शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण जयस्तंभ

By admin | Updated: July 11, 2014 01:22 IST

देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून

नव्याने उभारणार : मूळ स्वरूप कायम राहणार नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून या ऐतिहासिक स्मारकाचे मूळ स्वरूप मात्र कायम ठेवण्यात येणार आहे. ‘शहिदो की चितोओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालो का, यही बाकी निशां होगा’ जेव्हा-जेव्हा शहिदांची आठवण होत असते, ही ओळ आपसूकच ओठांवर येते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकं शहीद झालीत. या शहिदांच्या स्मृतीत प्रत्येक शहरांमध्ये शहीद स्मारक उभारण्यात आले. त्याचधर्तीवर भारताच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून देशातील प्रत्येक शहरात ‘जयस्तंभ’ उभारण्यात आले होते. नागपुरात रेल्वे स्टेशन चौकात रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयासमोर (डीआरएम आॅफिस) १५ आॅगस्ट १९४७ रोजी ‘जयस्तंभ’ उभारण्यात आले. जयस्तंभ हे केवळ एक स्मारक नव्हे तर ते देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. या स्तंभाच्या चारही बाजूंनी अशोक चक्र अंकीत होते. मध्य प्रदेशचे तत्कालीन पहिले मुख्यमंत्री पं. रविशंकर शुक्ला आणि गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा यांच्या हस्ते जयस्तंभचे लोकार्पण करण्यात आले होते. काही वर्षानंतर त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. परंतु कालांतराने या जयस्तंभाची प्रचंड उपेक्षा करण्यात आली. जयस्तंभच्या चारही बाजूंनी जाहिरातीचेच फलक अधिक लागलेले राहायचे. स्तंभाजवळ असलेले पाण्याचे फवारे बंद पडले. अशोक चक्रही तुटून पडले होते. कम्पाऊंडच्या आत दगड माती जमा झाली होती. दरम्यान नागपूर त्रिशताब्दी वर्षात नागपुरातील रस्ते रुंदीकरण करण्यात आले. तेव्हा जे पुतळे वाहतुकीसाठी अडथळा ठरत होते ते हटवून त्याच चौकात नवीन स्वरूपात बसविण्यात आले. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीजींचा पुतळा आणि झांशी राणी चौकातील राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा त्याच चौकात रोडला लागून वसविण्यात आले. परंतु रेल्वे स्टेशन चौकातील ‘जयस्तंभ’ मात्र तसाच राहिला. रेल्वे स्टेशन चौक हा अतिशय वर्दळीचा चौक आहे. रामझुल्याचे कामही जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पुलावरून येणारया वाहतुकीचा विचार केल्यास जयस्तंभ वाहतुकीसाठी अतिशय अडचणीचा ठरत होता. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने ‘जयस्तंभ’ हटविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री स्तंभ हटविण्याची कारवाई करण्यात आली. नागपुरातील इतर पुतळे ज्या पद्धतीने हटवून त्याच चौकात रस्त्यालगत उभारण्यात आलेत, त्याच धर्तीवर जयस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वात पाहणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबेसुद्धा हजर होते. रेल्वे स्टेशन चौकातच आर्मीच्या आॅफिसला लागून महापालिकेच्या जुन्या आॅक्ट्रॉयची जागा आहे. या जागेवर जयस्तंभ लवकरच नव्याने उभारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)