शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

इतिहासाचा अभ्यास आवश्यक, दडपण नको

By admin | Updated: June 29, 2015 03:12 IST

मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी इतिहास आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पण इतिहास फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

श्री.मा. भावे : इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन का आणि कसे? विषयावर व्याख्यान नागपूर : मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी इतिहास आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पण इतिहास फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण इतिहासात घडलेल्या घटना आपण पाहिलेल्या नसतात आणि त्याचे लेखन करणाऱ्या इतिहासकाराकडून त्याची मते आणि विश्लेषण होण्याचा संभव व शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतांचा निवाडा करणे इतिहासाच्या बाबतीत गरजेचे आहे. त्यामुळेच इतिहास नेहमीच महत्त्वाचा ठरतो. पण इतिहासाचे दडपण घेऊन वागणे मात्र समाजहिताचे नाही, असे मत पुण्याच्या भारत इतिहास मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ संपादक डॉ. श्री. मा. भावे यांनी केले. प्रगतिशील लेखक संघ, विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन का आणि कसे?’ विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी उपस्थित होते. डॉ. भावे म्हणाले, इतिहास भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आणि समाजाला उन्नत करण्यासाठी महत्त्वाचा असतो. पण इतिहासाने निर्माण केलेले प्रश्न इतिहासातच शोधण्याचा प्रयत्न करताना अकारण वर्तमानात अनेक अपसमज निर्माण होतात. त्यापेक्षा इतिहासाच्या अभ्यासातून आपले वर्तमान सकारात्मकतेने बदलविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. इतिहासाचे सारेच लेखन खरे आहे, असे मानण्यातही फारसा अर्थ नाही. व्यक्ती आणि कालसापेक्ष बदल इतिहासात होतात. नेपोलियन हरला किंवा बखर लिहिणाऱ्यांचा नेमका हेतू काय? हे समजून घेणेही आवश्यक आहे. जर्मनीच्या रांके या इतिहासकाराने इतिहास लिहिताना सर्व दस्तावेज आणि पुरावे तपासूनच लेखन करावे, असा सिद्धांत मांडला. पण मार्क्सने इतिहासाचे सूत्र शोधून तो उलगडण्याचा प्रयत्न करावा, असा सिद्धांत मांडला. उत्पादनाची साधने बदलली की समाजात परिवर्तन होते. या परिवर्तनाचा विचार इतिहासात असला पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले होते. याशिवाय देश, स्थलकाल आणि संस्कृतीसापेक्षतेनेही इतिहासात बदल होतो. त्यामुळे या साऱ्याच घटकांचा विचार करणे भाग आहे. यासाठी त्यांनी अनेक जागतिक उदाहरणांनी हा विषय समजावून सांगितला. याप्रसंगी डॉ. श्रीपाद चितळे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. जोशी म्हणाले, कुठलाही गर्व न बाळगता आपला इतिहास शोधता येतो, हे भावे यांनी उलगडले आहे.इतिहासात आपले मूळ शोधण्याचा प्रयत्न करताना आपण आपले वर्तमानही शोधतो. त्यामुळेच इतिहासाकडे आपण निकोप दृष्टीने पाहू शकत नाही. (प्रतिनिधी)