शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

उगम क्षेत्रातच नागनदी बनली गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST

नागनदी पुनरुज्जीवन : वाडी व परिसरातील सिवरेज, कारखान्यातील रासायनिक घटक नदीपात्रात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐतिहासिक ठिकाणासाठी प्रसिध्द ...

नागनदी पुनरुज्जीवन : वाडी व परिसरातील सिवरेज, कारखान्यातील रासायनिक घटक नदीपात्रात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऐतिहासिक ठिकाणासाठी प्रसिध्द असलेल्या उपराजधानीची खास ओळख म्हणजे ‘नागनदी’. वास्तविक आता या नदीचे अस्तित्व शिल्लक नाही. या नदीचा एक गटार नाला झाला आहे. एकेकाळी शहराचे वैभव असलेली नागनदी नागरिकांसाठी जीवनदायिनी होती. १८ व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने आपली राजधानी देवगड (मध्य प्रदेश) छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळी काढून नागनदीच्या काठावर राजधानी म्हणून नागपूर शहर वसवले. प्राचीन काळी नागनदी काठावर नाग वंशाचे लोक वास्तव्यास असावेत म्हणूनच या नदीचे नाव नागनदी पडले. नागपूर जवळच्या लाव्हा गावानजीकच्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नागनदीवर बिंबाजी भोसले यांनी १७ व्या शतकात अंबाझरी तलाव बांधला, परंतु उगमस्थळापासून तर तलावापर्यंत आज नदीचे अस्तित्व नाही. कारखान्यातील प्रदूषित पाणी व आजूबाजूच्या गावातील सांडपाणी वाहून नेणारी सिवरेज वाहिनी बनली आहे. पुढे अंबाझरी तलावाला सिवरेज साठविले जाते. कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीपात्रात सर्वत्र फेस पसरला आहे. यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे.

.....

अंबाझरी तलावातील पाणी प्रदूषित

ज्या अंबाझरी तलावाच्या पाण्याचा हिंगणा औद्योगिक क्षेत्रासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वापर होतो. त्याच तलावातील पाणी कारखान्यातील रासायनिक घटकांमुळे प्रदूषित होत आहे. कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता नाल्यात सोडले जाते. पुढे अंबाझरी तलावाला मिळणाऱ्या नाल्याला मिळते.

...

वाडी परिसरातील सांडपाणी

वाडी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जाते. हा नाला अंबाझरी तलावाला मिळतो. पुढे अंबाझरी तलावातून नागनदी वाहते. नदीच्या पाणलोट क्षेत्रातील प्रदूषण थांबल्याशिवाय नदीचे पाणी स्वच्छ होणार नाही. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविताना याचाही विचार होण्याची गरज आहे.

...

अंबाझरी तलावातील पाण्याला दुर्गंधी

वाडी तसेच हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी अंबाझरी तलावात सोडले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण व दुर्गंधी येत असल्याच्या या परिसरात मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तलावात येणारे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

....

प्रवाह प्रदूषित होण्याची कारणे

- उद्योगांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडणे

- वाडी व एमआयडीसी परिसरात सांडपाणी प्रक्रिया होत नाही.

- नदीच्या पाणलोट क्षेत्रातील गटार नाल्यावाटे नदीपात्रात येते.

- वाडी व परिसरात कचरा संकलन करून प्रक्रिया होत नाही.

- नदीपात्रात कचरा टाकला जातो.

.....