शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सावकारांनी शेतकऱ्यांच्या तारण वस्तू सात दिवसांत परत करणे बंधनकारक

By admin | Updated: August 6, 2015 02:53 IST

राज्य शासनाने परवानाधारक सावकारांच्या तक्रारी लक्षात घेता शेतकरी कर्जमुक्तीच्या ‘जीआर’मध्ये विविध सुधारणा केल्या आहेत.

कर्जमुक्ती निर्णय : शासनाने केल्या ‘जीआर’मध्ये सुधारणानागपूर : राज्य शासनाने परवानाधारक सावकारांच्या तक्रारी लक्षात घेता शेतकरी कर्जमुक्तीच्या ‘जीआर’मध्ये विविध सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार, जिल्हास्तरीय समितीने कर्जमाफीच्या प्रस्तावास मान्यता दिलेल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत सावकारांना शेतकऱ्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तारण वस्तू परत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, तारण वस्तू परत केल्याची खात्री झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सावकारांना १५ दिवसांत कर्जाची रक्कम अदा करावी अशी नवीन तरतूद ‘जीआर’मध्ये करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या वकिलाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ‘जीआर’मधील सुधारणांची प्रत सादर केली. राज्य शासनाने परवानाधारक सावकारांचे शेतकऱ्यांकडे थकित असलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात १० एप्रिल रोजी ‘जीआर’ जारी करण्यात आला आहे. यानंतर सावकारांच्या तक्रारी लक्षात घेता २७ एप्रिल रोजी शुद्धीपत्रक जारी करण्यात आले. कर्जावर शासनाने विहीत केल्यानुसार ३० जून २०१५ पर्यंत व्याज देण्यात येईल अशी तरतूद सुरुवातीच्या ‘जीआर’मध्ये होती. त्यात आता जिल्हास्तरीय समितीने कर्ज माफी प्रस्तावाला मान्यता दिली त्या तारखेपर्यंत कर्जावर व्याज देय होईल असा बदल करण्यात आला आहे. कर्जदार स्वत: शेतकरी नसेल पण, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असेल तर अशा कर्जासाठी ६ डिसेंबर २००७ रोजीच्या अधिसूचनेनुसार तारणी कर्जासाठी १२ व विनातारणी कर्जासाठी १५ तर, १६ सप्टेंबर २०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार तारणी कर्जासाठी १५ व विनातारणी कर्जासाठी १८ टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यात यावी असे शुद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी शासनाचे शुद्धीपत्रक व सावकारांचे म्हणणे लक्षात घेता प्रकरणावर ७ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. कर्जमुक्तीच्या निर्णयाविरुद्ध विदर्भातील सुमारे २०० सावकारांनी उच्च न्यायालयात दहावर रिट याचिका दाखल केल्या आहेत. निर्णयातील विविध अटींवर सावकारांचे आक्षेप आहेत. राज्यातील परवानाधारक सावकारांचे शेतकऱ्यांकडे सुमारे १७१ कोटी रुपये कर्ज थकित आहे. सावकारांतर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, अ‍ॅड. आनंद परचुरे, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर आदी कामकाज पहात आहेत. (प्रतिनिधी)