शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

भारतीय संगीत ही ईश्वरीय अनुभूती; संगीता शंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 11:48 IST

भारतीय संगीतात ईश्वरीय अनुभूती देणाऱ्या अध्यात्मावर आधारलेले आहे. ते निव्वळ मनोरंजन नाही तर आत्म्याशी जोडण्याची शक्ती त्यात आहे. म्हणून ते काल होते, आज आहे आणि पुढेही तेवढ्याच शुद्धतेत राहील, अशी भावना प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीता शंकर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे तीन पिढ्यांचा वारसा जोपासणारा मध्यबिंदू

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधुनिक काळाच्या संगीतात भारतीय परंपरेचे अभिजात संगीत लोप पावत असल्याची भीती बाळगणे चुकीचे आहे. आधीच्या काळातही शास्त्रीय संगीत सर्वांना समजत होतेच असे नाही. अभिजात संगीताचा विशिष्ट वर्ग नेहमीच राहिला आहे आणि तो आजही आहे. भारतीय संगीतात ईश्वरीय अनुभूती देणाऱ्या अध्यात्मावर आधारलेले आहे. ते निव्वळ मनोरंजन नाही तर आत्म्याशी जोडण्याची शक्ती त्यात आहे. म्हणून ते काल होते, आज आहे आणि पुढेही तेवढ्याच शुद्धतेत राहील, अशी भावना प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीता शंकर यांनी व्यक्त केली.कालिदास महोत्सवात सादरीकरणासाठी आलेल्या संगीता शंकर यांनी लोकमतशी संवाद साधला. आई एन. राजम यांच्याकडून संगीता यांना मिळालेला व्हायोलिन वादनाचा वारसा त्यांच्या मुली रागिणी आणि नंदिनी यांच्यातही उतरला आहे. संगीताचा हा कुटुंबीय वारसा बालपणापासून आपसुकच त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याकडून मुलींकडेही गेला. त्या या तीन पिढ्यांच्या मध्यबिंदू आहेत.विशेष म्हणजे काही कार्यक्रमात या तिन्ही पिढ्यांनी सुमधूर व्हायोलिनचे संमोहक सादरीकणही केले आहे. त्यांच्या मते, हा दबाव नसतो. ही आमच्या कुटुंबाला ईश्वराकडून मिळालेली देणगी आहे. ही साधना एका पिढीकडून दुसºया पिढीकडे जात असते. तुमच्याकडे असलेली लक्ष्मी (धनसंपदा) निघून जाईल, मात्र सरस्वती पिढ्यान्पिढ्या वाहत असते. ही विद्या रसिकांच्या आनंदासाठी द्यायची आहे, एवढेच मला माहिती असल्याची त्यांची भावना. उत्साद बिस्मिल्ला खान, विलायत खान अशा महान कलावंतांचे आशीर्वाद या कलेतून मिळाले. आठ वर्षाची असताना एका टीव्ही कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत वादनाची संधी मिळाली आणि १३ वर्षाची असताना ते प्रेक्षकांमध्ये असताना त्यांच्यासमोरच कला सादर करण्याचा सुखद प्रसंग त्यांनी वर्णन केला. अनेक कटु आठवणीही आहेत, पण आयुष्यात चांगले स्वीकारत जाणे, हेच जगणे आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली. इतक्या वर्षांच्या प्रवासात जाणकारांसह शास्त्रीय संगीताची जाण नसलेल्या श्रोत्यांकडूनही भरपूर प्रेम आणि आदर मिळाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा व उत्तमोत्तम संगीतकार घडावेत, यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरेश भट सभागृहाची भव्यता देखणीनागपूरशी लहानपणापासून नाते जुळले आहे. सुरेश भट सभागृहाची भव्यता पाहून डोळे दीपल्याचे त्या म्हणाल्या. १३ वर्षाची असताना आईसोबत येथे मैफिलच्या कार्यक्रमात पहिल्यांदा वादन केले होते. त्यानंतर अनेकदा कार्यक्रम होत राहिले. येथील श्रोत्यांना शास्त्रीय संगीताची समज आहे व नेहमी भरभरून पे्रम मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आणि सीएचे करिअर सोडलेआई संगीता शंकर यांच्यासोबत नंदिनी यांनीही सादरीकरण केले. व्हायोलिन वादनात एक उदयोन्मुख कलावंत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यावेळी त्यांच्याशीही गप्पा मारण्याची संधी मिळाली. घरी संगीताचे वातावरण असल्याने ३-४ वर्षाची असताना आपसुकच ते माझ्याकडेही आले. त्यातच आवडही निर्माण झाली. आठ वर्षाची असताना दीदी (रागिणी शंकर) व १३ व्या वर्षी एकल सादरीकरणाची संधी मिळाली आणि हा प्रवास उत्तरोत्तर वाढत गेला. यादरम्यान त्यांनी सीएची परीक्षाही उत्तीर्ण केली. काही वर्षे कामही केले. मात्र संगीत कार्यक्रम वाढत असल्याने जॉब करण्यात अडचण येऊ लागली. त्यामुळे काही तरी एक निवडण्याचा निर्णय घ्यावा लागला. मी माझ्या पिढीकडून मिळालेले संगीत निवडल्याचे मनोगत नंदिनी यांनी व्यक्त केले. हेच माझा आनंद आणि हेच प्रेम असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :musicसंगीत