शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

उगम क्षेत्रातच नागनदी बनली गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST

नागनदी पुनरुज्जीवन : वाडी व परिसरातील सिवरेज, कारखान्यातील रासायनिक घटक नदीपात्रात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐतिहासिक ठिकाणासाठी प्रसिध्द ...

नागनदी पुनरुज्जीवन : वाडी व परिसरातील सिवरेज, कारखान्यातील रासायनिक घटक नदीपात्रात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऐतिहासिक ठिकाणासाठी प्रसिध्द असलेल्या उपराजधानीची खास ओळख म्हणजे ‘नागनदी’. वास्तविक आता या नदीचे अस्तित्व शिल्लक नाही. या नदीचा एक गटार नाला झाला आहे. एकेकाळी शहराचे वैभव असलेली नागनदी नागरिकांसाठी जीवनदायिनी होती. १८ व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने आपली राजधानी देवगड (मध्य प्रदेश) छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळी काढून नागनदीच्या काठावर राजधानी म्हणून नागपूर शहर वसवले. प्राचीन काळी नागनदी काठावर नाग वंशाचे लोक वास्तव्यास असावेत म्हणूनच या नदीचे नाव नागनदी पडले. नागपूर जवळच्या लाव्हा गावानजीकच्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नागनदीवर बिंबाजी भोसले यांनी १७ व्या शतकात अंबाझरी तलाव बांधला, परंतु उगमस्थळापासून तर तलावापर्यंत आज नदीचे अस्तित्व नाही. कारखान्यातील प्रदूषित पाणी व आजूबाजूच्या गावातील सांडपाणी वाहून नेणारी सिवरेज वाहिनी बनली आहे. पुढे अंबाझरी तलावाला सिवरेज साठविले जाते. कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीपात्रात सर्वत्र फेस पसरला आहे. यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे.

.....

अंबाझरी तलावातील पाणी प्रदूषित

ज्या अंबाझरी तलावाच्या पाण्याचा हिंगणा औद्योगिक क्षेत्रासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वापर होतो. त्याच तलावातील पाणी कारखान्यातील रासायनिक घटकांमुळे प्रदूषित होत आहे. कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता नाल्यात सोडले जाते. पुढे अंबाझरी तलावाला मिळणाऱ्या नाल्याला मिळते.

...

वाडी परिसरातील सांडपाणी

वाडी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जाते. हा नाला अंबाझरी तलावाला मिळतो. पुढे अंबाझरी तलावातून नागनदी वाहते. नदीच्या पाणलोट क्षेत्रातील प्रदूषण थांबल्याशिवाय नदीचे पाणी स्वच्छ होणार नाही. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविताना याचाही विचार होण्याची गरज आहे.

...

अंबाझरी तलावातील पाण्याला दुर्गंधी

वाडी तसेच हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी अंबाझरी तलावात सोडले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण व दुर्गंधी येत असल्याच्या या परिसरात मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तलावात येणारे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

....

प्रवाह प्रदूषित होण्याची कारणे

- उद्योगांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडणे

- वाडी व एमआयडीसी परिसरात सांडपाणी प्रक्रिया होत नाही.

- नदीच्या पाणलोट क्षेत्रातील गटार नाल्यावाटे नदीपात्रात येते.

- वाडी व परिसरात कचरा संकलन करून प्रक्रिया होत नाही.

- नदीपात्रात कचरा टाकला जातो.

.....