शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानवी जीवन मालमत्तेपेक्षा मौल्यवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिकस्त इमारत पाडण्याच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या व्यावसायिकाला मानवी जीवनाच्या श्रेष्ठतेची जाणीव ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिकस्त इमारत पाडण्याच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या व्यावसायिकाला मानवी जीवनाच्या श्रेष्ठतेची जाणीव करून दिली. मानवी जीवन मालमत्तेपेक्षा खूप मौल्यवान असून मानवी जीवनाशिवाय मालमत्तेला काहीच महत्त्व नाही, असे न्यायालयाने व्यावसायिकाला सांगितले.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. मनपा अधिकाऱ्यांनुसार संबंधित इमारत खूप जास्त शिकस्त झाली असून ती कधीही कोसळून प्राणहानी होऊ शकते. असे घडू नये हे सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मानवी जीवन मालमत्तेपेक्षा मौल्यवान आहे. मालमत्तेचे अस्तित्व केवळ मानवी जीवन सुरक्षित व अर्थपूर्ण करण्यासाठी असते. मालमत्ता मानवी जीवनासाठी धोकादायक झाल्यानंतर तिचे महत्त्व संपते. अशावेळी तिला अधिक काळ संरक्षित केले जाऊ शकत नाही. परिणामी, मनपाची नोटीस चुकीची नाही, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

महानगरपालिकेने भंडारा रोडवरील गांजाखेत चौकातील गुप्ता परिवाराच्या मालकीची शिकस्त इमारत पाडण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस जारी केली आहे. या इमारतीत १९६२ पासून स्टेशनरीचा व्यवसाय करत असलेले भाडेकरू महादेव खुशलानी यांनी मनपाच्या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सिव्हील इंजिनियरच्या मतांनुसार ही इमारत चांगल्या अवस्थेत आहे. खुशलानी यांचा या इमारतीवरील ताबा कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय काढता येणार नाही, असा आदेश दिवाणी न्यायालयाने दिला आहे. गुप्ता परिवाराने इमारतीचा ताबा घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसोबत मिळून ही कारवाई सुरू केली, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने हे मुद्दे अमान्य करून वरील भूमिका मांडली.

-----------------------

याचिका फेटाळली

उच्च न्यायालयात दाखल करण्यास अयोग्य आहे, या कारणावरून ही याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्याला मनपाची वादग्रस्त नोटीस चुकीची आहे आणि त्यांचा संबंधित इमारतीवरील ताबा काढून घेतला जाऊ शकत नाही, असे वाटत असल्यास ते यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दाद मागू शकतात, असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

-----------

यालाच म्हणतात कायदेशीर प्रक्रिया

प्राणहानी होऊ नये यासाठी ही शिकस्त इमारत पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यालाच कायदेशीर प्रक्रिया म्हटले जाते. दिवाणी न्यायालयाचा संबंधित मनाई हुकुम अंतिम स्वरुपाचा नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याचा इमारतीवरील ताबा गरज निर्माण होईल त्यावेळी कायदेशीर प्रक्रियेद्वारे काढून घेतला जाऊ शकतो, असेदेखील निर्णयात नमूद करण्यात आले.