शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
3
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
4
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
5
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
6
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
7
Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...
8
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
9
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
10
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
11
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
12
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
13
Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
15
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
16
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
17
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
18
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
19
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
20
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला

भारतीय आर्थिक व मानसिकदृष्ट्या गरीब

By admin | Updated: April 18, 2016 05:55 IST

आपले विचार व मूल्ये आत्मसात करून युरोपातील नागरिकांनी प्रगती केली. आपण मात्र आजही याचे महत्त्व समजू

नागपूर : आपले विचार व मूल्ये आत्मसात करून युरोपातील नागरिकांनी प्रगती केली. आपण मात्र आजही याचे महत्त्व समजू शकलो नाही. आपण केवळ आर्थिकच नाही तर, मानसिकदृष्ट्याही गरीब आहोत, अशी खंत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केली.व्यावसायिक विनीत मोहंता लिखित व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची प्रस्तावना लाभलेल्या ‘प्रुडेन्ट पंचेस’ या सचित्र चारोळीसंग्रहाचे रविवारी घई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक सीए राजेश लोया व सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे संचालक सीए मनीष नुवल प्रमुख अतिथी होते. कार्यक्रम वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे पार पडला.आपल्याकडील वेद, रामायण, महाभारत, गीता यासारख्या अनेक ग्रंथांमध्ये मौलिक विचार आहेत. असे असतानाही आज आपल्या विचारांमध्ये प्रचंड रितेपण आहे. पूर्वजांच्या मान्यतांना काहीच महत्त्व उरले नाही. पूर्वी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणणे सर्वजण ऐकायचे. आज प्रत्येकाचा वेगळा विचार आहे. यातून वाद वाढले आहेत. समजून घेण्याची शक्ती कमी झाली आहे. बुद्धिवंत समाजाची क्षती झाली आहे असे घई यांनी सांगितले.लोया यांनी चारोळीसंग्रहावर भाष्य केले. लेखकाने जीवन जगताना हृदयाला भिडलेल्या गोष्टी पुस्तकात उतरविल्या आहेत. ही जीवनाची कथा आहे. लेखक व्यक्ती, समाज व निसर्गाशी जेवढा जुळतो तेवढाच परिपक्व होतो हे यातून दिसून येते असे मत त्यांनी व्यक्त केले.नुवल यांनी हे पुस्तक एक संपत्ती असल्याचे सांगून त्याचे हिंदीमध्ये भाषांतर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सीए कविता लोया यांनी संचालन केले तर, नीरजा मोहंता यांनी आभार मानले. अनिता लद्धड यांनी घई यांचा परिचय करून दिला. (प्रतिनिधी)असेही म्हणाले घई४लहान असताना आईच्या आग्रहामुळे पौराणिक कथा वाचत होतो. त्यातील भावार्थ समजून घेत होतो. त्यामुळे लिहायला शिकलो. याचे श्रेय आईला जाते.४जन्मभूमी नागपूर असल्यामुळे येथे येणे आनंददायक असते. मी बिशप कॉटन शाळेत शिकलो. येथे येऊन भाषण द्यावे लागेल, असे त्यावेळी वाटले नव्हते.४मी जीवनात फार संघर्ष केला आहे. परंतु संघर्षातही आनंदाने जगलो. संघर्षातून काही तरी नवीन शिकलो. जीवनातील अनुभवातून समजूतदार झालो.४मुलांना मौलिक विचार सांगणारे पुस्तके वाचायला द्या. त्यांना नेहमी प्रोत्साहन देत राहा. जीवनाचा सार समजल्यानंतर ते नक्कीच बुद्धिवंत होतील.४भारतात १० हजार कथा आहेत. यामुळे आपण इतर देशांपेक्षा महान आहोत. विद्यार्थ्यांनी या कथा चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे आणाव्यात.४अनेक मान्यवर उपस्थित कार्यक्रमात लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी आमदार नितीन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.