शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई

By admin | Updated: June 26, 2016 02:51 IST

क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे.

अमली पदार्थ सेवनविरोधी दिन : जनजागृतीची गरजनागपूर : क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे. या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढणे कठीण असून, यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. अपघातात बळी पडणारे, गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्यांमध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवरून दिसून येते.आॅनलाईनद्वारे औषधांची मागणीअमली पदार्थांच्या तस्करीसाठी विविध मार्ग अवलंबिले जातात. आता आॅनलाईन फार्मसी वा इंटरनेट फार्मसी हा नवा मार्ग विकसित झाला आहे. यातून एखादी व्यक्ती घरबसल्या जगातील कुठल्याही कोपऱ्यातून हे पदार्थ खरेदी करू शकतो. हे सगळे सार्वजनिक स्तरावर होत आहे. अमली पदार्थांचे सेवनाने स्मरणशक्ती वाढते, असा गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे मुले नवनवीन पदार्थांच्या व्यसनाच्या अधीन होत आहेत. आज ही मोठी सामाजिक समस्या बनली आहे.आज अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करीला आळा घालण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसारख्या संस्था एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून झटत आहे. जगजागृती अभियान आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. आपले जीवन सुंदर बनवा, अमली पदार्थांना नव्हे तर आरोग्याला महत्त्व द्या, असा संदेश युवकांपर्यंत पोहोचवला जातो. दुष्परिणामाविषयी जनजागृती आवश्यककेवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत सापडले आहेत. २६ जूनला जगभरात अमली पदार्थ सेवनविरोधी दिन पाळण्यात येतो. या विळख्यात गटांगळ्या खाणाऱ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यासंबंधी या दिवसाचे महत्त्व आहे. अनेक कार्यक्रमातून याविषयी जनजागृती आणि या पदार्थांपासून दूर कसे राहावे, तसेच आपल्या प्रकृतीविषयी गंभीर राहण्याविषयी सावध केले जाते. शैक्षणिक संस्थांबरोबरच इतर सेवाभावी संस्थाही या कामात पुढाकार घेत आहेत. यात आता सामान्य माणसांचाही सहभाग असणे अपरिहार्य बनले आहे. इतकी ही समस्या जटील बनली आहे.पुनर्वसन कठीण, पण प्रयत्नांनी शक्य अमली पदार्थ हा बहुचर्चित विषय बनला आहे. आज पालकांच्या मनात एक विलक्षण भय सामावले आहे, कारण भावी पिढी नशेच्या गर्तेत आहे. तेव्हा पालक आणि शिक्षकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. अमली पदार्थांचे शिकार झालेल्यांना समाज एका वेगळ्याच नजरेने पाहत असतो. त्यांचा तिरस्कार करीत असतो. पण त्यांचे पुनर्वसन केले तर समस्यांचा नायनाट होऊ शकतो. पुनर्वसनाच्या उपचारादरम्यान अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच पालक आणि समुपदेशकांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. नशेच्या अधीन झालेल्यांचे पुनर्वसन कठीण असले तरी प्रयत्नाने ते शक्य आहे.