शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण जयस्तंभ

By admin | Updated: July 11, 2014 01:22 IST

देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून

नव्याने उभारणार : मूळ स्वरूप कायम राहणार नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून या ऐतिहासिक स्मारकाचे मूळ स्वरूप मात्र कायम ठेवण्यात येणार आहे. ‘शहिदो की चितोओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालो का, यही बाकी निशां होगा’ जेव्हा-जेव्हा शहिदांची आठवण होत असते, ही ओळ आपसूकच ओठांवर येते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकं शहीद झालीत. या शहिदांच्या स्मृतीत प्रत्येक शहरांमध्ये शहीद स्मारक उभारण्यात आले. त्याचधर्तीवर भारताच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून देशातील प्रत्येक शहरात ‘जयस्तंभ’ उभारण्यात आले होते. नागपुरात रेल्वे स्टेशन चौकात रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयासमोर (डीआरएम आॅफिस) १५ आॅगस्ट १९४७ रोजी ‘जयस्तंभ’ उभारण्यात आले. जयस्तंभ हे केवळ एक स्मारक नव्हे तर ते देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. या स्तंभाच्या चारही बाजूंनी अशोक चक्र अंकीत होते. मध्य प्रदेशचे तत्कालीन पहिले मुख्यमंत्री पं. रविशंकर शुक्ला आणि गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा यांच्या हस्ते जयस्तंभचे लोकार्पण करण्यात आले होते. काही वर्षानंतर त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. परंतु कालांतराने या जयस्तंभाची प्रचंड उपेक्षा करण्यात आली. जयस्तंभच्या चारही बाजूंनी जाहिरातीचेच फलक अधिक लागलेले राहायचे. स्तंभाजवळ असलेले पाण्याचे फवारे बंद पडले. अशोक चक्रही तुटून पडले होते. कम्पाऊंडच्या आत दगड माती जमा झाली होती. दरम्यान नागपूर त्रिशताब्दी वर्षात नागपुरातील रस्ते रुंदीकरण करण्यात आले. तेव्हा जे पुतळे वाहतुकीसाठी अडथळा ठरत होते ते हटवून त्याच चौकात नवीन स्वरूपात बसविण्यात आले. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीजींचा पुतळा आणि झांशी राणी चौकातील राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा त्याच चौकात रोडला लागून वसविण्यात आले. परंतु रेल्वे स्टेशन चौकातील ‘जयस्तंभ’ मात्र तसाच राहिला. रेल्वे स्टेशन चौक हा अतिशय वर्दळीचा चौक आहे. रामझुल्याचे कामही जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पुलावरून येणारया वाहतुकीचा विचार केल्यास जयस्तंभ वाहतुकीसाठी अतिशय अडचणीचा ठरत होता. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने ‘जयस्तंभ’ हटविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री स्तंभ हटविण्याची कारवाई करण्यात आली. नागपुरातील इतर पुतळे ज्या पद्धतीने हटवून त्याच चौकात रस्त्यालगत उभारण्यात आलेत, त्याच धर्तीवर जयस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वात पाहणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबेसुद्धा हजर होते. रेल्वे स्टेशन चौकातच आर्मीच्या आॅफिसला लागून महापालिकेच्या जुन्या आॅक्ट्रॉयची जागा आहे. या जागेवर जयस्तंभ लवकरच नव्याने उभारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)