शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान

By admin | Updated: January 14, 2017 02:43 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान राहिले आहे.

अनेक भीमसैनिक शहीद : दीक्षाभूमीवरून निघाला होता ऐतिहासिक लाँगमार्च नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. इतकेच नव्हे तर नामांतरासाठी निघालेला ऐतिहासिक लाँग मार्च हा दीक्षाभूमीवरूनच काढण्यात आला होता, हे विशेष. औरंगाबादच्या या विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी एकमताने मंजूर झाला आणि दलितांवरील हिंसाचार वाढला. या हिंसाचारच्या विरोधातील पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली ती नागपुरातच. दलित अत्याचाराविरोधात ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरात विशाल संयुक्त मोर्चा निघाला. या मोर्चातून परतणाऱ्या जमावावर इंदोरा भागात पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. ४ व ५ आॅगस्ट असे दोन दिवस पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शहीद झाले. यात रतन मेंढे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फजल हुसेन, किशोर भाकळे शहीद झाले. ११ वर्षाचा अविनाश अर्जुन डोंगरे या जखमी मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. नामांतर ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १९७८ -७९ अशी दोन वर्षे नागपुरात आंबेडकरी आणि पुरोगामी संघटनांनी रान उठविले होते. ६ डिसेंबर १९७९ रोजी नागपुरात नामांतरासाठी स्वयंस्फूर्त असा विशाल मोर्चा निघाला होता. लाखोंच्या या मोर्चामुळे पोलीस यंत्रणेला धडकी भरली. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला. ६ व ७ डिसेंबर असे दोन दिवस तांडव सुरू होते. या दोन दिवसात ज्ञानेश्वर साखरे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर व डोमाजी कुत्तरमारे हे भीमसैनिक शहीद झाले. नामांतर लढ्यात प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी नागपुरातून औरंगाबादसाठी काढलेला लाँगमार्च ऐतिहासिक ठरला. मराठवाड्याच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळ खडकपूर्णाच्या राहेरी पुलावर २७ नोव्हेंबरला लाँगमार्च अडवून प्रा. कवाडे यांच्यासह थॉमस कांबळे, मामा सरदार, जगदीश थूल व इतर कार्यकर्त्यांना अटक करून औरंगाबाद तुरुंगात ठेवले होते. तर कवी इ.मो. नारनवरे यांच्यासह ३११ भीमसैनिकांना नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले होते. नामांतराच्या १९९३ च्या अंतिम लढ्यातही नागपूर पुढे होते. उत्तर नागपूरचे तत्कालीन आमदार उपेंद्र शेंडे यांनी १५ आॅगस्ट १९९३ पासून मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे नामांतर लढ्याला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर मोठे आंदोलन, झालेले आत्मदहन आणि आत्माहुतीमुळे सरकारला आंबेडकरी शक्तीपुढे नमावे लागले आणि अखेर १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर १४ जानेवरी १९९४ रोजी औरंगाबादच्या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. (प्रतिनिधी) तो लढा हक्काचा व न्यायाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणे, हा प्रश्न फक्त दलित अस्मितेपुरता किंवा केवळ पाटी बदलण्यापुरता मर्यादित नव्हता, तर सामाजिक समतेचा, लोकशाही हक्कांचा आणि न्यायाचा होता. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात एकमताने झालेल्या नामांतर ठरावाची अंमलबजावणी करून सरकार लोकशाही मूल्यांची बूज राखते की नाही, हा खरा प्रश्न होता. -अनिल वासनिक, नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते लोकशाहीच्या हक्कासाठी भीमसैनिक शहीद नामांतराचा लढा केवळ पाटी बदलण्यापुरता कधीच मर्यादित नव्हता तर तो लोकशाही हक्क व सामाजिक समतेचा लढा होता आणि यासाठी भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भीमसैनिकांमुळेच लोकशाहीचा व सामाजिक समतेचा हा लढा यशस्वी होऊ शकला. - नरेश वाहाणे, नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते