शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ५० टक्के विहिरी झाल्या कचराकुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST

लोकमत स्पेशल निशांत वानखेडे नागपूर : पिण्याच्या पाण्यासाठी भूजल हेच महत्त्वाचे स्राेत आहे. त्यात विहिरींचे महत्त्व माेठे आहे. ...

लोकमत स्पेशल

निशांत वानखेडे

नागपूर : पिण्याच्या पाण्यासाठी भूजल हेच महत्त्वाचे स्राेत आहे. त्यात विहिरींचे महत्त्व माेठे आहे. मात्र नागरिकांची उदासीनता आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे हा महत्त्वाचा स्राेतच निकामी झाला आहे. नागपूर शहरात महापालिकेच्या मालकीच्या ६६६ विहिरी आहेत. त्यापैकी ५० टक्के विहिरी अक्षरश: कचराकुंड्या झाल्या आहेत. २३० विहिरी यामुळे निरुपयाेगी ठरल्या आहेत. केवळ ३० विहिरींचे पाणी पिण्यायाेग्य असून सुस्थितीतील इतर विहिरींचे पाणी दुय्यम कामासाठीच वापरणे शक्य आहे.

हे सर्वेक्षण आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था म्हणजेच नीरीचे. नीरीचे संचालक डाॅ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. अत्या कपले यांच्या नेतृत्वात डाॅ. रिता धापाेडकर, डाॅ. प्रणय तरार, डाॅ. दिव्या कालरा, डाॅ. शैलेंद्र यादव आणि वृक्षसंवर्धन समितीचे बाबा देशपांडे यांच्या टीमने शहरातील झाेननिहाय सर्वच सार्वजनिक विहिरींचे सर्वेक्षण पार पाडले. यामध्ये विहिरी आणि बाेअरवेलचा समावेश आहे. या विहिरी ३ ते १८ मीटरपासून (१० ते ६० फूट) ते ९०० मीटर (३००० फूट) पर्यंत खाेदलेल्या आहेत. नीरीने स्वयंस्फूर्तीने हे सर्वेक्षण केले. यासाठी मनपाकडून विहिरींची यादी घेण्यात आली. त्या प्रत्येक विहिरींवर जाऊन पाहणी आणि आसपासच्या नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. पाण्याचे नमुने घेऊन प्रयाेगशाळेत तपासणी करण्यात आली.

- मनपाच्या नाेंदीनुसार शहरात ६६६ सार्वजनिक विहिरी.

- २३० विहिरी कचरा टाकल्याने निरुपयाेगी झाल्या आहेत. (अस्तित्वच धाेक्यात)

- ३० विहिरींचे पाणी पिण्यायाेग्य. ३६ विहिरी पूर्णपणे दूषित.

- उरलेल्या विहिरींचे पाणी उद्यान किंवा बांधकामासाठी उपयाेगात आणले जाऊ शकते.

- झाेननिहाय विहिरींची संख्या

झाेन विहिरींची संख्या खाेली (मीटर)

१) लक्ष्मीनगर झाेन ७६ ३ ते ८

२) धरमपेठ झाेन ७३ ३ ते ६

३) हनुमाननगर झाेन ७१ २ ते ७

४) धंताेली झाेन ३४ ३ ते ९

५) नेहरूनगर झाेन ९१ ३ ते ९

६) गांधीबाग झाेन ७८ ४ ते ९

७) सतरंजीपुरा ५६ ३ ते ७

८) लकडगंज झाेन ६७ ६ ते ९

९) आसीनगर झाेन ७६ ३ ते ११

१०) मंगळवारी झाेन ४४ २ ते ७

शहरात मनपाद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा हाेताे. तरीही खाेदलेल्या विहिरी हाच भूजलपातळी वाढविण्याचा मुख्य स्रोत आहे. जलवायू परिवर्तन आणि पावसाळ्याच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलाच्या गंभीर परिस्थितीत भूजलपातळी कायम ठेवणे माेठे आव्हान आहे. त्यासाठी शहरातील या विहिरींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. विहिरींचे पुनरुज्जीवन आणि भविष्यात पाण्याचे नियाेजन करता यावे म्हणून नीरीतर्फे विहिरींच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

- डाॅ. अत्या कपले, वरिष्ठ वैज्ञानिक, नीरी