शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

खडसेंनी जातीचा आधार घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 03:07 IST

‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा

प्रकाश आंबेडकर : संबंधित ‘हॅकर’ने संपूर्ण माहिती उघड करावीनागपूर : ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी बचाव करत असताना चिमटादेखील काढला आहे. खडसे यांच्या मोबाईलवर कुणाचे दूरध्वनी आले म्हणून ते गुन्हेगार होत नाहीत. परंतु या प्रकरणातून वाचण्यासाठी खडसे यांनी जातीचा आधार घेऊ नये, असे वक्तव्य डॉ.आंबेडकर यांनी केले. नागपुरातील रविभवन येथे ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते. खडसेंच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिमचे फोन आले असे आरोप होत आहेत. परंतु कुणाच्याही मोबाईलवर कुणाचाही फोन येऊ शकतो. खडसे यांनी परत फोन करुन संभाषण केले का याची माहिती उपलब्ध नाही. परंतु खडसे यांनी या प्रकरणात जातीचा आधार घेतला तर त्यांची अवस्था छगन भुजबळांसारखी होऊ शकते, असे डॉ.आंबेडकर म्हणाले. ‘हॅकर’कडे जर संभाषणाची माहिती उपलब्ध असेल तर त्याने ती कुठल्याही दबावात न येता सार्वजनिक करावी. आम्ही त्याला संरक्षण देऊ, असेदेखील प्रतिपादन त्यांनी केले.(प्रतिनिधी)प्रभाग पद्धती बहुजनांसाठी अन्यायकारकचराज्य शासनाने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने घ्यायचे ठरविले आहे. शासनाचा हा निर्णय प्रस्थापित राजकीय पक्षांना व त्यांच्या धनदांडग्या उमेदवारांना फायदेशीर आहे. परंतु यामुळे हिंदू समाजातील उपेक्षित घटक व बहुजनांवर अन्यायकारक आहे. यासंदर्भात कॉंग्रेस व भाजपाची विचारसरणी एकच आहे, अशी टीका डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.केंद्रात पुढील वेळीदेखील भाजपच येणार सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता राज्यात पुढील वेळी भाजपाचे सरकार येईल की नाही याची शाश्वती नाही. परंतु केंद्रात मात्र भाजपाच येईल, असे एकूण चित्र आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. हाफिज सईदसंदर्भात संयुक्त राष्ट्रात चीनने आपल्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी चीनमधील वस्तूंना देशबंदी करायला हवी होती. ते न करता आसाममधील विजयानंतर इतर पूर्वोत्तर राज्यांमध्येदेखील सत्ता स्थापन करू, असा दावा भाजपाने केला आहे. येथे भाजपा सत्तेवर आल्यास येथील स्थैर्य नाहिसे होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीनसोबतच्या संबंधांवर यामुळे परिणाम होईल व याचा फटका स्थानिकांना बसेल, असे डॉ.आंबेडकर म्हणाले.