शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

कान्हा देवकीचा की यशोदेचा ?

By admin | Updated: May 15, 2015 02:36 IST

कान्हा जन्मदात्या देवकीचा की संगोपन करणाऱ्या यशोदेचा, या प्रश्नची उकल या युगातही झालेली नाही.

नागपूर : कान्हा जन्मदात्या देवकीचा की संगोपन करणाऱ्या यशोदेचा, या प्रश्नची उकल या युगातही झालेली नाही. काहीसा असाच एक प्रश्न एका फौजदारी प्रकरणाच्या स्वरूपात सत्र न्यायालयात सुनावणीस आला. हे प्रकरण यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यशोधरानगर भागात राहणाऱ्या एका तरुणीचे दोन मुलांचा बाप असलेल्या एका विवाहित इसमासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून ती गरोदर राहिली. २३ आॅगस्ट २०१४ रोजी तिला मुलगा झाला. प्रियकराने तिला आणि मुलास धुडकावले होते. दुर्दैव असे की मुलाला जन्मताच कावीळ झाला होता. त्याची प्रकृती चिंताजनक होती. ही तरुणी अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने तिच्याकडे मुलाच्या उपचाराची सोय नव्हती. तिचे वडील एका होजियरीच्या दुकानात नोकरी करतात. त्यांनी ही बाब आपल्या मालकास सांगून मदतीची याचना केली होती. मोमीनपुरा भागातीलच व्यवसायी मोहम्मद वकील आणि त्यांची पत्नी निखत जहाँ हे या तरुणीच्या मदतीस धावून आले. त्यांनी मुलास आधी डॉ. भिसीकर यांच्या इस्पितळात, त्यानंतर डॉ. मोहीबुल हक यांच्या इस्पितळात नेऊन वाचविण्याची धडपड केली. मुलाला इस्पितळात १५ दिवस भरती ठेवण्यात आले. तो बचावला. या दाम्पत्याने या मुलावर पन्नास-साठ हजार रुपये खर्च केले. पुढे तीन महिनेपर्यंत मुलावर उपचार करण्यात आले. १ लाख २० हजार रुपये खर्च आला. हे दाम्पत्यच आपल्या मुलाचे खरे काळजी वाहक आहेत. त्यांच्यामुळेच आपला मुलगा वाचला, अशी जाणीव या कुमारी मातेला झाली. तिने आणि तिच्या वडिलाने मुलाला या दाम्पत्यास दत्तक देण्याची इच्छा व्यक्त केली. १० आॅक्टोबर २०१४ रोजी दत्तक घेण्याचा ‘हकिका’ हा कार्यक्रम पार पडला. या मातापित्याने मुलाचे नामकरण केले. लागलीच २७ आॅक्टोबर रोजी दत्तक विधान करण्यात आले. ते नोटरीपुढे पंजीबद्ध करण्यात आले होते. त्यात या मुलीच्या वडिलांसह पाच जणांच्या स्वाक्षऱ्या होत्या. पुढे या तरुणीने आपल्या या प्रियकरासोबत ८ फेब्रुवारी २०१५ रोजी संघर्षनगरातील एका मदरसा येथे निकाह केला. निकाहनंतर तिचे मनपरिवर्तन होऊन तिने मोहम्मद वकील आणि निखत जहाँ यांच्याकडे मुलगा परत करण्याची मागणी केली. परंतु मुलासोबत अतिशय लळा निर्माण झाल्याने त्यांनी मुलास परत करण्यास नकार दिला. परिणामी या तरुणीने त्यांच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन आपणास अटक होईल, अशा भीतीने या दाम्पत्याने आणि अन्य तिघांनी अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांच्या मार्फत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)