शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेकडो पोती तूर उघड्यावर

By admin | Updated: April 2, 2017 02:37 IST

एकीकडे, तुरीच्या उत्पादनात वाढ झाली असून, दुसरीकडे खुल्या बाजारातील तुरीचे भाव गडगडले.

बारदान्याअभावी खरेदी बंद : तूर उत्पादकांचा जीव टांगणीला कळमेश्वर : एकीकडे, तुरीच्या उत्पादनात वाढ झाली असून, दुसरीकडे खुल्या बाजारातील तुरीचे भाव गडगडले. त्यामुळे शासनाने नाफेडच्या मध्यमातून तूर खरेदी करायला सुरुवात केली. त्यातच नाफेडने बारदाना (तुरी भरण्यासाठी आवश्यक असलेली पोती) नसल्याचे कारण पुढे करून तुरीची खरेदी बंद केली. त्यामुळे कळमेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या शेकडो क्विंटल तूर पोत्यात भरून उघड्यावर पडल्या आहे. या प्रकारामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे. यावर्षी शासनाने नाफेडच्या माध्यमातून बहुतांश बाजार समितीच्या आवारात तूर खरेदी केंद्र सुरू केले. त्यात कळमेश्वर बाजार समितीचाही समावेश आहे. या केंद्रावर हमीभावाप्रमाणे अर्थात प्रति क्विंटल ५०५० रुपये भावाने तुरीची खरेदी केली जात असल्याने तसेच खासगी व्यापारी यापेक्षा कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर नाफेडला विकणे पसंत केले. त्यामुळे या खरेदी केंद्रावर आवकही वाढली. त्यातच नाफेडने खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. नुकसान टाळण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना तुरीची विकल्यास शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो तर, दुसरीकडे नाफेडच्या खरेदीची प्रतीक्षा केल्यास उघड्यावर ठेवलेल्या तुरीची नासाडी होते. अशा दुहेरी संकटात तालुक्यातील तूर उत्पादक सापडले आहेत.(प्रतिनिधी) एक महिन्यानंतरचा धनादेश हातात या केंद्रावर तूर विकल्यानंतर शेतकऱ्यांना रकमेचा पोस्ट डेटेड चेक दिला जातो. या चेकवर एक महिन्यानंतरची तारीख नमूद केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम किमान दीड महिन्यानंतर मिळणार आहे.