शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचा अभ्यास आवश्यक, दडपण नको

By admin | Updated: June 29, 2015 03:12 IST

मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी इतिहास आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पण इतिहास फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

श्री.मा. भावे : इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन का आणि कसे? विषयावर व्याख्यान नागपूर : मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी इतिहास आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पण इतिहास फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण इतिहासात घडलेल्या घटना आपण पाहिलेल्या नसतात आणि त्याचे लेखन करणाऱ्या इतिहासकाराकडून त्याची मते आणि विश्लेषण होण्याचा संभव व शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतांचा निवाडा करणे इतिहासाच्या बाबतीत गरजेचे आहे. त्यामुळेच इतिहास नेहमीच महत्त्वाचा ठरतो. पण इतिहासाचे दडपण घेऊन वागणे मात्र समाजहिताचे नाही, असे मत पुण्याच्या भारत इतिहास मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ संपादक डॉ. श्री. मा. भावे यांनी केले. प्रगतिशील लेखक संघ, विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन का आणि कसे?’ विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी उपस्थित होते. डॉ. भावे म्हणाले, इतिहास भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आणि समाजाला उन्नत करण्यासाठी महत्त्वाचा असतो. पण इतिहासाने निर्माण केलेले प्रश्न इतिहासातच शोधण्याचा प्रयत्न करताना अकारण वर्तमानात अनेक अपसमज निर्माण होतात. त्यापेक्षा इतिहासाच्या अभ्यासातून आपले वर्तमान सकारात्मकतेने बदलविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. इतिहासाचे सारेच लेखन खरे आहे, असे मानण्यातही फारसा अर्थ नाही. व्यक्ती आणि कालसापेक्ष बदल इतिहासात होतात. नेपोलियन हरला किंवा बखर लिहिणाऱ्यांचा नेमका हेतू काय? हे समजून घेणेही आवश्यक आहे. जर्मनीच्या रांके या इतिहासकाराने इतिहास लिहिताना सर्व दस्तावेज आणि पुरावे तपासूनच लेखन करावे, असा सिद्धांत मांडला. पण मार्क्सने इतिहासाचे सूत्र शोधून तो उलगडण्याचा प्रयत्न करावा, असा सिद्धांत मांडला. उत्पादनाची साधने बदलली की समाजात परिवर्तन होते. या परिवर्तनाचा विचार इतिहासात असला पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले होते. याशिवाय देश, स्थलकाल आणि संस्कृतीसापेक्षतेनेही इतिहासात बदल होतो. त्यामुळे या साऱ्याच घटकांचा विचार करणे भाग आहे. यासाठी त्यांनी अनेक जागतिक उदाहरणांनी हा विषय समजावून सांगितला. याप्रसंगी डॉ. श्रीपाद चितळे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. जोशी म्हणाले, कुठलाही गर्व न बाळगता आपला इतिहास शोधता येतो, हे भावे यांनी उलगडले आहे.इतिहासात आपले मूळ शोधण्याचा प्रयत्न करताना आपण आपले वर्तमानही शोधतो. त्यामुळेच इतिहासाकडे आपण निकोप दृष्टीने पाहू शकत नाही. (प्रतिनिधी)