शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नागपूरचा इतिहास मांडणारा दीर्घांक ‘वास्तुदेवता’

By admin | Updated: June 30, 2014 00:47 IST

कुठलाही इतिहास किंवा क्रांती घडते तेव्हा ती क्रांती वा इतिहास घडविणारी माणसे निघून जातात. पण अनेक वर्षे एखादी वास्तु मात्र या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असते. ही वास्तु निर्जीव असली तरी

वा. कृ. चोरघडे यांच्या कथेवर आधारित नाटक : विसासंचा ‘घर आंगण’ उपक्रमनागपूर : कुठलाही इतिहास किंवा क्रांती घडते तेव्हा ती क्रांती वा इतिहास घडविणारी माणसे निघून जातात. पण अनेक वर्षे एखादी वास्तु मात्र या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असते. ही वास्तु निर्जीव असली तरी तिला निर्जीव म्हणता येत नाही. कारण या वास्तुत सजीव माणसांच्या आठवणी असतात. सुख, दु:खाचा क्षण या वास्तुने प्रामाणिकपणे जपला असतो. अशा अनेक वास्तु असतात आणि अनेक वास्तु काळाच्या ओघात संपूनही जातात, नष्ट होतात. काही वास्तु मात्र दुर्लक्षित आणि गतवैभवाच्या आठवणीत रमल्या आहेत. नव्या पिढीला हा इतिहास समजून घ्यावासा वाटत नसला तरी याच इतिहासाच्या भरवशावर त्यांचे भविष्य घडणार असते. वा. कृ. चोरघडे यांच्या कथेवर आधारित याच आशयाचे ‘वास्तुदेवता’ हे नाटक विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात सादर करण्यात आले. संस्थेतर्फे ‘घर आंगण’ या उपक्रमांतर्गत या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. चोरघडे यांच्या कथेचे नाट्यरुपांतरण पराग घोंगे यांनी केले होते. या एकांकिकेचे दिग्दर्शन विनोद इंदूरकर यांनी केले. विदर्भात भोसले घराण्याने केलेली क्रांती त्यांचा शूरत्वाचा इतिहास लखलखीत आहे. आपल्या वीरत्वाने स्वत:च्या राज्याचा विस्तार करणाऱ्या पराक्रमी राजांत भोसले घराण्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पण हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना नागपूरकर भोसलेंचा पराक्रम कळत नाही म्हणून वा. कृ. चोरघडे यांना दु:ख होते. ही वेदना त्यांच्या वास्तुदेवता या कथेतून समोर येते. पराक्रमाचा इतिहास आहे, तसाच अंतर्गत वादही यात आहे. हा इतिहास कायम राहू शकला नाही, याची खंत या वास्तुदेवतेला आहे. ही खंत, वेदना आणि आठवण व्यक्त करणारी ही एकांकिका सादर करण्यात आली. यात पराग घोंगे आणि सीमा गोडबोले यांनी भूमिका केली. त्यांनी आपल्या अभिनयातून हा विषय दमदारपणे मांडला. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत संजय काशीकर यांनी सांभाळले. या उपक्रमाला नाट्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)