शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पेंचमधील ‘जंगल सफारी’ कुणासाठी?

By admin | Updated: March 6, 2017 01:54 IST

पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे.

खासगी वाहनांना प्रवेश बंदी का? : पर्यटकांचा सवाल, जिप्सीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी अफलातून निर्णय जीवन रामावत नागपूरपेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे. वन विभागाच्या या निर्णयावर अखेर ‘जंगल सफारी’ कुणासाठी सामान्य पर्यटकांसाठी की, जिप्सीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी, असा प्रश्न सामान्य पर्यटक उपस्थित करू लागला आहे. माहिती सूत्रानुसार पेंच येथील यापूर्वीचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षकांनी हा अफलातून निर्णय घेतला होता. या निर्णयाने ‘जंगल सफारी’ ही सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेर झाली आहे. विशेष म्हणजे, वन विभागाने मागील काही वर्षांत आपला खजिना भरण्याच्या हव्यासापोटी जंगल सफारीच्या प्रवेश शुल्कात सुद्धा मनमानी वाढ केली आहे. यातच आता खासगी वाहनांवर प्रवेश बंदी घातल्याने गरीब आणि सामान्य पर्यटन हा जंगल सफारीपासून वंचित राहत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला असता, येथे जंगल सफारीसाठी सिल्लारी, कोलितमारा, चोरबाहुली, खुबाळा, खुर्सापार व सुरेवानी असे सात गेट तयार करण्यात आले आहेत. यापैकी शिल्लारी गेटवरून दररोज (सकाळ-संध्याकाळ) ८० वाहनांना प्रवेश दिला जातो, तसेच कोलितमारा गेटवरून २०, चोरबाहुली गेटवरून ४८, खुबाळा येथून १६, खुर्सापार येथून ३२ आणि सुरेवानी येथून १४ वाहने आत सोडली जातात. यासाठी वन विभागाने निश्चित केलेल्या शुल्कानुसार प्रत्येक पर्यटकाकडून ८० रुपये प्रवेश शुल्क, ३०० रुपये गाईड आणि खासगी जीप-कारसाठी ४४० रुपये आणि मिनी बससाठी ८८० रुपये शुल्क आकारले जात होते. यानुसार एक कुटुंब दोन ते अडीच हजार रुपयांत संपूर्ण जंगल सफारीचा आनंद लुटू शकत होते, परंतु आता जिप्सीची सक्ती केल्याने केवळ जिप्सीच्या भाड्यापोटी त्याला दोन हजार रुपये मोजावे लागतात. या व्यतिरिक्त प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्क वेगळे द्यावे लागते. अशाप्रकारे एका कुटुंबाचा खर्च हा साधारण साडे तीन ते चार हजार रुपयांपर्यंत जात, असून तो गरीब आणि सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पर्यटकांनी फिरविली पाठ पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या या निर्णयाविरुद्ध पर्यटक तीव्र रोष व्यक्त करीत असून, अनेकांनी जंगल सफारीकडे पाठ फिरविली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जंगल सफारीसाठी पर्यटकांच्या रांगा लागत होत्या. परंतु आता या दोन्ही ठिकाणी पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने जंगल ओसाड पडले आहे. कधी काळी आॅनलाईन बुकिंग हाऊसफुल राहणाऱ्या या दोन्ही जंगलाकडे आता पर्यटक फिरकायलासुद्धा तयार नाही. याचा अप्रत्यक्ष वन विभागाला फटका सहन करावा लागत आहे. शिवाय त्याचवेळी पर्यटकांकडून खासगी वाहनांवरील प्रवेश बंदी हटविण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यांच्या या मागणीची पेंचचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन दखल घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.