शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

मानवी जीवन मालमत्तेपेक्षा मौल्यवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिकस्त इमारत पाडण्याच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या व्यावसायिकाला मानवी जीवनाच्या श्रेष्ठतेची जाणीव ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिकस्त इमारत पाडण्याच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या व्यावसायिकाला मानवी जीवनाच्या श्रेष्ठतेची जाणीव करून दिली. मानवी जीवन मालमत्तेपेक्षा खूप मौल्यवान असून मानवी जीवनाशिवाय मालमत्तेला काहीच महत्त्व नाही, असे न्यायालयाने व्यावसायिकाला सांगितले.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. मनपा अधिकाऱ्यांनुसार संबंधित इमारत खूप जास्त शिकस्त झाली असून ती कधीही कोसळून प्राणहानी होऊ शकते. असे घडू नये हे सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मानवी जीवन मालमत्तेपेक्षा मौल्यवान आहे. मालमत्तेचे अस्तित्व केवळ मानवी जीवन सुरक्षित व अर्थपूर्ण करण्यासाठी असते. मालमत्ता मानवी जीवनासाठी धोकादायक झाल्यानंतर तिचे महत्त्व संपते. अशावेळी तिला अधिक काळ संरक्षित केले जाऊ शकत नाही. परिणामी, मनपाची नोटीस चुकीची नाही, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

महानगरपालिकेने भंडारा रोडवरील गांजाखेत चौकातील गुप्ता परिवाराच्या मालकीची शिकस्त इमारत पाडण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस जारी केली आहे. या इमारतीत १९६२ पासून स्टेशनरीचा व्यवसाय करत असलेले भाडेकरू महादेव खुशलानी यांनी मनपाच्या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सिव्हील इंजिनियरच्या मतांनुसार ही इमारत चांगल्या अवस्थेत आहे. खुशलानी यांचा या इमारतीवरील ताबा कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय काढता येणार नाही, असा आदेश दिवाणी न्यायालयाने दिला आहे. गुप्ता परिवाराने इमारतीचा ताबा घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसोबत मिळून ही कारवाई सुरू केली, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने हे मुद्दे अमान्य करून वरील भूमिका मांडली.

-----------------------

याचिका फेटाळली

उच्च न्यायालयात दाखल करण्यास अयोग्य आहे, या कारणावरून ही याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्याला मनपाची वादग्रस्त नोटीस चुकीची आहे आणि त्यांचा संबंधित इमारतीवरील ताबा काढून घेतला जाऊ शकत नाही, असे वाटत असल्यास ते यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दाद मागू शकतात, असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

-----------

यालाच म्हणतात कायदेशीर प्रक्रिया

प्राणहानी होऊ नये यासाठी ही शिकस्त इमारत पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यालाच कायदेशीर प्रक्रिया म्हटले जाते. दिवाणी न्यायालयाचा संबंधित मनाई हुकुम अंतिम स्वरुपाचा नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याचा इमारतीवरील ताबा गरज निर्माण होईल त्यावेळी कायदेशीर प्रक्रियेद्वारे काढून घेतला जाऊ शकतो, असेदेखील निर्णयात नमूद करण्यात आले.