शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

- तर टाळता येईल उष्माघात ...

By admin | Updated: April 19, 2016 06:39 IST

उपराजधानीचे तापमान ४२-४४ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताची धास्तीही वाढली आहे.

नागपूर : उपराजधानीचे तापमान ४२-४४ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताची धास्तीही वाढली आहे. वैद्यकीय भाषेत ‘हायपरथर्मिया’ म्हणतात. विदर्भात उष्माघाताच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. हा आजार होऊच नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, मानवाच्या शरीराचं सामान्य तापमान ३५.९ सेल्सिअस स्थिर असतं. हवेतील उष्मा वाढला किंवा कमी झाला तरीही शरीराच्या सामान्य तापमानात फारसा बदल होत नाही. तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा आपल्या त्वचेच्या, रक्ताच्या, मेंदूच्या संरचनेत आहे. पुरेसा घाम येणे आणि शरीर थंड होणे हा तापमान नियंत्रणाचा मार्ग मानवी शरीराने स्वीकारला आहे. पण शरीरातच पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर मग समस्या निर्माण होतात. (प्रतिनिधी) उष्माघात म्हणजे काय?डॉ. पाटील यांनी सांगितले, वाढत्या वातावरणातील तापमानामुळे मानवी शरीराचे तापमान सर्वसाधारण न राहिल्यास शरीरावर होणारा अपाय, यास उष्माघात म्हणता येईल. उष्माघात वातावरणातील वाढलेले तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे होतो.सामान्य लक्षणे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरु त्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्ध होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेततीव्र लक्षणे उष्माघाताची लक्षणे वेळेवर ओळखली नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा रु क्ष होणे आणि सुरकुतलेली दिसते. जीभ आत ओढली जाते. हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. उलटी होते. व्यक्ती बेशुद्ध पडते, कोमात जाण्याची शक्यता असते. महत्त्वाचे...उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे वापरावे. यामुळे मेंदूपर्यंत ऊन जाण्यास अटकाव होईल. उपाशीपोटी उन्हात फिरणे टाळावे. यामुळे ग्लुकोजचा पुरवठा कमी होतोशरीराच्या तापमानात अचानक बदल होऊ नये म्हणून अति थंड पाणी पिणे टाळावे.उन्हात कष्टाची कामे टाळावीत तसेच ‘बॉयलर रूम’मध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे टाळावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत.जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे, सरबत प्यावे, अधूनमधून उन्हात काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.