शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

किचनचे बजेट बिघडले!

By admin | Updated: July 7, 2014 01:04 IST

जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने भाज्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे चटके आता बसू लागले आहेत. भाज्यांची आवक

भाज्यांचे भाव आकाशाला भिडले : स्थानिकांची आवक घटली नागपूर : जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने भाज्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे चटके आता बसू लागले आहेत. भाज्यांची आवक अर्ध्यावर आल्याने दरवाढीचे नवे संकट नागपूरकरांसमोर उभे ठाकले आहे. घाऊकच्या तुलनेत किरकोळ बाजारात ‘लुटमार’ सुरू असल्याने ग्राहकांचा कमी दरातील भाज्यांच्या खरेदीवर जोर आहे. आवक कमी असल्याने भाज्यांचे भाव आकाशाला भिडले असून त्यामुळे गृहिणींचे धाबे दणाणले आहे. त्यांनी कडधान्याचा आधार घेतला आहे. टमाटर ३० , सांभार ६०!वारंवार होणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका बाहेरून येणाऱ्या भाज्यांनाही बसत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये भाज्या विकत घेताना श्रीमंतांनाही खिशाकडे डोकावून पाहावे लागत आहे. किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग आहेत. काही भाज्या तर दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांची खरेदी सामान्यांना परवडणारी नाही. भाज्या महागल्याने हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनीही दर वाढविले आहेत. सर्वसाधारण १५ ते २० रुपये किलोप्रमाणे विकली जाणारी फूलकोबी किरकोळमध्ये ३५ रुपयांवर गेली. सांभार ठोकमध्ये ५० रुपयांवर गेल्याने किरकोळमध्ये ७० ते ८० रुपयात विक्री सुरू आहे. टमाटर ३० रुपयांवर गेले आहे. पावसाअभावी भाज्यात महागच मिळतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. नागपुरात टमाटरची आवक संगमनेर आणि नाशिकहून आहे. कॉटन मार्केट ठोक बाजारात जबलपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, फूलकोबी छिंदवाडा, सांभार नाशिक, छिंदवाडा, पत्ताकोबी मुलताई, तोंडले भिलाई, रायपूर, दुर्ग, इंग्लिश वॉल दिल्ली, हिरव्या मिरची जगदलपूर, हवेली येथून येत आहेत. याशिवाय स्थानिक उत्पादकांकडून चवळी भाजी, वांगे, पालक, आदींची आवक आहे. आवक मंदावलीठोक बाजारात दररोज ९० ते १२० लहानमोठ्या गाड्यांची आवक आहे. नागपुरातून माल अन्य ठिकाणी विक्रीस जातो. शहराला पुरेल एवढी आवक नसल्याने भाज्या महाग झाल्याचे महाजन यांनी सांगितले. पत्ताकोबी, पालक, वांगे कोहळे आटोक्यातभाज्यांची आवक कमी असल्याने बहुतांश भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. गृहिणींसमोर पत्ता कोबी, पालक, वांगे आणि कोहळ्याचा पर्याय आहे. मशागतीसाठी शेत खाली झाल्याने केवळ २० टक्के शेतात भाज्या आहेत. आॅगस्ट अखेरपासून आवक वाढेल. दसरा आणि दिवाळीपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात राहील. तोपर्यंत भाज्या महागच मिळतील. (प्रतिनिधी)कांदे व बटाटे ३० रुपयांवर!केंद्र शासनाने कांदे आणि बटाटे जीवनाश्यक वस्तूंच्या यादीत टाकल्याने साठेबाज आणि शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे मध्यंतरी कमी झालेली आवक वाढली आहे. लाल कांदे १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांद्यांची सात ते आठ ट्रकची आवक आहे. दर्जानुसार लाल कांदा ८४० ते ८८० रुपये मण (४० किलो) आणि पांढरा कांदा ६८० ते ७२० रुपये मण आहे. निर्यात वाढली असली तरीही कांद्याचे भाव वाढणार नाहीत. गेल्यावर्षीची स्थिती यावर्षी उद्भवणार नाही, अशी प्रतिक्रिया कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. बहुतांशवेळी कांद्याची साठवणूक ही जोखीम ठरू शकते, ही कल्पना शेतकऱ्यांना आल्याने बहुतांश शेतकरी कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांकडे साठवणुकीची अनेक साधने उपलब्ध असल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकरी पैसा उभा करण्यासाठी मालाची विक्री करू लागले आहेत. सर्वाधिक आवक अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यातून असून एखाद्या ट्रक चाळीसगाव येथून येत आहे. भाज्याच्या किमती वाढताच गृहिणींकडून बटाट्याला मागणी वाढली. याशिवाय आवक कमी असल्याने भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात भाज्या महाग होण्याच्या भीतीने बटाट्याचा किमती वाढू लागल्या आहेत. ठोक बाजारात रविवारी दर्जानुसार भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. किरकोळमध्ये ३० रुपयांवर भाव गेले आहेत. कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून आवक आहे. ट्रकचे भाडे वाढल्याच्या परिणाम बटाट्याच्या किमतीवर झाला आहे.