शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

खडसेंनी जातीचा आधार घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 03:07 IST

‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा

प्रकाश आंबेडकर : संबंधित ‘हॅकर’ने संपूर्ण माहिती उघड करावीनागपूर : ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी बचाव करत असताना चिमटादेखील काढला आहे. खडसे यांच्या मोबाईलवर कुणाचे दूरध्वनी आले म्हणून ते गुन्हेगार होत नाहीत. परंतु या प्रकरणातून वाचण्यासाठी खडसे यांनी जातीचा आधार घेऊ नये, असे वक्तव्य डॉ.आंबेडकर यांनी केले. नागपुरातील रविभवन येथे ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते. खडसेंच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिमचे फोन आले असे आरोप होत आहेत. परंतु कुणाच्याही मोबाईलवर कुणाचाही फोन येऊ शकतो. खडसे यांनी परत फोन करुन संभाषण केले का याची माहिती उपलब्ध नाही. परंतु खडसे यांनी या प्रकरणात जातीचा आधार घेतला तर त्यांची अवस्था छगन भुजबळांसारखी होऊ शकते, असे डॉ.आंबेडकर म्हणाले. ‘हॅकर’कडे जर संभाषणाची माहिती उपलब्ध असेल तर त्याने ती कुठल्याही दबावात न येता सार्वजनिक करावी. आम्ही त्याला संरक्षण देऊ, असेदेखील प्रतिपादन त्यांनी केले.(प्रतिनिधी)प्रभाग पद्धती बहुजनांसाठी अन्यायकारकचराज्य शासनाने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने घ्यायचे ठरविले आहे. शासनाचा हा निर्णय प्रस्थापित राजकीय पक्षांना व त्यांच्या धनदांडग्या उमेदवारांना फायदेशीर आहे. परंतु यामुळे हिंदू समाजातील उपेक्षित घटक व बहुजनांवर अन्यायकारक आहे. यासंदर्भात कॉंग्रेस व भाजपाची विचारसरणी एकच आहे, अशी टीका डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.केंद्रात पुढील वेळीदेखील भाजपच येणार सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता राज्यात पुढील वेळी भाजपाचे सरकार येईल की नाही याची शाश्वती नाही. परंतु केंद्रात मात्र भाजपाच येईल, असे एकूण चित्र आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. हाफिज सईदसंदर्भात संयुक्त राष्ट्रात चीनने आपल्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी चीनमधील वस्तूंना देशबंदी करायला हवी होती. ते न करता आसाममधील विजयानंतर इतर पूर्वोत्तर राज्यांमध्येदेखील सत्ता स्थापन करू, असा दावा भाजपाने केला आहे. येथे भाजपा सत्तेवर आल्यास येथील स्थैर्य नाहिसे होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीनसोबतच्या संबंधांवर यामुळे परिणाम होईल व याचा फटका स्थानिकांना बसेल, असे डॉ.आंबेडकर म्हणाले.