शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

- तर टाळता येईल उष्माघात ...

By admin | Updated: April 19, 2016 06:39 IST

उपराजधानीचे तापमान ४२-४४ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताची धास्तीही वाढली आहे.

नागपूर : उपराजधानीचे तापमान ४२-४४ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताची धास्तीही वाढली आहे. वैद्यकीय भाषेत ‘हायपरथर्मिया’ म्हणतात. विदर्भात उष्माघाताच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. हा आजार होऊच नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, मानवाच्या शरीराचं सामान्य तापमान ३५.९ सेल्सिअस स्थिर असतं. हवेतील उष्मा वाढला किंवा कमी झाला तरीही शरीराच्या सामान्य तापमानात फारसा बदल होत नाही. तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा आपल्या त्वचेच्या, रक्ताच्या, मेंदूच्या संरचनेत आहे. पुरेसा घाम येणे आणि शरीर थंड होणे हा तापमान नियंत्रणाचा मार्ग मानवी शरीराने स्वीकारला आहे. पण शरीरातच पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर मग समस्या निर्माण होतात. (प्रतिनिधी) उष्माघात म्हणजे काय?डॉ. पाटील यांनी सांगितले, वाढत्या वातावरणातील तापमानामुळे मानवी शरीराचे तापमान सर्वसाधारण न राहिल्यास शरीरावर होणारा अपाय, यास उष्माघात म्हणता येईल. उष्माघात वातावरणातील वाढलेले तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे होतो.सामान्य लक्षणे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरु त्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्ध होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेततीव्र लक्षणे उष्माघाताची लक्षणे वेळेवर ओळखली नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा रु क्ष होणे आणि सुरकुतलेली दिसते. जीभ आत ओढली जाते. हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. उलटी होते. व्यक्ती बेशुद्ध पडते, कोमात जाण्याची शक्यता असते. महत्त्वाचे...उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे वापरावे. यामुळे मेंदूपर्यंत ऊन जाण्यास अटकाव होईल. उपाशीपोटी उन्हात फिरणे टाळावे. यामुळे ग्लुकोजचा पुरवठा कमी होतोशरीराच्या तापमानात अचानक बदल होऊ नये म्हणून अति थंड पाणी पिणे टाळावे.उन्हात कष्टाची कामे टाळावीत तसेच ‘बॉयलर रूम’मध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे टाळावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत.जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे, सरबत प्यावे, अधूनमधून उन्हात काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.