शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कस्तुरबा गांधी स्मृतीदिन विशेष: ‘बां’चे नागपूरशी होते भावनिक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 10:46 IST

बापूंच्या आयुष्यप्रवासात त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या कस्तुरबा यांच्यासाठी नागपूर मात्र संवेदनशील आणि भावनिक विषय होता. याचे कारण होते त्यांचा मुलगा हरीभाई.

ठळक मुद्दे भावना त्यागून जगल्या कर्मठ गांधीमार्गजनसेवेची तळमळ

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कस्तुरबा गांधी आणि नागपूरचे नाते अधिक भावनिक होते. कारणही तसेच होते. महात्मा गांधी नागपुरात येत असत तेव्हा कस्तुरबा गांधी नेहमी सोबत असतच. बापूंच्या आयुष्यप्रवासात त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या कस्तुरबा यांच्यासाठी नागपूर मात्र संवेदनशील आणि भावनिक विषय होता. याचे कारण होते त्यांचा मुलगा हरीभाई.गांधीजी आणि कस्तुरबा गांधी नागपुरात येत तेव्हा त्यांचा मुक्काम राकाजींच्या घरी असे. १९२० मध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने गांधींचे नागपुरात येणे बरेच वाढले. इंग्रज सरकारशी असहकार करण्याचा मंत्र त्यांनी दिला. त्यातून नागपुरात ‘असहयोग आश्रम’ची स्थापना झाली.या आश्रमासाठी १९२८ मध्ये उमरेड रोेडवर जमीन भेट मिळाली. जनरल आवारी याच आश्रमात एका खोलीत राहायचे. या असहयोग आश्रमात दररोज सकाळी, सायंकाळी प्रार्थना होत असे. सूत कताई, परसबाग, गृहोद्योग असे उपक्रम चालायचे.जनरल मंचरशा आवारी आणि आई दलेरबानु आवारी यांच्या तोंडून बरेचदा ऐकलेली आठवण गेव्ह आवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितली. कस्तुरबा गांधी नागपुरात आल्यावर सकाळी राकाजींच्या घरून दलेरबानु आवारी यांच्याकडे तयारीसाठी यायच्या.तिथे प्रार्थनेलाही त्या उपस्थित असत. १९३७ मध्ये गांधीजींचा दुसरा मुलगा हरीभाई गांधी यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. नागपुरातील तेलंगीपुरा येथे ते राहायला लागले. हरीभार्इंचे वडिलांशी फारसे पटत नसे. मात्र आईच्या ओढीने ते असहयोग आश्रमात मागच्या दाराने यायचे.आईला संत्री आवडतात म्हणून संत्री घेऊन यायचे. आईला भेटून परत जायचे. मात्र परत जाताना ‘कस्तुरबा गांधी जिंदाबाद’ अशा घोषणा देत जायचे. आईचे हृदय घेऊन गांधींसोबत वावरणाºया कस्तुरबांचे भावनिक नाते हे असे होते.साधी राहणीकस्तुरबा गांधी यांनी राहणी अगदी साधी होती. महात्मा गांधींची पत्नी असा अभिनिवेश त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीच नव्हता. त्या कर्मठपणे गांधीमार्गाने जगल्या. असहकार आश्रमातून सकाळी गांधींजीसोबत सारेजण निघत. कस्तुरबा गांधीही सोबत असायच्या. या सर्वांची न्याहरी हरिजन वस्तीमध्ये होत असे. गांधींसोबत त्या मंचावरही उपस्थित असायच्या. महिलांच्या सभेत मार्गदर्शनही करायच्या.

अडथळ्यांचा सामना करून मुलींच्या शाळेचे उद्घाटनमहिलांना कमी लेखले जात असल्याच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी पुढाकार घेत. त्यांची ही तळमळ नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीने अनुभवली होती. १९३० साली मुलींच्या शाळेच्या उद्घाटनासाठी कस्तुरबा गांधी यांनी विविध अडथळ्यांचा सामना केला होता व जिद्दीने त्या शाळेच्या उद्घाटनाला पोहोचल्या होत्या.पारशिवनी येथे चिंतामणराव तिडके यांनी मुलींसाठी शाळा सुरु करण्याचा मानस केला होता व शाळेच्या उद्घाटनप्रसंगी मौलिक मार्गदर्शनसाठी कस्तुरबा गांधी यांनी येण्याचे वचन दिले होते. त्या काळी चांगले रस्ते नव्हते. आपली वचनपूर्ती करण्यासाठी व मुलींना नवा हुरुप देण्यासाठी कस्तुरबा जानकीबाई बजाज, महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या पत्नी गोमतीबाई बेन यांच्यासमवेत वर्ध्याहून पारशिवनीसाठी निघाल्या. रामटेकला पोहोचल्यानंतर रस्ता नसल्याने त्या जवळील गावापर्यंत नावेतून गेल्या. पावसाळ्याचे दिवस असतानादेखील त्यांनी त्यानंतर चिखलाने भरलेल्या रस्त्यातून कधी पायी तर कधी बैलगाडी, असा प्रवास करत पारशिवनी गाठले होते.

असे घडले नागपुरातील कस्तुरबा भवनमहाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे नागपुरातील बजाजनगरात गांधी भवन निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला व विनोबा भावे यांच्या हस्ते १९६५ ला भूमिपूजन झाले होते. २ आॅक्टोबर १९६८ साली कमलाबाई होस्पेट यांच्या हस्ते कोनशिलान्यास झाला व जयप्रकाश नारायण यांनी उद्घाटन केले होते. त्यावेळी नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गांधी विचारधारा विभागात गांधी भवन होते. त्यामुळे एकाच भागात दोन गांधी भवन असल्याने कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत होते. त्यामुळे १९९० मध्ये या भवनाला कस्तुरबा भवन असे नाव देण्यात आले, अशी माहिती महात्मा गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील यांनी दिली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी