शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मानवी जीवन मालमत्तेपेक्षा मौल्यवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिकस्त इमारत पाडण्याच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या व्यावसायिकाला मानवी जीवनाच्या श्रेष्ठतेची जाणीव ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिकस्त इमारत पाडण्याच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या व्यावसायिकाला मानवी जीवनाच्या श्रेष्ठतेची जाणीव करून दिली. मानवी जीवन मालमत्तेपेक्षा खूप मौल्यवान असून मानवी जीवनाशिवाय मालमत्तेला काहीच महत्त्व नाही, असे न्यायालयाने व्यावसायिकाला सांगितले.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. मनपा अधिकाऱ्यांनुसार संबंधित इमारत खूप जास्त शिकस्त झाली असून ती कधीही कोसळून प्राणहानी होऊ शकते. असे घडू नये हे सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मानवी जीवन मालमत्तेपेक्षा मौल्यवान आहे. मालमत्तेचे अस्तित्व केवळ मानवी जीवन सुरक्षित व अर्थपूर्ण करण्यासाठी असते. मालमत्ता मानवी जीवनासाठी धोकादायक झाल्यानंतर तिचे महत्त्व संपते. अशावेळी तिला अधिक काळ संरक्षित केले जाऊ शकत नाही. परिणामी, मनपाची नोटीस चुकीची नाही, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

महानगरपालिकेने भंडारा रोडवरील गांजाखेत चौकातील गुप्ता परिवाराच्या मालकीची शिकस्त इमारत पाडण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस जारी केली आहे. या इमारतीत १९६२ पासून स्टेशनरीचा व्यवसाय करत असलेले भाडेकरू महादेव खुशलानी यांनी मनपाच्या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सिव्हील इंजिनियरच्या मतांनुसार ही इमारत चांगल्या अवस्थेत आहे. खुशलानी यांचा या इमारतीवरील ताबा कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय काढता येणार नाही, असा आदेश दिवाणी न्यायालयाने दिला आहे. गुप्ता परिवाराने इमारतीचा ताबा घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसोबत मिळून ही कारवाई सुरू केली, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने हे मुद्दे अमान्य करून वरील भूमिका मांडली.

-----------------------

याचिका फेटाळली

उच्च न्यायालयात दाखल करण्यास अयोग्य आहे, या कारणावरून ही याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्याला मनपाची वादग्रस्त नोटीस चुकीची आहे आणि त्यांचा संबंधित इमारतीवरील ताबा काढून घेतला जाऊ शकत नाही, असे वाटत असल्यास ते यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दाद मागू शकतात, असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

-----------

यालाच म्हणतात कायदेशीर प्रक्रिया

प्राणहानी होऊ नये यासाठी ही शिकस्त इमारत पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यालाच कायदेशीर प्रक्रिया म्हटले जाते. दिवाणी न्यायालयाचा संबंधित मनाई हुकुम अंतिम स्वरुपाचा नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याचा इमारतीवरील ताबा गरज निर्माण होईल त्यावेळी कायदेशीर प्रक्रियेद्वारे काढून घेतला जाऊ शकतो, असेदेखील निर्णयात नमूद करण्यात आले.