शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पेंचमधील ‘जंगल सफारी’ कुणासाठी?

By admin | Updated: March 6, 2017 01:54 IST

पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे.

खासगी वाहनांना प्रवेश बंदी का? : पर्यटकांचा सवाल, जिप्सीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी अफलातून निर्णय जीवन रामावत नागपूरपेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे. वन विभागाच्या या निर्णयावर अखेर ‘जंगल सफारी’ कुणासाठी सामान्य पर्यटकांसाठी की, जिप्सीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी, असा प्रश्न सामान्य पर्यटक उपस्थित करू लागला आहे. माहिती सूत्रानुसार पेंच येथील यापूर्वीचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षकांनी हा अफलातून निर्णय घेतला होता. या निर्णयाने ‘जंगल सफारी’ ही सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेर झाली आहे. विशेष म्हणजे, वन विभागाने मागील काही वर्षांत आपला खजिना भरण्याच्या हव्यासापोटी जंगल सफारीच्या प्रवेश शुल्कात सुद्धा मनमानी वाढ केली आहे. यातच आता खासगी वाहनांवर प्रवेश बंदी घातल्याने गरीब आणि सामान्य पर्यटन हा जंगल सफारीपासून वंचित राहत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला असता, येथे जंगल सफारीसाठी सिल्लारी, कोलितमारा, चोरबाहुली, खुबाळा, खुर्सापार व सुरेवानी असे सात गेट तयार करण्यात आले आहेत. यापैकी शिल्लारी गेटवरून दररोज (सकाळ-संध्याकाळ) ८० वाहनांना प्रवेश दिला जातो, तसेच कोलितमारा गेटवरून २०, चोरबाहुली गेटवरून ४८, खुबाळा येथून १६, खुर्सापार येथून ३२ आणि सुरेवानी येथून १४ वाहने आत सोडली जातात. यासाठी वन विभागाने निश्चित केलेल्या शुल्कानुसार प्रत्येक पर्यटकाकडून ८० रुपये प्रवेश शुल्क, ३०० रुपये गाईड आणि खासगी जीप-कारसाठी ४४० रुपये आणि मिनी बससाठी ८८० रुपये शुल्क आकारले जात होते. यानुसार एक कुटुंब दोन ते अडीच हजार रुपयांत संपूर्ण जंगल सफारीचा आनंद लुटू शकत होते, परंतु आता जिप्सीची सक्ती केल्याने केवळ जिप्सीच्या भाड्यापोटी त्याला दोन हजार रुपये मोजावे लागतात. या व्यतिरिक्त प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्क वेगळे द्यावे लागते. अशाप्रकारे एका कुटुंबाचा खर्च हा साधारण साडे तीन ते चार हजार रुपयांपर्यंत जात, असून तो गरीब आणि सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पर्यटकांनी फिरविली पाठ पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या या निर्णयाविरुद्ध पर्यटक तीव्र रोष व्यक्त करीत असून, अनेकांनी जंगल सफारीकडे पाठ फिरविली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जंगल सफारीसाठी पर्यटकांच्या रांगा लागत होत्या. परंतु आता या दोन्ही ठिकाणी पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने जंगल ओसाड पडले आहे. कधी काळी आॅनलाईन बुकिंग हाऊसफुल राहणाऱ्या या दोन्ही जंगलाकडे आता पर्यटक फिरकायलासुद्धा तयार नाही. याचा अप्रत्यक्ष वन विभागाला फटका सहन करावा लागत आहे. शिवाय त्याचवेळी पर्यटकांकडून खासगी वाहनांवरील प्रवेश बंदी हटविण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यांच्या या मागणीची पेंचचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन दखल घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.