शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

अमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई

By admin | Updated: June 26, 2016 02:51 IST

क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे.

अमली पदार्थ सेवनविरोधी दिन : जनजागृतीची गरजनागपूर : क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे. या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढणे कठीण असून, यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. अपघातात बळी पडणारे, गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्यांमध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवरून दिसून येते.आॅनलाईनद्वारे औषधांची मागणीअमली पदार्थांच्या तस्करीसाठी विविध मार्ग अवलंबिले जातात. आता आॅनलाईन फार्मसी वा इंटरनेट फार्मसी हा नवा मार्ग विकसित झाला आहे. यातून एखादी व्यक्ती घरबसल्या जगातील कुठल्याही कोपऱ्यातून हे पदार्थ खरेदी करू शकतो. हे सगळे सार्वजनिक स्तरावर होत आहे. अमली पदार्थांचे सेवनाने स्मरणशक्ती वाढते, असा गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे मुले नवनवीन पदार्थांच्या व्यसनाच्या अधीन होत आहेत. आज ही मोठी सामाजिक समस्या बनली आहे.आज अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करीला आळा घालण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसारख्या संस्था एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून झटत आहे. जगजागृती अभियान आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. आपले जीवन सुंदर बनवा, अमली पदार्थांना नव्हे तर आरोग्याला महत्त्व द्या, असा संदेश युवकांपर्यंत पोहोचवला जातो. दुष्परिणामाविषयी जनजागृती आवश्यककेवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत सापडले आहेत. २६ जूनला जगभरात अमली पदार्थ सेवनविरोधी दिन पाळण्यात येतो. या विळख्यात गटांगळ्या खाणाऱ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यासंबंधी या दिवसाचे महत्त्व आहे. अनेक कार्यक्रमातून याविषयी जनजागृती आणि या पदार्थांपासून दूर कसे राहावे, तसेच आपल्या प्रकृतीविषयी गंभीर राहण्याविषयी सावध केले जाते. शैक्षणिक संस्थांबरोबरच इतर सेवाभावी संस्थाही या कामात पुढाकार घेत आहेत. यात आता सामान्य माणसांचाही सहभाग असणे अपरिहार्य बनले आहे. इतकी ही समस्या जटील बनली आहे.पुनर्वसन कठीण, पण प्रयत्नांनी शक्य अमली पदार्थ हा बहुचर्चित विषय बनला आहे. आज पालकांच्या मनात एक विलक्षण भय सामावले आहे, कारण भावी पिढी नशेच्या गर्तेत आहे. तेव्हा पालक आणि शिक्षकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. अमली पदार्थांचे शिकार झालेल्यांना समाज एका वेगळ्याच नजरेने पाहत असतो. त्यांचा तिरस्कार करीत असतो. पण त्यांचे पुनर्वसन केले तर समस्यांचा नायनाट होऊ शकतो. पुनर्वसनाच्या उपचारादरम्यान अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच पालक आणि समुपदेशकांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. नशेच्या अधीन झालेल्यांचे पुनर्वसन कठीण असले तरी प्रयत्नाने ते शक्य आहे.