरियल इंटरनॅशनल लॉ कॉलेजमध्ये ‘शिक्षणाचा मूलभूत अधिकार’ या विषयावर आयोजित परिषदेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सेंटीनेल सॉलिसिटर्स, लंडन, वकील संघ धारणी आणि शेख अँड को सॉलीसीटर्स लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी येथे रविवारी ही परिषद पार पडली. परिषदेला न्यायमूर्ती भूूषण गवई, न्यायमूर्ती पी.जी. वराळे आणि न्यायमूर्ती झेड. ए. हक, बार काऊन्सील आॅफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष जयंत जयभाने, उपाध्यक्ष अनिल गोवरदिवे, अमरावती येथील गणेश सारडा, सॉलीसिटर आॅफ सुप्रीम कोर्ट आॅफ लंडनचे साजीद शेख उपस्थित होते. मेळघाटसारख्या दुर्गम आदिवासी भागात पहिले सेमिनार आयोजित केल्याबद्दल जयंत जयभाने यांनी आयोजकांचे कौतुक केले. शिक्षणाची खरी गरज अशाच दुर्गम व आदिवासी भागाला सर्वात जास्त आहे. कार्यक्रमात उपस्थित सर्व नामवंत वकिलांनी शिक्षण विषयक कायद्याची माहिती आपल्या वकिलांना करून द्यावी, असे जायभाने यांनी यावेळी सांगितले. न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणात अल्पसंख्यक समुदायाचाही सिंहाचा वाटा असावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या धारणी येथील उर्दू महाविद्यालयाला त्यांनी शुुभेच्छा दिल्यात. तत्पूर्वी या शैक्षणिक परिषदेच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद करताना लंडन येथील सॉलिसिटर साजीद शेख यांना गहिवरून आले. कार्यक्रमाला न्यायमूर्र्ती पी.बी. वराळे, वकील अनिल गोवरदिवे आणि सतीश सारडा यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अ‍ॅड. सत्यदेव गुप्ता यांनी केले.