शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

मानवी जीवन मालमत्तेपेक्षा मौल्यवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिकस्त इमारत पाडण्याच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या व्यावसायिकाला मानवी जीवनाच्या श्रेष्ठतेची जाणीव ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिकस्त इमारत पाडण्याच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या व्यावसायिकाला मानवी जीवनाच्या श्रेष्ठतेची जाणीव करून दिली. मानवी जीवन मालमत्तेपेक्षा खूप मौल्यवान असून मानवी जीवनाशिवाय मालमत्तेला काहीच महत्त्व नाही, असे न्यायालयाने व्यावसायिकाला सांगितले.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. मनपा अधिकाऱ्यांनुसार संबंधित इमारत खूप जास्त शिकस्त झाली असून ती कधीही कोसळून प्राणहानी होऊ शकते. असे घडू नये हे सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मानवी जीवन मालमत्तेपेक्षा मौल्यवान आहे. मालमत्तेचे अस्तित्व केवळ मानवी जीवन सुरक्षित व अर्थपूर्ण करण्यासाठी असते. मालमत्ता मानवी जीवनासाठी धोकादायक झाल्यानंतर तिचे महत्त्व संपते. अशावेळी तिला अधिक काळ संरक्षित केले जाऊ शकत नाही. परिणामी, मनपाची नोटीस चुकीची नाही, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

महानगरपालिकेने भंडारा रोडवरील गांजाखेत चौकातील गुप्ता परिवाराच्या मालकीची शिकस्त इमारत पाडण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस जारी केली आहे. या इमारतीत १९६२ पासून स्टेशनरीचा व्यवसाय करत असलेले भाडेकरू महादेव खुशलानी यांनी मनपाच्या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सिव्हील इंजिनियरच्या मतांनुसार ही इमारत चांगल्या अवस्थेत आहे. खुशलानी यांचा या इमारतीवरील ताबा कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय काढता येणार नाही, असा आदेश दिवाणी न्यायालयाने दिला आहे. गुप्ता परिवाराने इमारतीचा ताबा घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसोबत मिळून ही कारवाई सुरू केली, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने हे मुद्दे अमान्य करून वरील भूमिका मांडली.

-----------------------

याचिका फेटाळली

उच्च न्यायालयात दाखल करण्यास अयोग्य आहे, या कारणावरून ही याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्याला मनपाची वादग्रस्त नोटीस चुकीची आहे आणि त्यांचा संबंधित इमारतीवरील ताबा काढून घेतला जाऊ शकत नाही, असे वाटत असल्यास ते यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दाद मागू शकतात, असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

-----------

यालाच म्हणतात कायदेशीर प्रक्रिया

प्राणहानी होऊ नये यासाठी ही शिकस्त इमारत पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यालाच कायदेशीर प्रक्रिया म्हटले जाते. दिवाणी न्यायालयाचा संबंधित मनाई हुकुम अंतिम स्वरुपाचा नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याचा इमारतीवरील ताबा गरज निर्माण होईल त्यावेळी कायदेशीर प्रक्रियेद्वारे काढून घेतला जाऊ शकतो, असेदेखील निर्णयात नमूद करण्यात आले.