शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान

By admin | Updated: January 14, 2017 02:43 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान राहिले आहे.

अनेक भीमसैनिक शहीद : दीक्षाभूमीवरून निघाला होता ऐतिहासिक लाँगमार्च नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. इतकेच नव्हे तर नामांतरासाठी निघालेला ऐतिहासिक लाँग मार्च हा दीक्षाभूमीवरूनच काढण्यात आला होता, हे विशेष. औरंगाबादच्या या विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी एकमताने मंजूर झाला आणि दलितांवरील हिंसाचार वाढला. या हिंसाचारच्या विरोधातील पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली ती नागपुरातच. दलित अत्याचाराविरोधात ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरात विशाल संयुक्त मोर्चा निघाला. या मोर्चातून परतणाऱ्या जमावावर इंदोरा भागात पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. ४ व ५ आॅगस्ट असे दोन दिवस पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शहीद झाले. यात रतन मेंढे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फजल हुसेन, किशोर भाकळे शहीद झाले. ११ वर्षाचा अविनाश अर्जुन डोंगरे या जखमी मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. नामांतर ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १९७८ -७९ अशी दोन वर्षे नागपुरात आंबेडकरी आणि पुरोगामी संघटनांनी रान उठविले होते. ६ डिसेंबर १९७९ रोजी नागपुरात नामांतरासाठी स्वयंस्फूर्त असा विशाल मोर्चा निघाला होता. लाखोंच्या या मोर्चामुळे पोलीस यंत्रणेला धडकी भरली. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला. ६ व ७ डिसेंबर असे दोन दिवस तांडव सुरू होते. या दोन दिवसात ज्ञानेश्वर साखरे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर व डोमाजी कुत्तरमारे हे भीमसैनिक शहीद झाले. नामांतर लढ्यात प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी नागपुरातून औरंगाबादसाठी काढलेला लाँगमार्च ऐतिहासिक ठरला. मराठवाड्याच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळ खडकपूर्णाच्या राहेरी पुलावर २७ नोव्हेंबरला लाँगमार्च अडवून प्रा. कवाडे यांच्यासह थॉमस कांबळे, मामा सरदार, जगदीश थूल व इतर कार्यकर्त्यांना अटक करून औरंगाबाद तुरुंगात ठेवले होते. तर कवी इ.मो. नारनवरे यांच्यासह ३११ भीमसैनिकांना नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले होते. नामांतराच्या १९९३ च्या अंतिम लढ्यातही नागपूर पुढे होते. उत्तर नागपूरचे तत्कालीन आमदार उपेंद्र शेंडे यांनी १५ आॅगस्ट १९९३ पासून मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे नामांतर लढ्याला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर मोठे आंदोलन, झालेले आत्मदहन आणि आत्माहुतीमुळे सरकारला आंबेडकरी शक्तीपुढे नमावे लागले आणि अखेर १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर १४ जानेवरी १९९४ रोजी औरंगाबादच्या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. (प्रतिनिधी) तो लढा हक्काचा व न्यायाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणे, हा प्रश्न फक्त दलित अस्मितेपुरता किंवा केवळ पाटी बदलण्यापुरता मर्यादित नव्हता, तर सामाजिक समतेचा, लोकशाही हक्कांचा आणि न्यायाचा होता. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात एकमताने झालेल्या नामांतर ठरावाची अंमलबजावणी करून सरकार लोकशाही मूल्यांची बूज राखते की नाही, हा खरा प्रश्न होता. -अनिल वासनिक, नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते लोकशाहीच्या हक्कासाठी भीमसैनिक शहीद नामांतराचा लढा केवळ पाटी बदलण्यापुरता कधीच मर्यादित नव्हता तर तो लोकशाही हक्क व सामाजिक समतेचा लढा होता आणि यासाठी भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भीमसैनिकांमुळेच लोकशाहीचा व सामाजिक समतेचा हा लढा यशस्वी होऊ शकला. - नरेश वाहाणे, नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते