शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

माेरपंखांसाठी पाणवठ्यात युरिया टाकून माेरांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:11 IST

निशांत वानखेडे नागपूर : माेरपंखांची विक्री सध्या जाेरात सुरू असल्याचे चित्र असून शहरात, गावाेगावी माेरपंख विक्रेत्यांची संख्या वाढल्याचे दिसून ...

निशांत वानखेडे

नागपूर : माेरपंखांची विक्री सध्या जाेरात सुरू असल्याचे चित्र असून शहरात, गावाेगावी माेरपंख विक्रेत्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मागणी असल्याने हवा तसा पुरवठा करण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब केला जाण्याचे प्रकार घडतातच. हा प्रकार राष्ट्रीय पक्षी माेराबाबतही हाेत असून, चक्क पाणवठ्यात युरिया टाकून माेरांना मारून नंतर पंख काढण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. विदर्भात अशा प्रकाराची नाेंद नसली तरी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानसारख्या भागात हा प्रकार सर्रास हाेत असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रीय पक्षी म्हणून गणना असलेल्या माेराला धार्मिक महत्त्वही आहे. घरासमाेर माेरपंख लावले तर सुखसमृद्धी येते, अशी मान्यता आहे. धार्मिक कार्यातही माेरपंखांचा वापर हाेताे. फॅशन म्हणूनही मागणी आहे आणि लहान मुलांनाही आकर्षण असतेच. मागणीमुळे विक्रीचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांच्या निरीक्षणानुसार, नागपूर शहरात ५० पेक्षा अधिक माेरपंख विक्रेते फिरताना दिसतात. सध्या त्यांचा ठिय्या काॅटन मार्केटच्या खवा मार्केटजवळील गेस्ट हाऊसमध्ये असल्याचे बाेलले जाते. त्यांच्याशी सहज चर्चा केली तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आली. या विक्रेत्यांना ६,००० रुपये महिना पगार व राहण्याखाण्याची व्यवस्था त्या त्या ठिकाणी करून दिली जाते. ही माणसे मग रस्ताेरस्ती फिरून माेरपंख विकतात. हा एक संघटित गुन्हा आहे. मात्र कायद्यातील सवलतीमुळे वन विभाग व पाेलीस यंत्रणाद्वारे दुर्लक्ष केले जात आहे.

आग्रा हे केंद्र

पर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, झारखंड या भागात माेरांची संख्या सर्वाधिक आहे. आपल्या देशात माेरपंख विक्रीवर बंदी नाही. मात्र एवढ्या माेठ्या प्रमाणात माेरपंख येतात कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी क्रूर मार्गाचा अवलंब केला जाताे. उन्हाळ्यात जंगलाबाहेरच्या पाणवठ्यात युरिया टाकला जाताे. इतर प्राणी, पक्ष्यांवरही त्याचे दुष्परिणाम हाेतात. मृत माेरांचे पंख व अवयव काढून ते आणले जातात. त्यांचे आभूषणही बनतात. आग्रा हे माेरपंख व आभूषण विक्रीचे माेठे केंद्र आहे. त्यानंतर व्यापारी पगारी माणसे ठेवून देशभर विक्रीसाठी पाठवितात.

बंदी नितांत गरजेची

श्रीकांत देशपांडे यांच्या मते, कायद्यात असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन राष्ट्रीय पक्ष्याची शिकार केली जात आहे. त्यामुळे माेरपंख विक्रीवर ताबडताेब निर्बंध आणणे गरजेचे आहे किंवा केवळ खादी ग्रामाेद्याेगसारख्या ठिकाणाहून विक्री बंधनकारक करावी. त्यामुळे विक्रीवर मर्यादा येईल व शिकारही कमी हाेईल. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि न्यायालयाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली.

विक्रेत्यांची नाेंद ठेवणे आवश्यक

मानद वन्यजीव रक्षक प्रफुल्ल भांबाेरकर यांच्या मते, राज्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात माेरपंख विक्रीला येणाऱ्यांचा कुठलाही रेकाॅर्ड नसताे. त्यामुळे हा प्रकार सर्रास सुरू आहे. किमान सीमेवर आधारकार्डसह या विक्रेत्यांची नाेंद घेणे आवश्यक आहे. शिवाय वन विभागाकडून माेरपंखांचे स्रोत कुठे आहेत, याचा तपास करणे गरजेचे आहे. शिवाय देशात माेरांची गणना हाेण्याचीही नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.